शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

विद्यापीठ घेणार पाच पुरग्रस्त गावे दत्तक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 07:00 IST

शासनाच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातर्फे पाच गावे दत्तक घेवून या गावांची पुन्हा उभारणी केली जाणार आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांच्या मदतीने गावांमध्ये राबविणार स्वच्छता मोहीम

पुणे : अतिवृष्टी व पुरामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील काही गावे उद्ध्वस्त झाली असून पुरामुळे बहुतांश गावांमध्ये अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळेच सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाने या गावांना पुन्हा उभे करण्यासाठी व पुरग्रस्तांना मानसिक दिलासा देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. शासनाच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातर्फे पाच गावे दत्तक घेवून या गावांची पुन्हा उभारणी केली जाणार आहे. तसेच या उपक्रमात शिक्षण क्षेत्राशी निगडित असणाऱ्या सर्व घटकांना सामावून घेतले जाणार आहे.कोल्हापूर व सांगलीतील नदीकाठच्या गावांसह शहरातीलकाही भागांला सुध्दा पुराचा मोठा फटका बसला. सुमारे आठवडा भरापासून सुरू असलेल्या अतिवृष्टी व पुराच्या पाण्यामुळे नागरिकांना आपली घरे सोडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे लागले. परंतु, योग्यवेळी सुरक्षित स्थळावर पोहचू न शकल्यामुळे पुराच्या पाण्यात ४० हून अधिक जणांना आपले प्राण गमवावे लागले. सध्या पुरपरिस्थिती निवळत असली तरी काही भागात अजूनही पाणी साचलेले आहे. राज्यातील सर्वच भागातून  पुरग्रस्तांसाठी पिण्याचे पाणी, बिस्किट, भाकरी, कपडे, अशा जीवनोपयोगी वस्तूंच्या माध्यमातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. मात्र, लोकांना मानसिक आधार देण्याची व गाव स्वच्छ करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची गरज आहे. त्यामुळेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पाच गावे दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे.विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे म्हणाले, पुरामुळे नुकसान झालेल्या गावांना पुन्हा उभे करणे गरजेचे आहे. तसेच पुरामुळे गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता पसरली असून परिसरात रोगराई पसरण्याची भिती आहे. सध्या पुरग्रस्तांना विविध भागातून वस्तू रुपात मदत येत आहे. परंतु, विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळ व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मदतीने पुरग्रस्त गावांमध्ये स्वच्छता मोहिम राबविली जाणार आहे. विभागीय आयुक्त किंवा जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार विद्यापीठाकडून पाच गावे दत्तक घेतली जातील. तसेच शासनाकडून राबविल्या जाणाºया पुनर्उभारणीच्या कामात विद्यापीठाचे विद्यार्थी सहभाग घेतील.

..............सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी पाच गावे दत्तक घेण्यास मंजुरी दिली आहे. प्राध्यापक, प्राचार्य संघटना, संस्थाचालक, विद्यापीठाच्या अधिकार मंडळाचे सर्व सदस्य या सर्वांशी चर्चा करून विद्यापीठातर्फे पुरग्रस्त गावांच्या पुनर्उभारणीचे काम करण्यात येईल. तसेच लवकरच याबाबतची सविस्तर माहिती स्पष्ट केली जाईल.- राजेश पांडे,व्यवस्थापन परिषद सदस्य,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ  

टॅग्स :Puneपुणेuniversityविद्यापीठfloodपूर