शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या मुलीची छेडछाड;उदय सामंत म्हणाले,'पोलिसांनी मवाळ भूमिका न घेता जहाल भूमिका घ्यावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 18:24 IST

या प्रकरणातील आरोपींवर पोलिसांनी कडक कायदेशीर कारवाई करावी. पोलिसांनी मवाळ भूमिका न घेता जहाल भूमिका घ्यावी.

आळंदी : केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या महाराष्ट्रातील भाजपच्या महिला नेत्याच्या मुलीसह अन्य काही मुलींची यात्रेदरम्यान टवाळखोरांनी छेडछाड केली. या घटनेबाबत दोन दिवसांपूर्वी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती, मात्र कारवाई न झाल्याने स्वतः सदर केंद्रीय मंत्र्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला.यावर आज आळंदीत माध्यमांशी बोलतांना मंत्री उदय सामंत यांनी संताप व्यक्त केला. या प्रकरणातील आरोपींवर पोलिसांनी कडक कायदेशीर कारवाई करावी. पोलिसांनी मवाळ भूमिका न घेता जहाल भूमिका घ्यावी. अशी प्रवृत्ती ठेचून काढाव्यात. छेडछाडीचे प्रकार घडत असतील तर पोलिसांनी कडक कारवाई केली पाहिजे. असं म्हणत सामंत यांनी माध्यमांशी बोलताना संताप व्यक्त केला.दरम्यान, तीर्थक्षेत्र आळंदीत श्री संत ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण जन्मोत्सव वर्ष ७५० वे या निमित्ताने “ओळख श्री ज्ञानेश्वरीची” या पुस्तक प्रकाशन सोहळ्या निमित्त मंत्री उदय सामंत यांनी हजेरी लावली.  उदय सामंत इंद्रायणी नदी प्रदूषणाबाबत म्हणाले, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना इंद्रायणी आणि पवना नदी प्रदूषण मुक्त करण्याबाबत माझ्यावर जबाबदारी दिली होती. त्याबाबतचा डीपीआर तयार करायला सुरुवात केली आहे. एमआयडीसी, पर्यावरण विभाग, एमआरडीए, पीसीएमसी आणि पीएमसी आहे. या सगळ्यांच्या सहभागाने दोन ते अडीच हजार कोटींचा प्रकल्प आहे. हा प्रकल्प पूर्ण होईल तेव्हा एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पूर्ण होईल.'एकनाथ खडसेंचा संताप: “पोलीस असतानाही गुंडांचा धाक”या घटनेवर माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “मुक्ताईनगरमध्ये घडलेला प्रकार हा अत्यंत दुर्दैवी आहे. या गुंडांवर आधीच गुन्हे दाखल आहेत. यात्रेत उपस्थित असलेल्या पोलिसांनाही मारहाण करण्यात आली. मग महिलांची सुरक्षा कशी राहणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीAlandiआळंदीraksha khadseरक्षा खडसेPoliceपोलिस