शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

...म्हणून पुण्यातील रुग्णसंख्या वाढतेय; केंद्रीय आरोग्य सचिवांची प्रशासनाला चपराक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 23:16 IST

पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच आता थेट केंद्रीय आरोग्य सचिवांनी प्रशासनाचा कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे.

प्राची कुलकर्णी 

पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच आता थेट केंद्रीय आरोग्य सचिवांनी प्रशासनाचा कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. होम आयसोलेशन हेच रुग्णांची संख्या वाढण्याचे प्रमुख कारण असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पुण्यातल्या रुग्णवाढी संदर्भात काळजी व्यक्त करतानाच त्यांनी ॲण्टीजेन चाचण्या केल्या जाऊ नयेत असेही ते म्हणाले.

पुण्यातील पुणे फोरम फोर कोविड रिस्पॉन्स यांच्यावतीने काही दिवसांपूर्वी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहिण्यात आले होते. पुणे शहरातल्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शहरातल्या नागरिकांचे लसीकरण करण्यात यावे अशी मागणी यात करण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर ती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्या समवेत आज फोरमच्या प्रतिनिधींची बैठक झाली. यामध्ये फोरमचे प्रमुख सुधीर मेहता, भाजप नेते विनय सहस्त्रबुद्धे, डॉक्टर दिलीप कदम उपस्थित होते.  

यावेळी राजेश भूषण यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर थेट प्रश्न उपस्थित केले. भूषण यांच्या मते पुणे जिल्ह्यामध्ये आरटीपीसी या चाचण्यांचे प्रमाण कमी होत आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आहे. तसेच होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांचे स्क्रीनींग केले जात नाही ही वाढत्या रुग्ण संख्येचे महत्वाचे कारण असल्याचे देखील ते म्हणाले. नागरिकांकडून कोरोना नियम पाळण्यातला निष्काळजपणा हे देखील काळजीचे कारण असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान आता लसीकरण नागरिकांसाठी खुले करण्यात आले असले तरी यात पुणेकरांना प्राधान्य दिले जावे अशी मागणी यानिमित्ताने सुधीर मेहता यांनी केली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसPuneपुणे