शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

आवास योजनेतून महाराष्ट्रात २० लाख घरे, केंद्रीय कृषी, ग्रामविकासमंत्री शिवराजसिंह चौहान यांची घोषणा

By नितीन चौधरी | Updated: December 23, 2024 20:10 IST

पंतप्रधान आवास प्लस योजनेत यंदा महाराष्ट्रासाठी १३ लाख २९ हजार ६७८ घरे अशी एकूण सुमारे २० लाख घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत

पुणे : “पंतप्रधान आवास योजनेत महाराष्ट्रातील बेघरांसाठी यंदा ६ लाख ३६ हजार ८९ घरे उपलब्ध करून दिली आहेत. या योजनेतील काही निकषांमुळे गरिबांना घरे मिळत नव्हती. त्यामुळे पात्रतेचे निकष शिथिल करण्यात आले असून, पंतप्रधान आवास प्लस योजनेत यंदा महाराष्ट्रासाठी १३ लाख २९ हजार ६७८ घरे अशी एकूण सुमारे २० लाख घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत,” अशी घोषणा केंद्रीय कृषी व ग्रामविकासमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली.

पुण्यातील कृषी तंत्रज्ञान अनुप्रयोग तंत्रज्ञान संस्थेतर्फे शेतकरी सन्मान दिनानिमित्त आयोजित संमेलनात ते बोलत होते. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे  कुलगुरू डॉ. शरद गडाख, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, प्रभारी कृषी आयुक्त रावसाहेब भागडे, संस्थेचे संचालक एस. के. रॉय उपस्थित होते.

पंतप्रधान आवास योजनेतून एका वर्षांत महाराष्ट्रातील गरिबांसाठी तब्बल १९ लाख ६६ हजार ७६८ घरे उपलब्ध करून देण्यात आली असून, आजवर कोणत्याही राज्याला एका वर्षांत एवढी घरे देण्यात आलेली नाहीत. ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्रावरील प्रेम दर्शवित असून, एका वर्षांत ही घरे तयार करून गरिबांना दिली जातील, असेही त्यांनी या वेळी सांगितले. या योजनेचे निकष आता बदलण्यात आले असून पूर्वी फोन व दुचाकी असलेल्यांना घरे मिळत नव्हती. आता अशांनाही घरे मिळतील. ज्या कुटुंबाचे मासिक उत्पन्न १० हजार असायचे यांचाही योजनेत समावेश केला जात नव्हता. आता ही मर्यादा १५ हजार रुपये प्रति महिना करण्यात आली आहे. तर पाच एकर कोरडवाहू शेती व अडीच एकर बागायती शेती असलेल्या शेतकऱ्यांनाही ही योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी या वेळी जाहीर केले. येत्या पाच वर्षांत देशातील कोणताही बेघर घराविना राहणार नाही असा विश्वासही त्यांनी बोलून दाखविला.

किसान दिनानिमित्त बोलताना चौहान यांनी चरणसिंह यांच्या कार्याचा गौरव केला. चरणसिंह यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या शेतकरीविरोधी धोरणांचा प्रखर विरोध केला. काँग्रेस सरकारने त्यांचा कधीही सन्मान केला नाही. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी चौधरी चरणसिंह यांचा स्मृतिदिन शेतकरी सन्मान दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली,’ असेही ते या वेळी म्हणाले. मोदी यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा संकल्प सिद्धीस नेण्याचे ठरविले आहे. शेतीचा खर्च कमी करण्यासाठी विविध प्रकारचे अनुदान दिले जात असून, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाटी विविध प्रयत्न केले जात आहेत. जुन्या सरकारच्या तुलनेत शेतपिकांची किमान आधारभूत किंमत (एमएसपी) दुपटीने वाढवली असून, भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेली शेती आणि प्राण असलेल्या शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी मोदी सरकार निरंतर कार्यरत आहे, असेही ते म्हणाले.

वारंवार निवडणुका या देशाच्या प्रगतीत अडथळा असून आचारसंहितेमुळे विकासकामे ठप्प होतात व विकासाचे दीर्घकालीन नियोजन करता येत नाही. शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येतो. जनतेच्या पैशांचा मोठा अपव्यय होतो. त्यामुळे संसदेत ‘एक देश, एक निवडणूक’ या विधेयकाला पाठिंबा द्यावा, असे आवाहनही चौहान यांनी या वेळी केले.

राज्यासाठी ही मोठी भेटयाबाबत पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यासाठी ही मोठी भेट असल्याचे सांगत देशात आतापर्यंत कोणत्याही राज्याला या योजनेतून एवढी घरे मिळाली नव्हती, असे सांगितले. राज्यात या योजनेतून २६ लाख नागरिकांनी नोंदणी केली असून या २० लाख घरांमधून अनेकांना घरे मिळतील. निकष बदलल्याने अन्य लोकांनाही ती येत्या वर्षभरात मिळतील असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानHomeसुंदर गृहनियोजनAgriculture Sectorशेती क्षेत्र