शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

उल्हास बापट म्हणतात, हा तर वादग्रस्त निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 07:56 IST

राष्ट्रपतींवर पंतप्रधान व मंत्रिमंडळ यांचा सल्ला बंधनकारक असतो. तसेच राज्यपालांना मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाचा सल्ला बंधनकारक असतो, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे.

पुणे : मागील ४५ वर्षे मी राज्यघटनेचा अभ्यास करतो आहे. इतका वादग्रस्त निर्णय मी पाहिलेला नाही, अशी प्रतिक्रिया घटना तज्ज्ञ प्रा. उल्हास बापट यांनी ‘लाेकमत’ला दिली.

राष्ट्रपतींवर पंतप्रधान व मंत्रिमंडळ यांचा सल्ला बंधनकारक असतो. तसेच राज्यपालांना मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाचा सल्ला बंधनकारक असतो, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे. इथे राज्यपालांनी विरोधी पक्षनेत्याच्या एका पत्रावरून अधिवेशन बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी कोणाबरोबर चर्चा केली, ते कोणाबरोबर बोलले याविषयी काहीच स्पष्टता नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे यात आता अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. उद्या सभापती कोण असतील, त्यांच्यावरील अविश्वास ठरावाचे काय, १६ आमदारांच्या अपात्रतेचे काय, शिवसेनेचे गटनेते व प्रतोद कोण असतील, न्यायालयाने ११ जुलैच्या सुनावणीत काय निर्णय होईल, हे सगळे अंधातरी आहे. 

राष्ट्रपती यावर सर्वोच्च न्यायालयाच्या या न्यायाधिशांकडे स्पष्टीकरण मागू शकतात. मला वाटते १९८५ मध्ये झालेल्या पक्षांतर बंदी कायद्यासंदर्भात विचार झाला पाहिजे. त्याचा अर्थ कसाही लावला जात आहे असे मला वाटते. त्यातील त्रुटी दूर करणे गरजेचे झाले आहे.- प्रा. उल्हास बापट, घटना तज्ज्ञ

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळUddhav Thackerayउद्धव ठाकरेbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी