शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

उल्हास बापट म्हणतात, हा तर वादग्रस्त निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 07:56 IST

राष्ट्रपतींवर पंतप्रधान व मंत्रिमंडळ यांचा सल्ला बंधनकारक असतो. तसेच राज्यपालांना मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाचा सल्ला बंधनकारक असतो, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे.

पुणे : मागील ४५ वर्षे मी राज्यघटनेचा अभ्यास करतो आहे. इतका वादग्रस्त निर्णय मी पाहिलेला नाही, अशी प्रतिक्रिया घटना तज्ज्ञ प्रा. उल्हास बापट यांनी ‘लाेकमत’ला दिली.

राष्ट्रपतींवर पंतप्रधान व मंत्रिमंडळ यांचा सल्ला बंधनकारक असतो. तसेच राज्यपालांना मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाचा सल्ला बंधनकारक असतो, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे. इथे राज्यपालांनी विरोधी पक्षनेत्याच्या एका पत्रावरून अधिवेशन बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी कोणाबरोबर चर्चा केली, ते कोणाबरोबर बोलले याविषयी काहीच स्पष्टता नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे यात आता अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. उद्या सभापती कोण असतील, त्यांच्यावरील अविश्वास ठरावाचे काय, १६ आमदारांच्या अपात्रतेचे काय, शिवसेनेचे गटनेते व प्रतोद कोण असतील, न्यायालयाने ११ जुलैच्या सुनावणीत काय निर्णय होईल, हे सगळे अंधातरी आहे. 

राष्ट्रपती यावर सर्वोच्च न्यायालयाच्या या न्यायाधिशांकडे स्पष्टीकरण मागू शकतात. मला वाटते १९८५ मध्ये झालेल्या पक्षांतर बंदी कायद्यासंदर्भात विचार झाला पाहिजे. त्याचा अर्थ कसाही लावला जात आहे असे मला वाटते. त्यातील त्रुटी दूर करणे गरजेचे झाले आहे.- प्रा. उल्हास बापट, घटना तज्ज्ञ

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळUddhav Thackerayउद्धव ठाकरेbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी