शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

"राजे जिंदगीत असं म्हणूच शकत नाही"; सातारा दौऱ्यात जरांगे पाटलांना विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 19:05 IST

जरांगेच्या सातारा येथील सभेवरून वाद निर्माण झाले आहेत. साताऱ्यातील शिवतीर्थ इथं मनोज जरांगे पाटलांची सभा होणार असल्याचे बोलले जाते.

पुणे - मराठ्यांच्या लेकरांच्या आरक्षणाचा नेतेमंडळींनी घात केला असून पुरावे असताना जाणूनबुजून लपवण्यात येत होते, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली. मनोज जरांगे पाटील यांची दौंडमधील वरवंड येथील बाजार मैदानात विराट सभा झाली. यावेळी मोठ्या संख्येने मराठा समाज उपस्थित होता. त्यानंतर, पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका व पुढील दिशाही सांगितली. यावेळी, साताऱ्यातील कार्यक्रमाला होत असलेल्या विरोधाचा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावरही त्यांनी आपलं मत व्यक्त केलं.

जरांगेच्या सातारा येथील सभेवरून वाद निर्माण झाले आहेत. साताऱ्यातील शिवतीर्थ इथं मनोज जरांगे पाटलांची सभा होणार असल्याचे बोलले जाते. मात्र, जरांगे पाटलांनी साताऱ्यात अन्यत्र सभा घ्यावी परंतु शिवतीर्थ इथं सभा घेऊ नये असं मराठा आंदोलन तेजस्विनी चव्हाण यांनी म्हटलं आहे. 

साताऱ्यात मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे. मात्र, दोन्ही राजेंकडून साताऱ्यातील या कार्यक्रम घेऊ नये असं म्हटलं जातय, यासंदर्भातील प्रश्न जरांगे यांना विचारण्यात आला होता. त्यावर, हे हे.. असं होऊच शकत नाही. राजे आमचं दैवत आहे भाऊ... ती राजगादी आहे, लेकरांवरती महाराष्ट्रातील गोरगरिबांवरती साताऱ्याच्याच मायेचा हात आहे. राजे कार्यक्रम घेऊ नका म्हणणार असं होऊच शकत नाही, असे जरांगे पाटील यांनी म्हटले. दौंडमध्ये पत्रकारांशी बोलताना जरांगे पाटील यांनी साताऱ्यातील सभेसंदर्भात भाष्य केलं. 

मला यावर विश्वासच नाही, राजे म्हणत असतील तर मी काहीही करायला तयार आहे. कारण, समाजाला न्याय मिळतोय आणि राजगादी असं म्हणतेय हे होऊच शकत नाही. मला व्हिडिओ दाखवा मग मी बोलता. कारण, राजे असं बोलू शकत नाही. राजे जिंदगीत असं म्हणून शकत नाही, हा गोरगरिबांच्या कल्याणाचा विषय आहे. राजे म्हणतील ते २ मिनिटांत आम्ही ऐकायला तयार आहोत. पण, ते असं म्हणूनच शकत नाहीत, जर तसं असेल तर राज्यात केवढा मोठा संदेश जाईल, असेही जरांगे पाटील यांनी म्हटले.   

जरांगेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर

माझ्या आंदोलनामागे कोण आहे? हे राज ठाकरेंनीच शोधून काढावं आणि मलादेखील सांगावं. या आंदोलनामागे कोणाचाही हात नसून ही मराठा समाजाची साथ आहे. त्यासोबतच मराठ्याची लेकरं मोठे व्हायला लागले. त्यांचं कल्याण व्हायला लागलं की, अशी वक्तव्य करायला सुरुवात होते. आमच्यावर खोटे आरोपदेखील केले जातात. मात्र, मराठा समाज आता कोणाचंही ऐकणार नाही. मराठा समाजाला स्पष्ट माहिती झालं आहे की, मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे आणि सगळे मराठा मिळून आम्ही आरक्षण मिळवणारच आहोत, असंही जरांगे यांनी म्हटलं. 

७० वर्षे पुरावे लपवून ठेवले होते

गोरगरीब मराठ्यांचे मुडदे पाडून सत्तर वर्षे सरकारने पाळलेले बागलबच्चे समिती नेमतात, आयोग बनवले; पण मराठ्यांची नोंद सापडली नाही. ओबीसीमध्ये असतानाही आमच्या मराठ्यांचे पुरावे शोधले नाही. आता, समितीने पुरावे शोधण्यास सुरुवात केली. १८०५ पासून न्यायमूर्तींनी २०२३ पर्यंतचे पुरावे आजरोजी सापडले आहेत. या सरकारने ७० वर्षे पुरावे लपून ठेवले होते, आज कसे सापडले? मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण असताना घात केला. यांनी ठरवून षडयंत्र केले आहे. मराठ्यांच्या विराट शक्तीपुढे सरकार जागे झाले. या एकीपुढे सरकारने नमते घ्यावे लागले. मराठ्यांचा २४ डिसेंबरला विजय होणार आहे. आता मागे नाही हटणार. आपण ७० टक्के लढा जिंकला आहे, असेही जरांगे यांनी म्हटले.  

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेOBCअन्य मागासवर्गीय जातीMaratha Reservationमराठा आरक्षण