शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बारावी नापास विद्यार्थीही जीवनात यशस्वी; अपयशाने न खचता निवडले विविध पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 12:01 IST

इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला...

पुणे : इयत्ता बारावी म्हणजे आयुष्याचा शेवटचा बिंदू नाही. अलीकडच्या काळात बारावीचा निकाल ९० टक्क्यांपेक्षा अधिक लागत आहे. पूर्वी हाच निकाल ७० ते ८० टक्के लागत होता. त्यामुळे नापास विद्यार्थ्यांचे प्रमाणही मोठे होते. मात्र, नापास झाल्यामुळे या विद्यार्थ्यांनी आयुष्य संपवले नाही; उलट इतर पर्यायांचा स्वीकार करून जीवनात लौकिकार्थाने यश संपादन केले.

इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. त्यात अनेकांनी अपेक्षित यश संपादन केले; तर काहींच्या पदरी निराशा पडली. इयत्ता बारावी परीक्षा म्हणजे जीवनाचे शेवटचे सत्य नाही. वर्षभर केलेल्या अभ्यासक्रमाचे एका विशिष्ट पद्धतीने केलेले मूल्यमापन म्हणजे बारावीचा निकाल आहे. कोरोनामुळे काही विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे लक्ष देता आले नाही. त्यामुळे बारावीचा निकाल सर्वकाही असा विचार विद्यार्थ्यांनी मनात आणू नये, असे शिक्षणतज्ज्ञांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. अ. ल. देशमुख म्हणाले...

- इयत्ता बारावीमध्ये नापास झालेल्या माझ्या अनेक विद्यार्थ्यांनी जीवनात उज्ज्वल यश संपादन केले आहे. बापू मेंगडे या विद्यार्थ्याने पुण्यातच इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात मोठी प्रगती केली. बारावीत नापास झाल्यानंतर त्याने इलेक्ट्रॉनिक्सचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण करून त्यातच करिअर केले.

- जामखेड जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याने बारावी नापास झाल्यावर स्वतःच्या शेतात डाळिंबाचे उत्पादन घ्यायला सुरुवात केली. सध्या तो जामखेड तालुक्यातील डाळिंब उत्पादनातील सर्वांत प्रगतीशील शेतकरी आहे.

जीवनात यश-अपयश येतच असते; त्यामुळे खचून न जाता प्रत्येक घटनेला धाडसाने सामोरे जायला शिकावे. जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत पुढे जाण्याचा प्रयत्न करावा. बारावीत अपयश आलेल्या विद्यार्थ्यांना जुलै महिन्यात पुन्हा परीक्षा देण्याची संधी आहे. त्यात उत्तीर्ण होऊन पुढील अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येऊ शकतो.

- शरद गोसावी, अध्यक्ष, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

काही वर्षांपासून इयत्ता बारावीचा निकाल ९० ते ९९ टक्क्यांपर्यंत लागत आहे. त्यामुळे नापासांची संख्या खूपच कमी आहे. पूर्वी केवळ ७० ते ८० टक्के विद्यार्थी बारावी उत्तीर्ण होत होते. उर्वरित विद्यार्थ्यांनी टोकाचे पाऊल न उचलता इतर पर्याय स्वीकारून आयुष्यात यश संपादन केले. कुटुंबीयांनीसुद्धा आपल्या मुलांचे वेळीच समुपदेशन करणे गरजेचे आहे.

- एन. के. जरग, माजी माध्यमिक शिक्षण संचालक

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडHSC Exam Resultबारावी निकाल