शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
5
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
6
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
7
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
8
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
9
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
10
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
11
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
12
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
13
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
14
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
15
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
16
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
17
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
18
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
19
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
20
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय

कारगिल युद्धातील शहिदांना मानवंदना ; दक्षिण मुख्यालयातर्फे कार्यक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 20:23 IST

भारतीय लष्कराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असणारा कारगिल विजयदिन शुक्रवारी नॅशनल वॉर मेमोरियल येथे साजरा करण्यात आला.

पुणे : भारतीय लष्कराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असणारा कारगिल विजयदिन शुक्रवारी नॅशनल वॉर मेमोरियल येथे साजरा करण्यात आला. भारतीय लष्कराने कडाक्याच्या थंडीत यशस्वीपणे पार पाडलेल्या ऑपरेशन विजयचे यानिमित्ताने स्मरण करण्यात आले. १९९९ मध्ये कारगिल युद्धात पाकिस्तानी लष्कराला हरवून भारताने विजय मिळवला होता. या युद्धातील शहिदांना लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एस. के. सैनी यांनी पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना वाहिली. 

कारगिल-द्रास सेक्टरमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये लढल्या गेलेल्या चौथ्या युद्धात २६ जुलै १९९९ रोजी भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला होता. या संपूर्ण मोहिमेला ऑपरेशन विजय नाव देण्यात आले होते. या कारगिल युद्धाला २० वर्षे पूर्ण झाली. भारतीय लष्कराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असणारा कारगिल विजयदिन लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातर्फे साजरा करण्यात आला. नॅशनल वॉर मेमोरियल येथे सकाळी लष्करातील वरिष्ठ अधिकारी, निवृत्त सैनिक उपस्थित होते. दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एस. के. सैनी यांनी पुष्पचक्र अर्पण करत शहिदांना आदरांजली वाहिली. या वेळी या युद्धात प्रत्यक्ष सहभागी झालेले अनेक माजी अधिकारी तसेच सैनिक उपस्थित होते. त्यांनीही त्यांच्या सहकारी बांधवांना आदरांजली वाहिली. या वेळी नागरिकांनीही या कार्यक्रमात सहभागी होत स्मारकापुढे मेणबत्या पेटवून शहिदांना बलिदान आठवत त्यांच्या कार्याचा गौरव केला. 

कारगिल विजयावर संरक्षण मंत्रालयातर्फे ऑनलाइन प्रश्नमंजूषासंरक्षण मंत्रालयातर्फे कारगिल विजयावर ऑनलाइन प्रश्नमंजूषा आयोजित करण्यात आली आहे. २६ जुलै ते ४ ऑगस्ट यादरम्यान, देशातील सर्वांना ही स्पर्धा ऑनलाइन देता येणार आहे. quiz.mygov.in या संकेतस्थळावर याबाबत सर्व माहिती देण्यात आली आहे. १४ वर्षांपुढील प्रत्येकाला यात सहभागी होता येणार आहे. या प्रश्नमंजूषेत पाच मिनिटांच्या कालावधीत २० प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहे. या स्पर्धेतील पहिल्या सात विजेत्यांना रोख स्वरूपात बक्षीस देण्यात येणार आहे. प्रथम क्रमांकासाठी २५ हजार, द्वितीय क्रमांकासाठी १५ हजार, तर तिसऱ्या क्रमांकासाठी १० हजार रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. तर सात विजेत्यांना उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून पाच हजार रुपये देण्यात येणार आहे.

टॅग्स :PuneपुणेKargil Vijay Diwasकारगिल विजय दिन