शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

‘झाड तुमचं, नावही तुमचंच मात्र संगोपन आमचं’; वृक्षसंवर्धनाचा एक अभिनव उपक्रम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 11:57 IST

रानमळा गावात गेल्या 20 ते 25 वर्षांपासून सामाजिक वनीकरनाचे काम उत्तमरीत्या सुरू

ठळक मुद्देखेड तालुक्यातील रानमळा ग्रामपंचायतीने हाती घेतलेला स्तुत्य उपक्रम रस्त्याच्या दुतर्फा 200 झाडे लावणार रस्त्याच्या दुतर्फा 200 झाडे लावणार रोजगार हमी योजनेअंतर्गत झाडांची काळजी घेण्यासाठी नेमण्यात आली आहेत माणसेअनेक वृक्षप्रेमी संघटना, संस्था, व्यक्ती यांचा उपक्रमात सहभाग

युगंधर ताजणे पुणे : वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे संत तुकाराम महाराज यांच्या या ओळीला सार्थक रुप देण्याचे काम खेड तालुक्यातील रानमळा ग्रामपंचायतीने हाती घेतले आहे. वास्तविक बिहार पॅटर्न या नावाने ओळखला गेलेला हा उपक्रम या गावाने आपल्याकडे 'झाड तुमचं, नावही तुमचंच संगोपन मात्र आमचं' या नावाने सुरू केला आहे. 200 झाडे लावण्याचे उद्धिष्ट समोर आहे. अशातच आतापर्यत 39 वृक्षप्रेमी नागरिकांनी 'ट्री गार्ड' देऊन त्यांचा उत्साह वाढवला आहे. रानमळा गावात गेल्या 20 ते 25 वर्षांपासून सामाजिक वनीकरनाचे काम उत्तमरीत्या सुरू आहे. त्यांनी सुरू केलेल्या रानमळा पॅटर्नची शासनाने देखील इतर गावाने देखील त्यांच्या सामाजिक कामाचे अनुकरण करावे यासाठी दोन 'जी आर' प्रसिद्ध केले आहेत. यंदा या गावातील नागरिक, पर्यावरण प्रेमी यांनी वृक्षसंवर्धनाचा एक आगळा वेगळा उपक्रम समोर आणला आहे. सध्या लॉकडाऊन असल्याने प्रत्यक्ष कामास जुलै महिन्यात सुरूवात होणार आहे. या उपक्रमात रस्त्याच्या दोन्ही बाजूला 200 झाडे लावण्यात येणार आहे. त्या झाडाच्या संरक्षणासाठी लागणारे 'ट्री गार्ड' वृक्षप्रेमी, पर्यावरणप्रेमी, काही सामाजिक संघटना यांनी उपलब्ध करून द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून 200 पैकी 39 झाडासाठी लागणारे ट्री गार्डचा प्रश्न सुटला असल्याची माहिती रानमळा पॅटर्न सुरू करणारे व पर्यावरणप्रेमी पी टी शिंदे गुरुजी यांनी दिली. ते म्हणाले, गावात गेल्या 24 ते 25 वर्षांपासून पर्यावरणाचे आणि सामाजिक वणीकरणाचे काम लोकसहभागातून सुरू आहे. अनेकजण त्यात सहभागी होत आहेत. 

२०० झाडे लावण्याचे उद्धिष्ट आहे. आता ग्रामस्थ, पर्यावरणप्रेमी यांचा सहभाग लक्षात घेता भविष्यात पुन्हा नवीन 200 झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेऊ असा विश्वास रानमळा गावकऱ्यांना आहे. सध्या दोन प्रकल्प सुरू आहेत. एका माणसाला एका दिवसाला ,28 किलो ऑक्सिजन लागतो .एक झाड एका दिवसात 7 किलो ऑक्सिजन देते. म्हणजेच एका माणसाला रोज 4 झाडे लागतात. 

रोजगार हमी योजनेअंतर्गत या झाडांची काळजी घेण्यासाठी माणसे नेमण्यात आली आहेत. गावातील माणसांना रोजगार मिळावा या उद्देशातून शासन हा उपक्रम हाती घेते. सध्या शहरातून आलेल्या व्यक्तीकडून या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्याकडून आर्थिक सहकार्य मिळते आहे. त्या झाडांना कमीतकमी तीन वर्षे पाणी घालणे ,त्यांची निगा राखणे ही सर्व जबाबदारी महाराष्ट्र शासनाच्या ' सामाजिक वनीकरण ' विभागाच्या सहकार्याने रानमळा ग्रामस्थ घेत आहोत .एका ट्री गार्ड चा खर्च अकराशे रुपये इतका आहे. यात अनेक वृक्षप्रेमी संघटना, संस्था, व्यक्ती आपला सहभाग नोंदवत आहेत. याचे समाधान आणि आनंद वाटतो. - पी टी शिंदे ( वनश्री पुरस्कार विजेते, रानमळा पॅटर्नचे निर्माते )

टॅग्स :Khedखेडenvironmentपर्यावरण