शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
4
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
5
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
6
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
7
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
8
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
9
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
11
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
12
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
13
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
14
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
15
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
16
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
17
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
18
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
19
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
20
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर

वृक्षारोपण एकट्या वनखात्याची जबाबदारी नाही, ते सर्वांचे कर्तव्य- गिरीश बापट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2018 13:09 IST

वृक्ष लागवड करणे सोपे आहे, मात्र त्यापेक्षा त्याची देखभाल करणे तितकेच आव्हानात्मक काम आहे. या पुढील काळात प्रत्येक नागरिकाने किमान पाच झाडे लावण्याची जबाबदारी स्वीकारून वृक्षरोपणास हातभार लावला पाहिजे.

पुणे : वृक्ष लागवड करणे सोपे आहे, मात्र त्यापेक्षा त्याची देखभाल करणे तितकेच आव्हानात्मक काम आहे. या पुढील काळात प्रत्येक नागरिकाने किमान पाच झाडे लावण्याची जबाबदारी स्वीकारून वृक्षरोपणास हातभार लावला पाहिजे. वृक्षारोपण ही केवळ एकट्या वनखात्याची जबाबदारी नसून ती सर्वांची आहे, असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या १३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात बापट बोलत होते. याप्रसंगी आमदार विजय काळे, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक जितसिंग, पुणे विभागाचे मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, लक्ष्मी ए, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर, मुख्य कार्यकारी अधिकारी  सूरज मांढरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे आदी मान्यवर उपस्थित होते.बापट म्हणाले, वृक्षारोपण सारख्या महत्त्वाच्या उपक्रमाचे श्रेय वनविभागाला द्यावे लागेल. भविष्यात पर्यावरणाचे स्वरूप काय असेल, किती भयानक परिस्थतीला आपणाला सामोरे जावे लागेल याचा अभ्यास करून त्यांनी वनीकरनाचा उपक्रम हाती घेतला आहे. समाजात गुटगुटीत निसर्ग फुलला पाहिजे यासाठी कुणा एकट्याचे प्रयत्न पुरेसे नसून त्यात सार्वजनिक पातळीवर एकजुटीने सामाजिक वृक्षारोपणाचा संदेश रुजायला हवा. याबरोबरच निसर्गाशी भांडण न करता त्याला सोबत घेऊन काम करण्याची गरज असून नागरिकांनी केवळ संकल्पावर विसंबून न राहू नये. खरे तर दहा वर्षांपूर्वीच  पर्यावरणाच्या जनजागृती बद्दल विविध पातळीवर प्रयत्न व्हायला हवे होते . मात्र ते न झाल्याने मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण कार्यक्रम हाती घ्यावा लागत आहे. अशा शब्दांत बापट यांनी विरोधी पक्षावर टीका केली.   यावेळी उपस्थित अधिकारी, विद्यार्थी, नागरिक, कार्यकर्ते, स्वयंसेवक यांनी वृक्षप्रतिज्ञा घेतली. तसेच पालकमंत्री व अधिकारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. वनाधिकारी सत्यजित गुजर यांनी आभार मानले.२०० झाडामागे नेमणार एक पालककेवळ झाडे लावून प्रश्न सुटणार नसून त्याची देखभाल करणे हा तितकाच महत्वाचा प्रश्न आहे. याकरिता शासनाच्या वतीने यापुढील काळात २०० झाडांमागे त्याचे संगोपन करण्याकरिता एक पालक नेमणार आहे. त्या झाडांचे पालकत्व घेणाऱ्या कुटुंबाला वर्षाला ५ हजार रुपये देण्यात येणार असून त्या झाडांच्या देखभालिची जबाबदारी त्या कुटुंबावर सोपविण्यात येणार असल्याचे मांढरे यांनी सांगितले. हे पालकत्व म्हणजे वृक्षारोपण उपक्रमाला भावनात्मक जोड देण्याचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले.प्रत्येक झाडाला जिओ टॅग करणारराज्यात सातत्याने कमी होत चाललेल्या वृक्षांची संख्या वाढविण्यासाठी वृक्षारोपण स्तुत्य उपक्रम असून आतापर्यंत जी झाडे लावण्यात आलेली आहेत त्यांच्या देखभालीसाठी त्या प्रत्येक झाडांवर जिओ टॅग लावणार असल्याची माहिती डॉ. दीपक म्हैसकर यांनी दिली. यामुळे सबंधित झाड हे कुठल्या अवस्थेत आहे याची माहिती मिळण्यास मदत होणार असून जास्तीत जास्त वृक्षारोपण वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.

टॅग्स :Puneपुणे