शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
3
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी सर्वात कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
5
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
8
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
9
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
10
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
11
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
12
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
13
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
14
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
15
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
16
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
17
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
18
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

पुण्यात सिंहगड रस्त्यावरील झाडांच्या फांद्यांवर जनादेश यात्रेचीच संक्रात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 12:00 IST

मुख्यमंत्र्यांच्या जनादेश यात्रेला अडथळा होऊ नये म्हणूनच सिंहगड रस्त्यावरील ५० पेक्षा जास्त झाडांच्या फांद्या खोडापासून तोडल्याचे स्पष्ट होत आहे.

ठळक मुद्देआता अन्य कारणांचा दावापालन झाले नाही तर संबधितांवर गुन्हा दाखल करण्याची तरतूदयाच पद्धतीने कोणताही वृक्ष किंवा त्याची फांदीही तोडली जाणे अपेक्षित

पुणे: मुख्यमंत्र्यांच्या जनादेश यात्रेतील भल्या मोठ्या उंचीच्या रथसदृश वाहनाला अडथळा होऊ नये म्हणूनच सिंहगड रस्त्यावरील ५० पेक्षा जास्त झाडांच्या फांद्या त्यांच्या खोडापासून तोडल्याचे स्पष्ट होत आहे. याबाबत ओरड होऊ लागल्यावर आता रस्त्यावरच्या वाहनांना तसेच विजेच्या तारांना अडथळा होत असल्यामुळे ही कारवाई केली असल्याचे सांगण्यात येत आहे. एखाद्या वृक्षाची फांदी तोडायची असेल तर त्यासाठी कायदा केला आहे. पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीकडे अर्ज करावा, वृक्ष अधिकारी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करेल व अहवाल तयार करेल, त्यानंतर समितीत या अहवालावर चर्चा होईल, आवश्यकता असेल तर समितीचे सदस्य पाहणी करतील व त्यानंतर परवानगी मिळेल असा नियम आहे. त्याचे पालन झाले नाही तर संबधितांवर गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे. त्याला दंडात्मक किंवा कारावासाचीही शिक्षा आहे. याच पद्धतीने कोणताही वृक्ष किंवा त्याची फांदीही तोडली जाणे अपेक्षित आहे.ज्या समितीने हे सर्व करायचे त्याच समितीने सिंहगड रस्त्यावर जुन्या डेरेदार वृक्षांच्या फांद्यावर कुकुऱ्हाड ºहाड चालवली आहे. सिंहगड चौकापासून पुढे थेट राजाराम पुलापर्यंत किमान ५० वृक्षांच्या फांद्या यात बेमुर्वतपणे तोडल्या आहेत. अडथळा ठरेल इतकाच भाग तोडणे अपेक्षित असते. प्रत्यक्षात मात्र या फांद्या थेट खोडापासूनच तोडल्या आहेत. झाडाचे नुकसान होईल, खरोखरच गरज आहे का याची काहीही काळजी न घेता ही तोड झाली असल्याचे स्पष्ट निदर्शनास येते आहे. फांदी तोडलेल्या काही झाडांची पाहणी केली तरी ही बाब लगेचच लक्षात येते.मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील त्यांचे रथसदृश वाहन बरेच उंच होते. त्यावर पुन्हा वरील बाजूला स्टेज तयार केले होते. त्यावर मुख्यमंत्र्यांसह लोकप्रतिनिधी उभे राहणार व त्यांच्या पुढूमागून अन्य वाहने धावणार अशी ही जनादेश यात्रा होती. या उंच वाहनाला कसलाही अडथळा होऊ नये याची काळजी म्हणून वृक्ष प्राधिकरण समितीने ही फांदीतोड विनापरवाना केली. वीज वितरण कंपनी, पीएमपीएल यांनी परवानगी मागणारे अर्ज केले होते, अशी महिती आता प्रशासनाकडून सांगण्यात येते. परवानगी त्यांना द्यायची तर तोडही त्यांनाच का करू दिली नाही याचे उत्तर या खात्याकडे नाही. या रस्त्यांवरून धावणारे अन्य कोणतेही वाहन मुख्यमंत्र्यांच्या त्या रथसदृश वाहनाइतके उंच असत नाही.ज्या शहरांमधून ही यात्रा आली व पुढे ज्या शहरांमध्ये जाणार आहे तिथेही रस्त्यावर अडथळा येत असलेल्या फांद्या याच पद्धतीने तोडण्यात येतात, त्यामुळे पुण्यातच त्याचे इतके अवडंबर माजवण्याची गरज नाही असे यावर बहुसंख्य भाजपा पदाधिकाºयांचे मत आहे. 

टॅग्स :PuneपुणेMaha Janadesh Yatraमहाजनादेश यात्राBJPभाजपाElectionनिवडणूकPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका