शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

पुण्यात सिंहगड रस्त्यावरील झाडांच्या फांद्यांवर जनादेश यात्रेचीच संक्रात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 12:00 IST

मुख्यमंत्र्यांच्या जनादेश यात्रेला अडथळा होऊ नये म्हणूनच सिंहगड रस्त्यावरील ५० पेक्षा जास्त झाडांच्या फांद्या खोडापासून तोडल्याचे स्पष्ट होत आहे.

ठळक मुद्देआता अन्य कारणांचा दावापालन झाले नाही तर संबधितांवर गुन्हा दाखल करण्याची तरतूदयाच पद्धतीने कोणताही वृक्ष किंवा त्याची फांदीही तोडली जाणे अपेक्षित

पुणे: मुख्यमंत्र्यांच्या जनादेश यात्रेतील भल्या मोठ्या उंचीच्या रथसदृश वाहनाला अडथळा होऊ नये म्हणूनच सिंहगड रस्त्यावरील ५० पेक्षा जास्त झाडांच्या फांद्या त्यांच्या खोडापासून तोडल्याचे स्पष्ट होत आहे. याबाबत ओरड होऊ लागल्यावर आता रस्त्यावरच्या वाहनांना तसेच विजेच्या तारांना अडथळा होत असल्यामुळे ही कारवाई केली असल्याचे सांगण्यात येत आहे. एखाद्या वृक्षाची फांदी तोडायची असेल तर त्यासाठी कायदा केला आहे. पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीकडे अर्ज करावा, वृक्ष अधिकारी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करेल व अहवाल तयार करेल, त्यानंतर समितीत या अहवालावर चर्चा होईल, आवश्यकता असेल तर समितीचे सदस्य पाहणी करतील व त्यानंतर परवानगी मिळेल असा नियम आहे. त्याचे पालन झाले नाही तर संबधितांवर गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे. त्याला दंडात्मक किंवा कारावासाचीही शिक्षा आहे. याच पद्धतीने कोणताही वृक्ष किंवा त्याची फांदीही तोडली जाणे अपेक्षित आहे.ज्या समितीने हे सर्व करायचे त्याच समितीने सिंहगड रस्त्यावर जुन्या डेरेदार वृक्षांच्या फांद्यावर कुकुऱ्हाड ºहाड चालवली आहे. सिंहगड चौकापासून पुढे थेट राजाराम पुलापर्यंत किमान ५० वृक्षांच्या फांद्या यात बेमुर्वतपणे तोडल्या आहेत. अडथळा ठरेल इतकाच भाग तोडणे अपेक्षित असते. प्रत्यक्षात मात्र या फांद्या थेट खोडापासूनच तोडल्या आहेत. झाडाचे नुकसान होईल, खरोखरच गरज आहे का याची काहीही काळजी न घेता ही तोड झाली असल्याचे स्पष्ट निदर्शनास येते आहे. फांदी तोडलेल्या काही झाडांची पाहणी केली तरी ही बाब लगेचच लक्षात येते.मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील त्यांचे रथसदृश वाहन बरेच उंच होते. त्यावर पुन्हा वरील बाजूला स्टेज तयार केले होते. त्यावर मुख्यमंत्र्यांसह लोकप्रतिनिधी उभे राहणार व त्यांच्या पुढूमागून अन्य वाहने धावणार अशी ही जनादेश यात्रा होती. या उंच वाहनाला कसलाही अडथळा होऊ नये याची काळजी म्हणून वृक्ष प्राधिकरण समितीने ही फांदीतोड विनापरवाना केली. वीज वितरण कंपनी, पीएमपीएल यांनी परवानगी मागणारे अर्ज केले होते, अशी महिती आता प्रशासनाकडून सांगण्यात येते. परवानगी त्यांना द्यायची तर तोडही त्यांनाच का करू दिली नाही याचे उत्तर या खात्याकडे नाही. या रस्त्यांवरून धावणारे अन्य कोणतेही वाहन मुख्यमंत्र्यांच्या त्या रथसदृश वाहनाइतके उंच असत नाही.ज्या शहरांमधून ही यात्रा आली व पुढे ज्या शहरांमध्ये जाणार आहे तिथेही रस्त्यावर अडथळा येत असलेल्या फांद्या याच पद्धतीने तोडण्यात येतात, त्यामुळे पुण्यातच त्याचे इतके अवडंबर माजवण्याची गरज नाही असे यावर बहुसंख्य भाजपा पदाधिकाºयांचे मत आहे. 

टॅग्स :PuneपुणेMaha Janadesh Yatraमहाजनादेश यात्राBJPभाजपाElectionनिवडणूकPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका