शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

राजद्रोह...कायदा तोच राहिला, पण सरकारं अनेक बदलली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 14:42 IST

लोकमान्य टिळकांना राजद्रोहाच्या आरोपात अटक केलेल्या घटनेस मंगळवारी (दि. २७) सव्वाशे वर्ष होत आहेत.

नम्रता फडणीस -

पुणे : चाफेकर बंधूंनी २३ जून १८९७ रोजी रँडची गोळ्या घालून हत्या केली. तेव्हा इर्षेला पेटलेल्या ब्रिटिश सरकारने दडपशाही सुरू केल्याने लोकमान्य टिळकांनी ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय’ आणि ‘राज्य करणे म्हणजे सूड घेणे नव्हे’ असे जळजळीत अग्रलेख लिहिले. टिळकांच्या अग्रलेखांमुळे त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला दाखल केला. हा पहिला राजद्रोहाचा खटला दाखल झाला होता. टिळकांना राजद्रोहाच्या आरोपात अटक केलेल्या घटनेस मंगळवारी (दि. २७) सव्वाशे वर्ष होत आहेत. आजही ‘राजद्रोह’ कायदा ब्रिटिशकालीनच आहे, दरम्यान, अनेक सरकारे बदलली आहेत.

ब्रिटिशांनी भारतीय दंडविधान संहिता १८६० साली अमलात आणली. १८७० मध्ये त्यात दुरुस्ती करून कलम १२४-अ चा समावेश करून ‘देशद्रोह’च्या गुन्ह्याचा यात अंतर्भाव करण्यात आला. देश स्वतंत्र होऊन ७० वर्षांचा काळ उलटला, मात्र ब्रिटीशांनी केलेल्या या कायद्यात एकाही सरकारने बदल केला नाही किंवा हा कायदा रद्द करण्याचे धारिष्ट्य दाखविले नाही. नुकतीच सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला ‘राजद्रोह’ कायदा का रद्द करू नये यासंबंधी विचारणा केली आहे. एकीकडे राज्यघटनेच्या कलम १९ मध्ये विचार स्वातंत्र्य, देशात कुठेही राहाण्याचे स्वातंत्र्य, व्यवसाय स्वातंत्र्य असे अधिकार दिले आहेत. मात्र देशात जी जी सरकारे आली त्यांच्याकडून नागरिकांच्या स्वातंत्र्याची गळचेपी करण्यात आली. हा राजद्रोहाचा कायदा रद्द झाला पाहिजे, अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया जनमानसामधून उमटत असल्या, तरी सरकार मात्र अद्यापही याबाबत ‘मौन’ बाळगून आहे. ब्रिटिशांनी लागू केलेल्या या कायद्यात इतक्या वर्षात कोणताही बदल झाला नसल्याचे राज्यघटनेचे अभ्यासक प्रा. उल्हास बापट यांनी ‘लोकमत’ ला सांगितले.

-------------------

लोकमान्य टिळकांवर भारतीय दंडविधान संहितेच्या कलम १२१ अ अंतर्गतच खटला भरण्यात आला होता. त्यात इतक्या वर्षात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या कलमांतर्गत आजही चुकीचे खटले भरले जात आहेत. या कलमाचा सरकारकडून एक हत्यार म्हणून वापर केला जात आहे. गेल्या सहा वर्षात राजद्रोहाअंतर्गत दाखल झालेल्या केसेसची संख्या तिप्पटीने वाढली आहे.

- प्रा.उल्हास बापट, घटनातज्ज्ञ

----------------------------

आजही सरकारविरूद्ध काही बोलले तर ‘राजद्रोहा’ अंतर्गत खटला दाखल होऊ शकतो. खरंतर ब्रिटिशांनी हा कायदा स्वत:च्या हितासासाठी केला होता. मात्र स्वतंत्र भारतात प्रत्येक सरकारने वेळोवेळी या कायद्याचा वापर केला . देश स्वतंत्र होऊन ७० वर्षांचा काळ उलटला तरी कायदा रदद करणे किंवा त्याची व्याख्या बदलणे याकरिता एकाही सरकारने पावले उचलली नाहीत. थोडक्यात काय तर कायदा तोच पण सरकारे बदलली आहेत.

- ॲड. रोहित एरंडे

------------------------------------------------------

टॅग्स :PuneपुणेLokmanya Tilakलोकमान्य टिळकjailतुरुंग