शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

विभागप्रमुखांकडून कागदोपत्री बदल्या

By admin | Updated: December 30, 2014 00:08 IST

विभागात ठाण मांडून बसल्याचा विषय ऐरणीवर आल्यानंतर अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी कागदोपत्री केलेल्या बदल्या प्रत्यक्षात आणण्याचे आदेश दिले होते.

पुणे : महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच विभागात ठाण मांडून बसल्याचा विषय ऐरणीवर आल्यानंतर अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी कागदोपत्री केलेल्या बदल्या प्रत्यक्षात आणण्याचे आदेश दिले होते. बहुतांश विभागप्रमुखांनी या आदेशास केराची टोपली दाखविली असून, एकानेही त्याची अंमलबजावणी केल्याचा अहवाल दिलेला नाही.पुणे मनपाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या बदल्यासंदर्भातील धोरण सर्वसाधारण सभेने काही वर्षांपूर्वी निश्चित केले आहे. मात्र, प्रत्यक्षात या धोरणाची अंमलबजावणीच होत नसल्याचे चित्र आहे. अनेक विभागांतील अधिकारी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत राहिल्याने त्यांचे हितसंबंध तयार झाले आहेत. यातून मिळणारा ‘मलिदा’ लाटण्यासाठी त्यांच्याकडून बदल्यांचे आदेश प्रत्यक्षात आणले जात नाहीत. प्रशासनाने बदली केली, तरी ती कागदोपत्रीच राहते, प्रत्यक्षात ते जुन्या खात्यातच काम करीत राहतात. एखाद्या अधिकारी व कर्मचाऱ्याची बदली झाल्यानंतर त्याला लगेच विभागप्रमुखांनी कार्यमुक्त करणे आवश्यक आहे. काम एकीकडे आणि पगार दुसऱ्या खात्यातून असे अनेक प्रकार महापालिकेमध्ये सुरू आहेत. प्रसारमाध्यमातून यावर मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर अतिरिक्त आयुक्तांनी १२ डिसेंबर २०१४ पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. एकाही विभागप्रमुखांनी तो अहवाल सादर केलेला नाही. सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर व विश्वास सहस्रबुद्धे यांनी महापालिका आयुक्तांच्या निदर्शनासही बाब आणून दिली. बांधकाम विभागात सर्वाधिक गोंधळ४पालिकेच्या बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या दुसऱ्या विभागात झाल्यानंतर ते तिकडे रूजच होत नाहीत. दुसरीकडे बदली झाल्यानंतरही बांधकाम विभागातच काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे.पालिकेतील किमान ५० अधिकारी बदल्या होऊनही दुसऱ्या विभागात रूजू झालेले नाहीत. ४सर्वसाधारण सभेची, अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशाची पायमल्ली करणारे अधिकारी, विभागप्रमुखांवर कारवाई करण्याची मागणी सजग नागरिक मंचाच्या वतीने करण्यात आली आहे.