शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

बारामतीत उद्यापासुन व्यवहार होणार पूर्ववत, व्यापारी वर्गासह नागरिकांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2020 19:09 IST

सर्वच दुकाने शासकीय अटी आणि शर्थींचे पालन करुन खुली ठेवण्यात येणार

ठळक मुद्देसकाळी ९ ते ५ या वेळेत काही अपवाद वगळता सर्व दुकाने सुरु करण्यास शासनाने परवानगी दुकानप्रवेशद्वारावर थर्मल स्क्रीनिंग सुविधा असणे आवश्यकहॉटेल, लॉज, सलून, शाळा, महाविद्यालय राहणार बंद

बारामती : अखेर ५५ दिवसानंतर बारामतीची बाजारपेठ फुलणार आहे. शहरात शुक्रवार (दि. २२) पासून दररोज व्यवहार सुरू होणार आहेत.त्यामुळे व्यापारी वर्गासह नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र,यातुन आता मात्र हॉटेल, लॉज, सलून, रेस्टॉरन्ट, शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेसना वगळण्यात आले आहे.

पुणे शहराच्या धर्तीवर रोटेशन पध्दतीने दुकाने सुरु करण्यास प्रशासनाने ११ मे पासुन परवानगी दिली होती.त्यानुसार विविध दुकानांना वार ठरवुन देण्यात आले होते. गेल्या दहा दिवसांपासुन बाजारपेठ याच तत्वावर सुरु होती. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या मागणीसह जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरूवात झाली .नुकताच कापड आणि स्वीट होम दुकाने उघडण्याचे दिवसामध्ये मंगळवार(दि.१९) पासुन बदल करण्यात आला होता.आता मात्र   हॉटेल, लॉज, सलून, रेस्टॉरन्ट, शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस आदी वगळता इतर सर्व दुकाने ९ ते ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. ऑटोमोबाईल , संगणक, ई लेक्ट्रॉनिक , रेडिमेड फर्निचर, मोबाईल शॉप, फोटो स्टुडिओ, , बॅटरि, खेळणी , फुले व पुष्पहार ,  भांडी , टेलरिंग , सोने दुकाने, रस्सी पत्रावळी , फूट वेअर, ज्वेलरी , घड्याळ , सूटकेस बॅग ,जनरल स्टोअर , सायकल , टायर , पंक्चर , स्टील ट्रेडर, स्क्रप , हार्डवेअर , बिल्डिंग मटेरियल , पेंट , कार वॉशिंग , डिजिटल प्रेस प्रिंटिंग, झेरॉक्स , मातीची भांडी दुकाने , टोपल्या आदी दुकाने सुरू ठेवण्यासाठीयापुर्वी वार ठरविण्यात आले होते. आता मात्र, सर्वच दुकाने शासकीय अटी आणि शर्थींचे पालन करुन खुली ठेवण्यात येणार आहेत. प्रशासन भवन येथे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी याबाबत व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली.यावेळी महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र गुजराथी, रमणिक मोता,सुभाष सोमाणी,स्वप्नील मुथा,शैलेश साळुंके आदी उपस्थित होते.

याबाबत ' लोकमत'शी बोलताना महासंघाचे अध्यक्ष गुजराथी यांनी सांगितले, राज्य शासनाचे मुख्य सचिव अजोय  मेहता यांनी याबाबत सुचना दिल्या आहेत.त्यानुसार सर्वत्र हा नियम लागु होणार आहे.सकाळी ९ ते ५ या वेळेत  काही अपवाद वगळता सर्व दुकाने सुरु करण्यास शासनाने परवानगी दिली आहे.त्यानुसार सर्व व्यापारी वर्ग शासनाच्या नियमांचे पालन करणार आहे. २२ ते ३१ मे पर्यंत या पध्दतीने दुकाने सुरु राहणार आहेत. ३१ मे रोजी राज्य शासन सुधारीत आदेश देणार आहेत.त्यानंतर दुकाने सुरु ठेवण्याबाबतचे वेगळे नियोजन ठरणार आहे .

दरम्यान, एका वेळी ५ ते १०ग्राहकांना दुकानात सोडण्यात येणार आहे , दुकानप्रवेशद्वारावर थर्मल स्क्रीनिंग सुविधा असणे आवश्यक आहे.याशिवाय कोरोना संसर्ग रोखण्यास विविध दक्षता घेण्याच्या सूचना कायम ठेवण्यात आल्या आहेत.प्रत्येकाने मास्कचा वापर करणे, शारीरिक अंतर राखणे, सॅनिटायझरचा वापर , दुकानांमध्ये गर्दी होणार नाही, याची काळजी घेणे याशिवाय कोरोना संसर्ग रोखण्यास विविध दक्षता घेण्याच्या सूचना कायम ठेवण्यात आल्या आहेत.  नवीन निर्णयाप्रमाणे सर्व अस्थापना दैनंदिन सुरू होणार आहे.

टॅग्स :Baramatiबारामतीbusinessव्यवसायCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस