शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

सीमेवरील परिस्थितीनुसार जवानांना प्रशिक्षण : ब्रिगेडियर गोविंद कलवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 18:43 IST

जवानांना पारंपरिक लष्करी प्रशिक्षणाबरोबर दशतवादविरोधात लढण्यासाठी तयार करण्यात येत आहे अशी माहिती, बेळगाव येथील मराठा लाईट इन्फन्ट्रीचे कामांडीग आॅफिसर ब्रिगेडियर गोविंद कलवड यांनी दिली.

ठळक मुद्देमराठा लाईट इन्फन्ट्रीमधील जवानांना दिले जात आहे ३४ आठवड्यांचे अवघड प्रशिक्षण मोबाईल आणि सोशल नेटवर्किंग साईट्समुळे सायबर सुरक्षा हा मोठा प्रश्न : गोविंद कलवड

पुणे : आज लष्कराला बंडखोरी, दहशतवाद, घुसखोरी आणि नक्षलवाद या देशांतर्गत प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे. जम्मू काश्मीर आणि ईशान्येकडील राज्यात रोज जवानांना याचा सामना करावा लागत आहे, या विरोधात लढण्यासाठी त्यांना आधुनिक प्रशिक्षणाची गरज आहे, बेळगाव येथे हे प्रशिक्षण देण्यासाठी अत्याधुनिक सुविधांबरोवर सीमेवरील भोगोलिक परिस्तितीतीचा विचार करून त्याचे प्रारूप तयार करण्यात आले आहे, बेळगाव जवळील रोहिडेश्वर या ठिकाणी ते उभारण्यात आले असून जवानांना पारंपरिक लष्करी प्रशिक्षणाबरोबर दशतवादविरोधात लढण्यासाठी तयार करण्यात येत आहे अशी माहिती, बेळगाव येथील मराठा लाईट इन्फन्ट्रीचे कामांडीग आॅफिसर ब्रिगेडियर गोविंद कलवड यांनी दिली.मराठा लाईट इन्फन्ट्रीच्या जवानांना देण्यात येणारे प्रशिक्षणादरम्यान आयोजित प्रात्यक्षिक कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना कलवड बोलत होते. ब्रिगेडियर कलवड पुढे म्हणाले, जम्मू-काश्मीर, ईशान्य भारतात दहशतवाद, बंडखोरी, घुसखोरी कारवाया सोबतच नक्षलवादी कारवायांना लष्कराला सामोेरे जावे लागत आहे. सीमावर्ती भागातील परिस्थितीचा विचार करून मराठा लाईट इन्फन्ट्रीमध्ये जवानांना मूलभूत प्रशिक्षणासोबतच अत्याधुनिक प्रशिक्षण दिले जात आहे. त्यादृष्टीने जवळील रोहिडेश्वर येथे प्रशिक्षण केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. बदलत्या युद्धभूमीचा विचार करून पारंपरिक प्रशिक्षणाबरोबर नव्या तंत्राचा वापर करून त्यांना प्रशिक्षित केले जात आहे. मराठा लाईट इन्फन्ट्रीमधील जवानांबरोबर राष्ट्रीय रायफल्समध्ये भरती होणाऱ्या जवानांना तसेच मित्र देशातील सैनिकांनाही या ठिकाणी ३४ आठवड्यांचे अवघड प्रशिक्षण दिले जात आहे. जवानांना शारीरिक, मानसिक व शस्त्रास्त्र चालविण्यास निपुण करण्यात येत आहे. हे प्रशिक्षण देण्यासाठी रेजिमेंट मध्ये पायाभूत सोयीसुविधांचा विकास करण्यात आला आहे. त्यात वेळोवेळी अद्ययावत सुधारणा केल्या जात आहे. वाढत्या सायबर गुन्ह्यांबाबत कलवड म्हणाले, की सायबर सुरक्षा हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मोबाईल आणि सोशल नेटवर्किंग साईट्समुळे ही समस्या आणखी जटिल होत आहे. आज प्रत्येकाकडे मोबाईल आहे. त्याच्या वापरावर बंधने नाही आणता येऊ शकत. येथील जवानांना सायबर सुरक्षेबाबत जागृत केले जात आहे. जवानांना मोबाईल आणि सोशल नेटवर्किंग साईट्सचा नेमका वापर कसा करावा आणि कशापद्धतीने सुरक्षितरित्या केला जावा याबाबतची माहिती दिली जात आहे. बहुतांशी जवान हे ग्रामीण भागातून प्रशिक्षणासाठी येत असून त्यांना संपूर्णपणे मोबाईल बंदी करता येणे शक्य नाही. 

दशतवादविरोधी कारवाईचे प्रात्यक्षिकदहशतवादाविरोधात कशापद्धतीने कारवाई केली जाते, याचे प्रात्यक्षिक यावेळी दाखवण्यात आले. डोंगरी भागांत घरामध्ये लपलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी हेलिकॉप्टरद्वारे जवानांची एक तुकडी खाली उतरते. लष्करी डावपेच आखत समन्वय साधत या दहशतवाद्यांचा खात्मा जवानांनी केला. खरोखर वाटणाऱ्या या कारवाई मुळे उपस्थितांच्या अंगावर शहारा आणला.

 

मराठा रेजिमेंटला २५० वर्ष पूर्णमराठा रेजिमेंटला २०१८ मध्ये २५० वर्ष पूर्ण होत आहेत. हे वर्ष साजरे करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात निवृत्त अधिकारी आणि जवनासाठी पेन्शन अदालत, माजी सैनिक मेळावा, शहीद जवांनाच्या कुटुंबीयांचा सन्मान असे विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटकSoldierसैनिक