शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वाहतूक पोलिसांकडून महिन्यात कोटीची वसुली, ३० हजारांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 04:12 IST

वाहतूक नियम मोडणाºया वाहनचालकांवर डिव्हाईसच्या माध्यमातून कारवाई करूनही ज्यांनी दंड भरला नाही, अशा वाहनचालकांवर वाहतूक शाखेकडून नाकाबंदी करून दंड वसूल करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे़ गेल्या ६ फेबु्रवारीपासून सुरू केलेल्या या मोहिमेत महिनाभरात सुमारे १ कोटी रुपयांचा दंड आतापर्यंत वसूल करण्यात आला आहे. 

पुणे - वाहतूक नियम मोडणाºया वाहनचालकांवर डिव्हाईसच्या माध्यमातून कारवाई करूनही ज्यांनी दंड भरला नाही, अशा वाहनचालकांवर वाहतूक शाखेकडून नाकाबंदी करून दंड वसूल करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे़ गेल्या ६ फेबु्रवारीपासून सुरू केलेल्या या मोहिमेत महिनाभरात सुमारे १ कोटी रुपयांचा दंड आतापर्यंत वसूल करण्यात आला आहे. वाहतूक नियम मोडणाºया वाहनचालकांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून वाहतूक शाखेकडून दंडआकारणी केली जात असून, गेल्या वर्षभरात अशा ६ लाख ७३ हजार ९९२ जणांवर सीसीटीव्ही आणि डिव्हाईसच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली.या वाहनचालकांना एसएमएस पाठविला व दंड भरण्यास सांगण्यात आले होते़ तरीही अनेकांनी या मेसेजकडे दुर्लक्ष केले़ त्यामुळे वाहतूक शाखेकडे दंडआकारणी करूनही प्रत्यक्षात दंडवसुली होत नसल्याचे दिसून येत होते़ त्यामुळे ज्या वाहनचालकांनी हा दंड भरलेला नाही अशा वाहनाचालकांची नाकाबंदीत तपासणी करून त्यांच्याकडून दंडवसुली केली जात आहे़अशी केली जाते दंडवसुलीवाहतूक शाखेच्या वतीने दररोज २ तास शहरातील विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात येते़ वाहतूक पोलिसांना एक मोबाईल अ‍ॅप देण्यात आले आहे़ त्यावर वाहनाचा नंबर टाकल्यावर त्या वाहनावर काही कारवाई केली असेल, तर त्याची माहिती येते़ त्यात चलन नंबर, कधी, कोठे व केव्हा नियमभंग केला, कोणता नियम तोडला आणि त्याला किती दंड आहे, याची माहिती येते़ त्याबरोबर फोटोही येतो़ याशिवाय या दंडाची रक्कम भरली आहे की नाही, याचीही माहिती त्यासोबत मिळते़ तसेच, अशा प्रकारे गेल्या वर्षभरात एकापेक्षा अधिक वेळा नियमभंग केला असेल तर त्याचीही माहिती त्यावर दिसते़ त्यानुसार पोलीस वाहनचालकांवर कारवाई करीत आहेत़ वाहतूक पोलिसांच्या वेबसाईटवरही हे अ‍ॅप असून त्यावर आपल्या वाहनाचा नंबर टाकल्यास कारवाई केली आहे की नाही, त्याची माहिती मिळते.गेल्या ६ फेबु्रवारीपासून वाहतूक पोलिसांनी ही मोहीम सुरू केली असून ४ मार्चअखेरपर्यंत तब्बल ३० हजार १८४ वाहनचालकांकडून ९५ लाख २८ हजार ५० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे़ नव्या वर्षात ई-चलानाद्वारे दंडआकारणी केलेल्या ५३ हजारांहून अधिक वाहनचालकांकडून दंडवसुली करण्यात आली असून, वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे, यासाठी ही मोहीम सुरू केली आहे़- अशोक मोराळे,पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा़ 

टॅग्स :Puneपुणेtraffic policeवाहतूक पोलीस