शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
3
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
4
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
5
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
6
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
7
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
8
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
9
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
10
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
11
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
12
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
13
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
14
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
15
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
16
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
17
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
18
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
19
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
20
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार

पारंपरिक तमाशा फड कर्जाच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 3:05 AM

तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ येत आहे. तमाशा सुरू ठेवण्यासाठी काढलेल्या कार्जाची फेड वेळेवर करता करता तमाशाचालकांच्या नाकीनऊ येत असून आॅर्केस्ट्राच्या वाढत्या प्रमाणामुळे तमाशा कालबाह्य होत आहे.

- भरत निगडेनीरा -  पूर्वी गावातील जत्रांची शान असणारा तमाशा काळाच्या ओघात मागे पडला आहे. कुण्या गावाचं आलं पाखरू... याभावजी...बसा रावजी, सोळावं वरीस धोक्याचं यांसारखी कायम तोंडी गुणगुणली जाणारी पारंपरिक गीते आजही लोकप्रिय आहेत; मात्र या दोन दशकांचा विचार करता जनमानसाच्या हृदयावर राज्य करू शकतील अशी नवीन गीते तमाशात पुन्हा निर्माण झाली नाहीत किंवा लोकप्रिय झाली नाहीत. पूर्वीच्या तुलनेत तमाशांच्या फडाचे प्रमाण कमी झाले असून, तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ येत आहे. तमाशा सुरू ठेवण्यासाठी काढलेल्या कार्जाची फेड वेळेवर करता करता तमाशाचालकांच्या नाकीनऊ येत असून आॅर्केस्ट्राच्या वाढत्या प्रमाणामुळे तमाशा कालबाह्य होत आहे.स्वातंत्र्यपूर्व काळात तमाशाला चांगले दिवस होते. त्यानंतर ८०च्या दशकात तमाशा मंडळे वाढली. विसाव्या शतकाच्या पूर्ततेपर्यंत तमाशा मंडळांची संख्या; तसेच लोककलावंतांचा आदर मानसन्मान होत होता.मात्र, गेल्या ही लोककलेला मारक ठरली. पाशात्य नृत्यप्रकारांची तरुणांवर असलेली भुरळ, मराठी, तमीळ, हिंदी चित्रपटांची मोठ्या प्रमाणावर झालेली निर्मिती तसेच वाढती चित्रपटगृहे यांकडे जनमानसाचा कल राहिला. त्यानंतर तमाशा केवळ यात्रा किंवा जत्रेचा एक औपचारिक भाग म्हणून आणला आणि पहिला जाऊ लागला. चौफुल्यासारखी ठिकाणे हळूहळू गर्दी कमी खेचू लागली. त्यातही तमाशाचा नाद वाईट! घराचं, जमीनजुमल्याचं पार वाटोळे असा प्रघात पडला आणि पांढरपेशी माणूस तमाशापासून दुरावला.एक लोककला म्हणून तमाशाकडे पाहण्याची जनमानसाची दृष्टी हरवत चालली. मात्र याचा परिणाम सर्वच तमाशा फडांवर झाला. आधीच कर्ज काढून सुरु केलेली तमाशा मंडळे ओस पडू लागली. सुपारी मिळविण्यासाठी यात्रा काळात राहुट्या उभारल्या जाऊ लागल्या. तिकिटांवरचे खेळ कमी झाले. चौफुला, कोल्हापूर यांसारखी गावांची नावे लोककलेशी निगडित राहिली. मात्र, या काळात शासनाच्या दुर्लक्षामुळे नवीन कलावंत या क्षेत्रात येण्याचे प्रमाण प्रचंड घटलेले पाहायला मिळते.कर्ज मिळण्यास अडचणीतमाशा सुरु करण्यासाठी त्याचे साहित्य खरेदी करण्यासाठी बँकांकडून कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळत नाही. मोठ्या भांडवलदाराला गाठून सहकर्जदार म्हणून तमाशा फड चालक कर्ज काढतात. आजही मोठ्या तमाशांच्या बाबतीत १०० ते १५० लोकांचा संसार तमाशावर चालतो. यात्रा काळात तमाशांना मागणी असते. चार महिन्यांचा काळ सोडला तर उर्वरित आठ महिने बसून काढण्याची वेळ कलावंतांवर येते. या काळात काही न काही बिदागी कलावंतांना मालकांकडून मिळते मात्र या बिदागीपोटी तमाशा मालक आणखीन कर्जात बुडालेले पाहायला मिळतात.शासनाच्या मदतीची अपेक्षाआजकाल आॅर्केस्ट्राला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या बंधनामुळे रात्री दहा नंतर खेळ करता येत नाहीत. रात्रीच्या वेळी आकर्षक विद्युत रोषणाईत तमाशा पाहायला चांगला वाटतो. मात्र दुपारच्या वेळेत आॅर्केस्ट्राची सुपारी घेण्याकडे गावांचा कल वाढत आहे. यामुळे तमाशाची फरफट होत असून शासनाने वेळीच याकडे लक्ष देण्याची मागणी तमाशा कलावंतांकडून होत आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रcultureसांस्कृतिकnewsबातम्या