शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
2
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
3
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
4
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
5
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
6
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
7
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
8
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
9
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
10
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
11
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
12
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
13
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
14
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
15
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
16
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
17
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
18
प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
19
४० किलो स्फोटकांचा वापर आणि २०२३ पासून सुरू होती तयारी; लाल किल्ला स्फोट प्रकरणात खळबळजनक खुलासा!
20
शाकंभरी नवरात्र २०२५: पौषात रविवारपासून सुरु होतोय शाकंभरी नवरात्रोत्सव; काय आहे महत्त्व आणि कुलाचार?
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांवर टीका केल्याने मालदीवकडे टूर कंपन्यांची पाठ; विमानेही झाली रद्द

By श्रीकिशन काळे | Updated: January 8, 2024 20:17 IST

मालदीवला मोठे उत्पन्न भारतीय पर्यटकांकडून मिळत होते, ते आता बंद होणार

पुणे : मालदीव येथील तीन मंत्र्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. त्यामुळे तेथील सरकारने तिघांना निलंबित केले असून, भारतातील ट्रॅव्हल कंपन्यांनी मालदीवच्या टूर रद्द केल्या आहेत. परिणामी मालदीवला जाणारे विमाने देखील कंपन्यांनी रद्द केल्याचे सांगितले आहे. पुण्यातून मालदीवला जाणाऱ्या पर्यटकांचा प्लान देखील मागे घेण्यात आला आहे. टूर कंपन्यांनी मालदीवऐवजी इतर ठिकाणी जाण्याचे पर्याय सुचविणे सुरू केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नुकतेच मालदीव दौऱ्यावर हाेते. तिथे गेल्यानंतर तेथील तीन मंत्र्यांनी मोदींवर टीका केली. त्यामुळे तेथील सरकारने त्या तिन्ही मंत्र्यांचे निलंबन केले. त्याचा परिणाम भारतातील टूर कंपन्यांवर देखील झाला आहे. भारतीय पंतप्रधानांवर टीका केल्याने मालदीवला जाणारे विमाने आणि टूर रद्द करून पर्यटकांना इतर बेटांचा पर्याय देण्यात येत आहे. त्याचा फटका मालदीवला मोठ्या प्रमाणावर बसणार आहे. देशभरातून टूर मालदीवला जातात. त्या सर्वांनी आता मालदीवला बॉयकॉट केले आहे. सोशल मीडियावर देखील बॉयकॉटमालदीव असा ट्रेंड सुरू आहे.

दरवर्षी भारतातून लाखो पर्यटक मालदीवला जातात. २०२२ मध्ये भारतातून १५ लाख पर्यटक मालदीवला गेले होते. तर २०२३ मध्ये सुमारे १७ लाख ५७ हजार पर्यटकांनी मालदीवची सैर केली होती. त्यामुळे मालदीवला मोठे उत्पन्न भारतीय पर्यटकांकडून मिळत होते. ते आता बंद होणार आहे.

इंडियन चैंबर्स ऑफ कॉमर्सने देखील त्यांच्या टूर आणि ट्रॅव्हल एजंन्सीला मालदीवचे बुकिंग रद्द करण्यासाठी सांगितले आहे. तसेच ईझीमायट्रीप कंपनीने देखील मालदीवला यात्रा घेऊन न जाण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी अनेक विमाने रद्द करावी लागली.

मालदीवच्या मंत्र्यांनी आपल्या पंतप्रधानांवर टीका केली. त्यामुळे आपल्या लोकांची चिडचिड होत आहे. त्याचा फटका पर्यटनावर होऊ लागला आहे. मालदीवला जाणारी विमाने रद्द झाली, काही कंपन्यांनी टूर रद्द केल्या आहेत. मालदीवला जाणारे लोक आता लक्षद्वीपला जाण्यासाठी चौकशी करू लागले आहेत. परंतु, जशी मालदीवला जाण्याची कनेक्टिव्हीटी आहे तशी अजून लक्षद्वीपला नाही. लक्षद्वीपला पायाभूत सुविधा नाहीत. तिथे फाइव्ह स्ट्रार हॉटेल तेवढे नाहीत. विमानांची ये-जा नाही. परंतु, आता लोकांची मानसिकता मालदीव ऐवजी लक्षद्वीपला जाण्याची झाली आहे. तिथे चांगल्या सुविधा मिळाल्या तर भविष्यात पर्यटन खूप वाढेल. - मिलिंद बाबर, गिरीकंद हॉलीडेज

टॅग्स :PuneपुणेMaldivesमालदीवairplaneविमानtourismपर्यटन