शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

गणेशभक्तांसाठीची टोलमाफी ' हवे' तच : केंद्र शासनाकडून टोलमाफीची सुचना न आल्याचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 11:38 IST

गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोकणात जाणाºया गणेशभक्तांच्या वाहनांना टोलमाफीची घोषणा केली.

ठळक मुद्देराज्य शासनाच्या अखत्यारीत असलेल्या टोलनाक्यांवरही ‘एसटी’कडून टोल

पुणे : कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना टोलमाफी देण्याची सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची घोषणा हवेतच विरली आहे. राज्य शासनाच्या ‘एसटी’ बसलाच टोल भरावा लागत असल्याचे समोर आले आहे. केंद्र शासनाकडून टोलमाफीचे सुचना न आल्याचे कारण देत पुणे-सातारा मार्गावर टोलवसुली केली जात आहे. त्याचप्रमाणे राज्य शासनाच्या अखत्यारीत असलेल्या टोलनाक्यांवरही ‘एसटी’कडून टोल घेतला जात असल्याने टोलमाफीचा केवळ फार्स ठरला आहे. कोकणात गणेशोत्सवाची मोठी धामधुम असते. याकाळात पुणे-मुंबईतून कोकणात जाणाºया गणेशभक्तांची संख्या खुप मोठी असते. यापार्श्वभूमीवर गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना टोलमाफीची घोषणा केली. मागील वर्षीही अशी टोलमाफी देण्यात आली होती. प्रामुख्याने खेड शिवापुर, तासवडे, किणी, पुणे-मुंबई दु्रतगती मार्ग, वाशी आदी टोलनाक्यांवर टोलमाफी मिळेल, असे स्पष्ट करण्यात आले होते. पण या घोषणेला टोलचालकांनी केराची टोपली दाखविली आहे. पुण्यातून स्वारगेट, शिवाजीनगर व पिंपरी चिंचवडमधून कोकणात जाण्यासाठी जादा बसची व्यवस्था केली होती. ३० आॅगस्टपासून जादा बस सोडण्यात येत आहेत. त्यामध्ये महाड, चिपळूण, दापोली, रत्नागिरी, खेड, गुहागर, मंडणगड, रोहा आदी ठिकाणांचा समावेश आहे. प्रवाशांकडून एसटी बसला मोठा प्रतिसाद मिळत आहे. सुरूवातीचे दोन दिवस दररोज सुमारे १५० जादा बस सोडल्या.टोलमाफीची घोषणा झाल्यानंतर ‘एसटी’कडून कोकणात जाणाºया बसला ‘गणेशोत्सव विशेष’ असे स्टीकर्स लावले. तसेच बसला बसविलेली ‘फासटॅग’ ही इलेक्ट्रॉनिक टोल यंत्रणाही बंद केली होती. पण प्रत्यक्ष टोलनाक्यावर गेल्यानंतर बसचालक व टोल नाक्यावरील कर्मचाºयांमध्ये वाद होण्यास सुरूवात झाली. त्यानंतर काही चालकांनी बस तशाच पुढे दामटल्या. तर काही चालकांना पदरमोड करून टोल भरावा लागला. तसेच काही चालकांकडून टोलनाक्यावरच बस थांबविण्यात येत होत्या. त्यामुळे एसटी प्रशासनाकडून वाद व विलंब टाळण्यासाठी टोल भरण्यास सुरूवात केली. पुणे-सातारा मार्गावरील टोलनाक्यांसह कोकणात जाणाऱ्या बहुतेक टोलनाक्यांवर टोलवसुली करण्यात येत आहे. राज्य शासनाच्या ‘एसटी’लाच टोलमधून सुटका मिळत नसल्याने वास्तव यानिमित्ताने समोर आले आहे. .........कोकणात जाणाºया गणेशभक्तांच्या खासगी वाहनांना टोलमाफीसाठी विशेष स्टीकर्स, पासची व्यवस्था केली आहे. पोलिस ठाण्यांमध्ये हे पास मिळत आहेत. हे पास असूनही खेड शिवापुर टोलनाक्यावर टोलमाफी मिळत नाही. याबाबत तेथील हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधला असता त्यांनी केंद्र सरकारकडून याबाबत कोणत्याही सूचना नसल्याचे सांगितले. हा टोलनाका केंद्र सरकारच्या अंतर्गत आहे. त्यामुळे त्यांच्या सुचना असल्याशिवाय टोलमाफी दिली जात नाही, असे स्पष्टपणे सांगण्यात आले.टोलमाफीच्या घोषणेनंतर बसला स्टीकर्स लावण्यात आले होते. पण कोकणात जाणाºया एसटी बसकडून टोल घेतला जात आहे. बहुतेक टोलनाक्यांवर हीच स्थिती आहे. टोलमाफीची सुचना मिळाली नसल्याचे टोलनाक्यांवर चालकांना सांगितले जात आहे. त्यामुळे टोल भरावा लागत आहे.- यामिनी जोशी, वाहतुक नियंत्रक, पुणे विभाग, एसटी महामंडळ

टॅग्स :PuneपुणेtollplazaटोलनाकाCentral Governmentकेंद्र सरकारGanesh Mahotsavगणेशोत्सव