शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

आजचा ग्रामीण तरुण दिशाहीन होतोय : डॉ. श्रीपाल सबनीस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 13:31 IST

गावातील तरुणांना वेळीच योग्य मार्गदर्शन न मिळाल्यास महाराष्ट्राला गंभीर समस्येला सामोरे जावे लागेल : श्रीपाल सबनीस

ठळक मुद्देशेतक-याच्या मनात व्यवस्थेने संभ्रम

पुणे : गावातील तरुणांचा राजकारणाची खोटी आशा दाखवून राजकीय नेतृत्व तरुणांच्या डोक्यात हवा घालत आहे. ग्रामीण भागातील राजकारणामुळे तरुण पिढी दिशाहिन होत आहे. चंगळवाद जोपासणारे आणि पोसणारे हे राजकारण ग्रामीण तरुणांना कोणत्या थराला घेऊन जात आहे, याचा अंदाज कोणालाच येत नाही. तरुणांना वेळीच योग्य मार्गदर्शन न मिळाल्यास महाराष्ट्राला गंभीर समस्येला सामोरे जावे लागेल, असे मत माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. संस्कृती प्रकाशनातर्फे प्रकाशित आणि मेघा पाटील लिखीत ‘शेतकरी नवरा’ आणि ‘विस्कटलेली चौकट’ या दोन कादंब-यांचे प्रकाशन सबनीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधिज्ज्ञ अ‍ॅड. भास्करराव आव्हाड उपस्थित होते. यावेळी संस्कृती प्रकाशनाच्या संचालिका सुनिताराजे पवार, अमरसिंग देशमुख, वि.दा. पिंगळे आणि रमेश पाटील उपस्थित होते. सबनीस म्हणाले, ‘लाखोंचा पोशिंदाच आज चक्रव्युहात सापडलेला आहे. तंत्रज्ञानामुळे त्याच्यापर्यंत शहरी प्रगती आणि घडामोड पोहोचत आहेत. परंतु, प्रगतीच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचा मार्ग त्यांना सापडत नाही. ग्रामीण आणि शहरी अर्थव्यवस्थेतील वाढती तफावत त्यांना गोंधळात टाकत आहे.’‘काळ्या मातीशी इमान राखत निष्ठेने वाटचाल करावी तर नक्की कोणत्या आशेवर, याबाबत शेतक-याच्या मनात व्यवस्थेने संभ्रम निर्माण केले आहेत. शहरातील चकचकीत जीवन त्यांना आकर्षित करते. परंतु, आकर्षक जीवनातील तडजोडींचा त्यांना अंदाज येत नाही. योग्य वेळी तो़डगा न मिळाल्यास अनेक सामाजिक प्रश्नांना सामोरे जावे लागेल.’ अ‍ॅड. भास्करराव आव्हाड म्हणाले, ‘प्रत्येक लिखाण हे वाङ्मय या वर्गवारीत मोडू शकत नाही. त्या लिखाणाला वाङ्मयीन मुल्ये प्राप्त होण्यासाठी अनुभवाची धार लागणे आवश्यक असते. अस्वस्थेतून निर्माण होणारे वाङ्मय हे खरे साहित्य. अस्सल वाडमय हे सुसंवाद खुंटवणारे नसून ते सुसंवाद वाढवणारे असते.’सुनिताराजे पवार, मेघा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. वि.दा. पिंगळे  यांनी सूत्रसंचालन केले. 

टॅग्स :PuneपुणेShripal Sabnisश्रीपाल सबनीसFarmerशेतकरी