शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

आजचा ग्रामीण तरुण दिशाहीन होतोय : डॉ. श्रीपाल सबनीस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 13:31 IST

गावातील तरुणांना वेळीच योग्य मार्गदर्शन न मिळाल्यास महाराष्ट्राला गंभीर समस्येला सामोरे जावे लागेल : श्रीपाल सबनीस

ठळक मुद्देशेतक-याच्या मनात व्यवस्थेने संभ्रम

पुणे : गावातील तरुणांचा राजकारणाची खोटी आशा दाखवून राजकीय नेतृत्व तरुणांच्या डोक्यात हवा घालत आहे. ग्रामीण भागातील राजकारणामुळे तरुण पिढी दिशाहिन होत आहे. चंगळवाद जोपासणारे आणि पोसणारे हे राजकारण ग्रामीण तरुणांना कोणत्या थराला घेऊन जात आहे, याचा अंदाज कोणालाच येत नाही. तरुणांना वेळीच योग्य मार्गदर्शन न मिळाल्यास महाराष्ट्राला गंभीर समस्येला सामोरे जावे लागेल, असे मत माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. संस्कृती प्रकाशनातर्फे प्रकाशित आणि मेघा पाटील लिखीत ‘शेतकरी नवरा’ आणि ‘विस्कटलेली चौकट’ या दोन कादंब-यांचे प्रकाशन सबनीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधिज्ज्ञ अ‍ॅड. भास्करराव आव्हाड उपस्थित होते. यावेळी संस्कृती प्रकाशनाच्या संचालिका सुनिताराजे पवार, अमरसिंग देशमुख, वि.दा. पिंगळे आणि रमेश पाटील उपस्थित होते. सबनीस म्हणाले, ‘लाखोंचा पोशिंदाच आज चक्रव्युहात सापडलेला आहे. तंत्रज्ञानामुळे त्याच्यापर्यंत शहरी प्रगती आणि घडामोड पोहोचत आहेत. परंतु, प्रगतीच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचा मार्ग त्यांना सापडत नाही. ग्रामीण आणि शहरी अर्थव्यवस्थेतील वाढती तफावत त्यांना गोंधळात टाकत आहे.’‘काळ्या मातीशी इमान राखत निष्ठेने वाटचाल करावी तर नक्की कोणत्या आशेवर, याबाबत शेतक-याच्या मनात व्यवस्थेने संभ्रम निर्माण केले आहेत. शहरातील चकचकीत जीवन त्यांना आकर्षित करते. परंतु, आकर्षक जीवनातील तडजोडींचा त्यांना अंदाज येत नाही. योग्य वेळी तो़डगा न मिळाल्यास अनेक सामाजिक प्रश्नांना सामोरे जावे लागेल.’ अ‍ॅड. भास्करराव आव्हाड म्हणाले, ‘प्रत्येक लिखाण हे वाङ्मय या वर्गवारीत मोडू शकत नाही. त्या लिखाणाला वाङ्मयीन मुल्ये प्राप्त होण्यासाठी अनुभवाची धार लागणे आवश्यक असते. अस्वस्थेतून निर्माण होणारे वाङ्मय हे खरे साहित्य. अस्सल वाडमय हे सुसंवाद खुंटवणारे नसून ते सुसंवाद वाढवणारे असते.’सुनिताराजे पवार, मेघा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. वि.दा. पिंगळे  यांनी सूत्रसंचालन केले. 

टॅग्स :PuneपुणेShripal Sabnisश्रीपाल सबनीसFarmerशेतकरी