शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आजचा ग्रामीण तरुण दिशाहीन होतोय : डॉ. श्रीपाल सबनीस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 13:31 IST

गावातील तरुणांना वेळीच योग्य मार्गदर्शन न मिळाल्यास महाराष्ट्राला गंभीर समस्येला सामोरे जावे लागेल : श्रीपाल सबनीस

ठळक मुद्देशेतक-याच्या मनात व्यवस्थेने संभ्रम

पुणे : गावातील तरुणांचा राजकारणाची खोटी आशा दाखवून राजकीय नेतृत्व तरुणांच्या डोक्यात हवा घालत आहे. ग्रामीण भागातील राजकारणामुळे तरुण पिढी दिशाहिन होत आहे. चंगळवाद जोपासणारे आणि पोसणारे हे राजकारण ग्रामीण तरुणांना कोणत्या थराला घेऊन जात आहे, याचा अंदाज कोणालाच येत नाही. तरुणांना वेळीच योग्य मार्गदर्शन न मिळाल्यास महाराष्ट्राला गंभीर समस्येला सामोरे जावे लागेल, असे मत माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. संस्कृती प्रकाशनातर्फे प्रकाशित आणि मेघा पाटील लिखीत ‘शेतकरी नवरा’ आणि ‘विस्कटलेली चौकट’ या दोन कादंब-यांचे प्रकाशन सबनीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधिज्ज्ञ अ‍ॅड. भास्करराव आव्हाड उपस्थित होते. यावेळी संस्कृती प्रकाशनाच्या संचालिका सुनिताराजे पवार, अमरसिंग देशमुख, वि.दा. पिंगळे आणि रमेश पाटील उपस्थित होते. सबनीस म्हणाले, ‘लाखोंचा पोशिंदाच आज चक्रव्युहात सापडलेला आहे. तंत्रज्ञानामुळे त्याच्यापर्यंत शहरी प्रगती आणि घडामोड पोहोचत आहेत. परंतु, प्रगतीच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचा मार्ग त्यांना सापडत नाही. ग्रामीण आणि शहरी अर्थव्यवस्थेतील वाढती तफावत त्यांना गोंधळात टाकत आहे.’‘काळ्या मातीशी इमान राखत निष्ठेने वाटचाल करावी तर नक्की कोणत्या आशेवर, याबाबत शेतक-याच्या मनात व्यवस्थेने संभ्रम निर्माण केले आहेत. शहरातील चकचकीत जीवन त्यांना आकर्षित करते. परंतु, आकर्षक जीवनातील तडजोडींचा त्यांना अंदाज येत नाही. योग्य वेळी तो़डगा न मिळाल्यास अनेक सामाजिक प्रश्नांना सामोरे जावे लागेल.’ अ‍ॅड. भास्करराव आव्हाड म्हणाले, ‘प्रत्येक लिखाण हे वाङ्मय या वर्गवारीत मोडू शकत नाही. त्या लिखाणाला वाङ्मयीन मुल्ये प्राप्त होण्यासाठी अनुभवाची धार लागणे आवश्यक असते. अस्वस्थेतून निर्माण होणारे वाङ्मय हे खरे साहित्य. अस्सल वाडमय हे सुसंवाद खुंटवणारे नसून ते सुसंवाद वाढवणारे असते.’सुनिताराजे पवार, मेघा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. वि.दा. पिंगळे  यांनी सूत्रसंचालन केले. 

टॅग्स :PuneपुणेShripal Sabnisश्रीपाल सबनीसFarmerशेतकरी