शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

नर्सरी सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाकडून परवानगी घ्यावी लागणार - दीपक केसरकर

By प्रशांत बिडवे | Updated: May 26, 2023 17:25 IST

प्राथमिक शिक्षणात मुलांचा पाया घडत असल्याने प्राथमिक शिक्षण अधिक सक्षम करण्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे

पुणे: ज्युनिअर व सिनिअर केजी, नर्सरी सुरू करताना नियम पाळले जात नाहीत. काेणीही खाेली भाड्याने घेतात आणि विद्यार्थी बसउन नर्सरी सुरू करतात. या वर्षीपासून त्याला चाप बसणार आहे. नर्सरी सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाकडून परवानगी घ्यावी लागणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. प्राथमिक शिक्षणात मुलांचा पाया घडताे. त्यामुळे प्राथमिक शिक्षण अधिक सक्षम करण्यावर लक्ष केंद्रीत केले असल्याचेही ते म्हणाले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयाेजित कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

केसरकर म्हणाले, पहिली ते आठवीच्या वर्गातील मुलांच्या वह्या पुस्तकांच्या ओझ्याचा प्रश्न निकाली काढला आहे. मुले आता एकच पुस्तक शाळेत घेउन जातील. पुस्तकात प्रत्येक धडा संपल्यानंतर वहीचे पान जाेडलेले आहे. त्यावर विद्यार्थी टीपा काढतील, त्यावरून शिक्षकांनी उत्तमरीत्या शिकविले आहे का नाही? याचेही मुल्यमापन हाेणार आहे. परीक्षा नसल्याने पहिली ते आठवीतील मुले अभ्यासाकडे दूर्लक्ष करतात त्यामुळे त्यांचे मुल्यमापन कसे करावे? यासह सहावीनंतर त्यांना व्यावसायिक शिक्षण द्यायचे याचा विचार करीत आहाेत.

गुरूवार ते शनिवार सारखा गणवेश

काही शाळांनी गणवेशाच्या ऑर्डर दिल्या हाेत्या. त्यामुळे उत्पादन थांबवून जे गणवेश तयार आहेत ते शाळांना साेमवार ते बुधवार हे तीन दिवस वापरता येतील. तसेच गुरूवार ते शनिवार या तीन दिवसांसाठी सर्वत्र ब्ल्यु शर्ट आणि डार्क ब्ल्यू पॅन्ट, बुट, साॅक्स असा गणवेश वापरावा लागणार आहे. कापडाचा दर्जा ठरवून टेंडर काढण्यात येईल. प्रत्येक शाळेपर्यंत कापड पाेहचविले जाईल. महिला विकास अर्थिक महामंडळ, बचतगटाच्या माध्यमातून गावांतील शासकीय शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना गणवेश, बुट, साॅक्स, पुस्तके दिले जाणार आहेत.

शालेय विद्यार्थ्यांना स्काउट गाईड अनिवार्य

मुलांना शिस्त लागावी, श्रमाचे महत्व कळावे, सामाजिक बांधिलकी विकसित व्हावी यासाठी शालेय विद्यार्थ्यांना स्काउट गाईड अनिवार्य करण्यात येणार आहे. तसेच यासाठी शासनाने दिलेले गणवेश वापरता येतील या कपड्यावर कवायतही घेतली जाणार असल्याचे केसरकर म्हणाले.

खंडपीठाची स्थगिती उठताच नवीन शिक्षकभरती

शालेय शिक्षण विभागाकडून शिक्षकभरतीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली आहे. परंतु औरंगाबाद खंडपीठाने सुमाेटाे पाच जूनपर्यंत स्थगिती दिलेली आहे. स्थगिती उठल्यानंतर ३० हजार शिक्षक भरती करण्यात येतील सर्व शाळांना शिक्षक मिळतील.

टॅग्स :PuneपुणेDipak Kesarkarदीपक केसरकरPoliticsराजकारणEducationशिक्षणStudentविद्यार्थी