शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

शनिवारवाडा परिसरातील बांधकाम नियमावलीत बदल करणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

By निलेश राऊत | Updated: April 10, 2023 13:32 IST

पुण्यातील ऐतिहासिक वारसा असलेल्या वास्तूंच्या १०० मीटर परिसरातील बांधकामांना आणि दुरुस्तीला पुरातत्व विभागाकडून बंदी घालण्यात आली

पुणे : शनिवारवाडा परिसरातील बांधकामाबाबत वस्तुस्थितीची माहिती गोळा करून, ती राज्य शासनाला सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर राज्य शासनाकडून या भागातील बांधकाम नियमावलीत बदल करण्यासाठीची शिफारस घेऊन, केंद्रीय पुरातत्व विभागाचे मंत्री यांच्याबरोबर लवकरच बैठक बांधकामांचा प्रश्न सोडविण्यात येणार येईल अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

पुण्यातील ऐतिहासिक वारसा असलेल्या वास्तूंच्या १०० मीटर परिसरातील बांधकामांना आणि दुरुस्तीला पुरातत्व विभागाकडून बंदी घालण्यात आली आहे. या नियमावलीमुळे शनिवारवाडा परिसरातील जुन्या वाड्यांसह काही इमारतींची पुर्ननिर्मिती थांबली आहे. त्यामुळे येथील नागरिकांचा बांधकामाचा प्रश्न सोडविण्यासाठी, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नवलाखा- गायकवाड वाडा येथे स्थानिक नागरिकांची बैठक घेऊन परिसराची पाहणी केली. यावेळी शनिवारवाडा कृती समितीचे प्रमुख सौरभ संजय पवार, सुहास कुलकर्णी, गणेश नलावडे, मुरलीधर देशपांडे, संदीप खर्डेकर, देवेंद्र सातकर, संदिप जयस्वाल, योगेश समेळ, योगेश खडके, पांडुरंग करपे, मुकुंद चव्हाण, अशोक येनपुरे, अश्विन होले आदी उपस्थित होते.

पुरातत्व विभागाच्या परिपत्रकामुळे पुण्याचा मध्यभाग असलेल्या शनिवार वाड्याच्या शंभर मीटर परिसरात नव्याने बांधकाम किंवा दुरुस्ती करता येत नाही. शहरातील अन्य ठिकाणीदेखील अशी समस्या येत असून, याबाबत राज्य शासनाची भूमिका सकारात्मक असल्याचे यावेळी पाटील यांनी सांगितले. दरम्यान  याबाबतचे पुरातत्व विभागाशी संबंधित प्रकरण सर्वोच्च न्यायालयाकडे प्रलंबित असल्याने त्याबाबतची माहिती घेऊन बांधकामांना स्थगिती नसल्यास पुरातत्व विभागाकडे याबाबत पाठपुरावा करण्यात येईल, त्यासाठी स्थानिकांना सोबत घेऊन दिल्लीत पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत लवकरच बैठक घेण्यात येणार आहे.

ऐतिहासिक वास्तूच्या परिसरात सद्यस्थितीला पाच सहा मजली बांधकामे झाली आहेत. त्यामुळे बांधकाम बंदीबाबत कायदा नव्हे तर ती नियमावली असल्याने, बांधकाम तज्ज्ञांना बोलावून येथील प्रत्यक्ष परिस्थितीचा अभ्यास केला जाईल. शनिवारवाड्याच्या भिंतींना नवीन बांधकामांमुळे काही तोटा होणार नाही हे सद्यस्थितीला दिसून येत आहे. त्यामुळे याबाबत अहवाल तयार करून, ही नियमावली का केली गेली असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला. तसेच शनिवारवाडा परिसरातील २०-२५ मीटर अंतरावरील बांधकामांना नियमावलीत दुरूस्ती करून परवानगी द्यावी अशी मागणी यावेळी सुहास कुलकर्णी यांनी केली.

टॅग्स :Puneपुणेchandrakant patilचंद्रकांत पाटीलShaniwar WadaशनिवारवाडाSocialसामाजिकGovernmentसरकार