शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्थांवर पाण्यासाठी भटकण्याची वेळ, गुळुंचे येथील तुकाईनगरमध्ये पाणीटंचाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 00:21 IST

नीरा नदी उशाला असून, तसेच नीरा डावा कालवा भरून वाहत असताना गुळुंचे (ता. पुरंदर) येथील तुकाईनगर (माळवस्ती) भागातील महिला, मुले व तरुण डोक्यावर हंडे, कळशा घेऊन पाणी भरताना दिसत आहेत.

नीरा : नीरा नदी उशाला असून, तसेच नीरा डावा कालवा भरून वाहत असताना गुळुंचे (ता. पुरंदर) येथील तुकाईनगर (माळवस्ती) भागातील महिला, मुले व तरुण डोक्यावर हंडे, कळशा घेऊन पाणी भरताना दिसत आहेत. ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे पाण्यासाठी भटकण्याची वेळ येथील ग्रामस्थांवर ओढवली आहे. नीरा डाव्या कालव्याच्या विहिरीवरील पाणी तीन किमी अंतरावर प्रादेशिक पाणीपुरवठ्याच्या टाकीत सोडले जाते. गावठाण व वाड्या-वस्त्यांसाठी दोन स्वतंत्र टाक्या बांधण्यात आलेल्या असून, दोन्ही टाक्यात पाणी आहे. मात्र, येथील तुकाईनगर भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीतील पाणी सोडले जात नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.दरम्यान, याबाबत माहिती घेतली असता तुकाईनगर भागात समाजमंदिराच्या नजीकच्या ठिकाणी तोट्या बसविण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे साहजिकच पाणी सोडले असता ते साठून त्यावर डासांची उत्पत्ती होऊन आजारांची संख्या बळावत आहे. त्यामुळे पहिली गटार लाईन काढावी व नंतर पाणी सोडावे अशी भूमिका काहींनी घेतल्याने पूर्ण वस्तीचे पाणी बंद केल्याने नागरिकांच्यात संतापाची लाट निर्माण झाली आहे.येथील तुकाईनगर हा भाग रेकॉर्डप्रमाणे गायरान जागेत येत आहे. येथील घरांच्या नियमित करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. मात्र, पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर मोकळी जागा ग्रामपंचायतीकडे निहित करण्यात येणार आहे. जिल्हाधिकाºयांच्या पत्रानंतर ही प्रक्रिया होणार असल्याने प्रथम जागा नियमित करण्याची वाट पाहावी लागणार आहे.आदर्श ग्राम गुळुंचे येथे विविध विकासकामे झाली. मात्र, पाण्याचा प्रश्न मिटविण्यात अद्यापही यश आलेले नाही. येथील गटात एक विहीर असून ती यापूर्वी दहा वर्षं भाडेपट्ट्याने एकाला देण्यात आली होती. मात्र, त्यानंतर गेल्या दहा-पंधरा वर्षांत ही व्यक्ती अद्यापही विहिरीचे पाणी वैयक्तिक कामांसाठी वापरत असून हा बेकायदा ताबा हटविल्यास गावाला प्रादेशिक पाणीपुरवठा योजना करण्यासाठी नव्याने विहीर खणण्यासाठी जागा शोधत बसण्याची वेळ येणार नाही. मात्र, यासाठी संबंधित तहसीलदार अतुल म्हेत्रे यांनी वेळीच लक्ष घालून विहीर ग्रामपंचायतीकडे निहित करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.तहसीलदारांनी लक्ष घालण्याची मागणीसध्या नीरा डाव्या कालव्यातून कमी प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे कालव्याच्या शेजारील ग्रामपंचायतीच्या विहिरींची पाणीपातळी खालावली आहे. मुबलक पाणी विहीरीत उपलब्ध नाही. आहेतेच पाण्याचा वापर योग्य पद्धतीने करण्याचा प्रयत्न सुरू आहे. गेली दोन दिवस एका वस्तीवरील विवाहसोळ्या निमित्त तीथे पाणी जादा सोडण्यात आले आहे. कामगारांनी कामचुकारपणा केल्याने पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले होते. आज पासून वेळापत्रक पुर्ववत करण्यात येत आहे.- संभाजी कुंभार, सरपंच, गुळुंचे

टॅग्स :Puneपुणेdroughtदुष्काळ