शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

कोरोना संकटामुळे रसवंतिगृह व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:09 IST

नीरा : श्री कानिफनाथांच्या नावाने राज्यभरात उसाच्या रसवंतिगृहाचा व्यवसाय करणारे मूळचे पुरंदर तालुक्यातील. मुंबई ते नागपूर आणि कोल्हापूर ...

नीरा : श्री कानिफनाथांच्या नावाने राज्यभरात उसाच्या रसवंतिगृहाचा व्यवसाय करणारे मूळचे पुरंदर तालुक्यातील. मुंबई ते नागपूर आणि कोल्हापूर ते नंदुरबार या अखंड महाराष्ट्रात लहानमोठ्या शहरात उन्हाळ्यात चार महिने उसाचा रस मिळण्याचे ठिकाण म्हणजे रसवंतिगृह. गेली दोन वर्षे सततचा लॉकडाऊन व व्यवसायावर आलेले निर्बंध यामुळे या रसवंतिगृहाची चाके तर फिरलीच नाही किंवा रस्त्याने वा बस स्टँडवरचा घुंगरांचा खुळखुळाट ऐकू आलाच नाही.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे सगळीकडे रसवंतिगृहांचा व्यवसाय बंद पडला आहे.

. पुरंदर तालुक्यात या व्यवसायाशी संबंधित अनेक व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. पुरंदरमधील रसवंतिगृह व्यावसायिक प्रमोद रामचंद्र फडतरे, दत्तात्रय काशिनाथ फडतरे मूळ रहिवासी बोपगाव (मुंबई), विठ्ठल जयसिंग दुरकर, गोकुळ राजाराम दुरकर दोघे मूळ रहिवासी गराडे (कोकण), नितीन फडतरे बोपगाव (टेंबुर्णी), महावीर भुजबळ वाल्हे, प्रकाश पवार, अर्जुन दुर्गाडे, सागर इंगळे, दत्तात्रय भुजबळ आदी रसवंतिगृह व्यावसायिकांवर आर्थिक संक्रात आली आहे.

दरवर्षीच फेब्रुवारी महिन्यापासून रसवंतिगृहाचा व्यवसाय सुरू होतात. यानंतर मार्च, एप्रिल, मे आणि जूनपर्यंत लाखो रुपयांची उलाढाल या माध्यमातून होत असते. रसवंती व्यवसायातून रसवंती मालक, काम करणारे मजूर, तसेच प्रामुख्याने ऊस उत्पादक शेतकरी यांना मोठा फायदा होतो.

मागील वर्षी व चालू वर्षीचीही रसवंतिगृहाचा हंगाम कोरोना संकटामुळे वाया गेला. या वर्षी फेब्रुवारी महिन्यातच उन्हाचा चटका जाणवत होता. मात्र नागरिकांनी उसाचा रस खरेदी करण्याकडे पाठ फिरवली. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर थंड पदार्थ टाळावे, अशी खबरदारी सुचविण्यात आल्यानंतर नागरिकांनी उसाचा रस तसेच इतर शीतपेयांकडे पाठ फिरवली.

या वर्षीही ऐन उन्हाळ्यामध्येच कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत राहिल्याने, राज्य सरकारकडून लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला. मागील वर्षांप्रमाणेच या वर्षीही लॉकडाऊन जाहीर झाल्याने रसवंती व्यवसाय बंद पडले.

रसवंतिगृहासाठी लागणारा ऊस उत्पादक शेतकरी वर्गालाही सलग दुसऱ्या वर्षी मोठी आर्थिक झळ सोसावी लागली. रसवंती व्यवसायाला पूरक म्हणून अनेक शेतकरी दरवर्षी उसाचे उत्पादन घेतात. थोड्याफार प्रमाणात प्रत्येकजण ऊसाची लागवड करतात. त्यातील अनेक जण रसवंती व्यावसायिकांना ऊस विकून हजारो रुपयाचे उत्पन्न या माध्यमातून काही शेतकऱ्यांना होते. मागील वर्षीचा रसवंतीगृहाचा हंगाम वाया गेला असला तरी यावर्षीचा हंगाम तरी चांगला जाईल, असे अनेक ऊसउत्पादक शेतकरीवर्गाला वाटत असल्याने, अनेक शेतकऱ्यांनी रसवंतीगृहाचा ऊस मागील महिन्यापर्यंत शेतातच ठेवला होता. मात्र कोरोना संकट आणखीच गडद होत असल्याचे पाहून, तसेच शासनाकडून जाहीर केलेला लाॅकडाऊन संपत नसल्याने, मागील वर्षांपासून रसवंतीगृहच बंद पडल्याने शेतातील ऊसाला मागणी नसल्याने, अनेक शेतकऱ्यांनी शेतामधील ऊस जनावरांना चारला असल्याचे ऊस उत्पादक शेतकरी सतीश भुजबळ, अर्जुन दुर्गाडे यांनी सांगितले.

"मुंबईत ऊन्हाळा चार महिने असलातरी एप्रिल आणि जून मध्ये लोक मोठ्याप्रमाणावर ऊसाच्या रसाला मागणी असते. यादोन महिन्यात लाखोंची उलाढाल होत असते. गेली दोन वर्षे लॉकडाऊनमुळे ऐन हंगाम वाया गेला. आर्थिक चणचण मोठी निर्माण झाली आहे. कर्जाचे हप्ते थकत आहेत. शासनाने रिक्षावाल्यांना मदत केली पण स्वदेशी उत्पन्न व आरोग्यास हितकारक असलेल्या व्यावसायिकाचा कुठेच विचार केला नाही. यापुढे तरी कर्जाच्या हप्त्यात सवलत किंवा अनुदानरुपी मदत मिळावी."

विजय लक्षमण फडतरे बोपगाव (मालाड, मुंबई)

कोरोना संकटामुळे पुरंदर तालुक्यातील रसवंतिगृह बंद ठेवण्यात आले आहेत.