शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
2
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
3
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
4
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
5
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी निस्तब्ध पडून राहिली नवी नवरी
6
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
7
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
8
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
9
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
10
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
11
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
12
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
13
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
14
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
15
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
16
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
17
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
18
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
19
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
20
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."

‘फडणवीस है तो, कुछ भी मुमकीन है’ देवेंद्रजींच्या एका फोनवर टिळक कुटुंबीयांची नाराजी संपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 13:48 IST

फडणवीस यांच्या एका फोननंतर टिळक कुटुंबीयांनी प्रचारात सहभागी होणार असल्याचे सांगितले

राजू इनामदार 

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी जणू जादूगारच ठरले आहेत. भाजपची खरी घोषणा ‘मोदी है तो मुमकीन है’ अशी आहे; पण आता त्याला जोड म्हणून फडणवीस यांच्यासाठी राज्यात ‘मुश्किल तर जाऊद्या, पण नामुमकीन असे काहीच नाही’ अशीच पुण्यातील भाजपीयांची भावना झाली आहे. त्याला कारणही तसेच आहे. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश व चिरंजीव कुणाल यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली. मात्र भाजप श्रेष्ठींच्या राजकीय गणितात ते बसले नसावे. त्यामुळे त्यांनी दोघांनाही उमेदवारी दिली नाही. त्यावरून ते नाराज होणे स्वाभाविक होते. तसे ते झालेही.

भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा उमेदवारी अर्ज दाखल होतानाच्या शक्तिप्रदर्शनात ते गैैरहजर राहिल्याने भाजपच्या गोटात धावपळ उडाली. मंत्री गिरीश महाजन तातडीने त्याचदिवशी त्यांना भेटले. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस त्याचवेळी ‘कुटुंबात उमेदवारी का नाही?’ अशी टीका करत भाजपला भंडावून सोडत होते. मात्र त्यानंतर संध्याकाळी उशिरा भाजपच्या शहर कार्यालयात रासने यांच्या प्रचाराच्या नियोजनाची जी बैठक झाली, त्याला शैलेश व कुणाल हे दोघेही उपस्थित झाले. खुद्द शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनीच त्यांना माध्यम प्रतिनिधींसमोर आणले. प्रचारात सहभागी होणार, असे या पिता-पुत्रांनीच जाहीरपणे सांगितले. पक्षाचा म्हणून काही विचार असतो, तो मान्य असल्याचेही मान्य केले.हे झाले कसे? तर त्याचदिवशी सायंकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुणाल टिळक यांना फोन केला. ते त्यांच्याबरोबर सविस्तर बोलले. त्यामुळे मग टिळक कुटुंबाची नाराजी संपली. जे कोणालाही जमले नव्हते ते फडणवीस यांनी केवळ एका फोनने साधले. म्हणून तर ‘फडणवीस है तो, कुछ भी मुमकीन है’ असे आता भाजप कार्यकर्ते म्हणू लागले आहेत.

बहुजनप्रिय बापट

कसबा मतदारसंघ विशिष्ट समाजाचा आहे, असे म्हटले जात असले तरीही, तो तसा नाही, असे आकडेवारीतून दिसतेच. त्याशिवाय मागील तब्बल ६ वेळा म्हणजे सलग ३० वर्षे या मतदारसंघावर मांड ठोकून असलेले खासदार गिरीश बापट यांच्या मतदारसंघातील जाहीर वावरावरूनही तसेच दिसते. कोणाच्या पाठीवर हात मार, कोणाच्याही शेेजारी निसंकोचपणे बस, रात्री उशिरापर्यंत कट्ट्यावर गप्पा मारत थांब. अशा बापट यांचे त्यांच्या समाजात कमी व अन्य समाजातच जास्त संबंध आहेत. पालकमंत्री झाल्यावर ते रात्री २ वाजता लाल दिव्याची गाडी घेऊन त्यांच्या प्रसिद्ध कट्ट्यावर आले होते. त्यामुळेच मतदारसंघाबाबत चुकीचे समज पसरवले जात असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. 

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliticsराजकारणElectionनिवडणूकMukta Tilakमुक्ता टिळक