शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवार नाद करायचा नाही"; मुलाच्या इशाऱ्यानंतर राजन पाटील म्हणाले, "त्याला पार्थ सारखं..."
2
Pune Crime: रात्री दीड वाजेची वेळ, हातात कोयते; पुण्यातील रेस्टॉरंटमध्ये गुंडांचा हैदोस, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
3
आरक्षण मर्यादा ओलांडल्याने सुप्रिम कोर्ट संतप्त, राज्यातील निवडणुकांचं काय होणार? आता २५ नोव्हेंबरला पुढील सुनावणी
4
दुसऱ्या मुलीशी लग्न करत होता बॉयफ्रेंड, अचानक भर लग्नात धडकली गर्लफ्रेंड; मंडपात तमाशा सुरू होताच...
5
निवडणूक आयोगाला बदनाम करण्याचा प्रयत्न; देशातील 272 प्रतिष्ठित व्यक्तींचा पत्रातून काँग्रेसवर निशाणा
6
SIP सुरू करण्यापूर्वी वाचा! इंडेक्स फंडात 'कमी खर्च' तर Active फंडात 'जास्त रिटर्न'ची संधी; कोणता निवडावा?
7
“काँग्रेस-वंचित पक्षाची आघाडी व्हावी ही स्थानिक कार्यकर्त्यांची भावना”; नेते म्हणाले...
8
'अजित पवार आणि सुनेत्राआत्या ज्याप्रमाणे माझे नातेवाईक...", राणा जगजितसिंह यांचं सुप्रिया सुळेंना पत्र; नेमकं प्रकरण काय?
9
"पंतप्रधान मोदींमुळे माझ्या आईचा जीव वाचला..."; शेख हसीना यांचा मुलगा सजीब यांचे विधान
10
११ युवकांचं ब्रेनवॉश करण्यासाठी... ; दिल्ली स्फोटातील दहशतवादी डॉ. उमरबाबत आणखी धक्कादायक माहिती उघड
11
राज ठाकरेंमुळे काँग्रेस आणि ठाकरे गटात दुरावा?, वर्षा गायकवाड म्हणाल्या, ‘त्यांना सोबत घेण्यापूर्वी…’  
12
Delhi Blast: ‘बूट सुसाइड बॉम्बर’च्या तंत्रामुळे गुप्तचर-तपास यंत्रणा झाली सतर्क!
13
‘श्री स्वामी समर्थ अथर्वशीर्ष’ दररोज म्हणता का? कालातीत लाभ होतात, स्वामी कायम कृपा करतात!
14
Shubman Gill Medical Update : गिल टीम इंडियासोबत गुवाहटीला जाणार का? BCCI नं माहिती दिली, पण अर्धवट
15
"...मग हा ग्रुप आला कुठून, या अपयशाला जबाबदार कोण?" ; ओवेसींनी अमित शाहांना करून जुनी दाव्याची आठवण
16
५४ तास विपरीत महालक्ष्मी राजयोग: ५ राशींना ४ पट लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ; अकल्पनीय फायदा!
17
जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांना वगळले! अंबादास दानवे म्हणाले, '९९% भागीदारी असताना चौकशी अहवालात नाव कसं नाही?'
18
वेदनादायी! ऑस्ट्रेलियात BMW ची भारतीय महिलेला धडक, जागीच मृत्यू; होती ८ महिन्यांची गर्भवती
19
NWA: नवी मुंबई महापालिका ठरली देशात अव्वल! जलशक्ती मंत्रालयाचा 'राष्ट्रीय जल पुरस्कार २०२४' पटकावला
20
अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप, 'मुलगा सोबत असूनही सही राहिलीच कशी?
Daily Top 2Weekly Top 5

महापुरुषांच्या समर्थानामुळे टिकली ब्रिटीश राजवट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:06 IST

पुणे : “पेशवे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राज्य करू शकले नाहीत. पेशवाई ब्राह्मणांच्या जानव्यात बंदिस्त होती. ब्राह्मणशाही स्वतःहून इंग्रजांकडे गेली. ...

पुणे : “पेशवे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राज्य करू शकले नाहीत. पेशवाई ब्राह्मणांच्या जानव्यात बंदिस्त होती. ब्राह्मणशाही स्वतःहून इंग्रजांकडे गेली. त्यांच्या पाठोपाठ आगरकर, रानडे, फुले या स्वातंत्र्य चळवळीतील महापुरुषांनी ब्रिटिश राजवटीचे समर्थन केले. त्यामुळे ब्रिटिशांनी दीडशे वर्ष राज्य केले,” असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केली.

महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक समिती आयोजित कोरेगाव भीमा विजयस्तंभ शौर्य पुरस्कार प्रदान सोहळयात ते बोलत होते. डॉ. सबनीस यांच्या हस्ते अनिता सावळे यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. महापालिकेच्या स्थायी समिती सदस्य लता राजगुरू, बाबा कांबळे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह प्रमोद आडकर आदी यावेळी उपस्थित होते.

डॉ. सबनीस म्हणाले की, आंबेडकर ब्राह्मणशाहीचा विरोध करत होते. त्यांनी दलितांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याबरोबरच ब्रिटिश राजवटीचाही विरोध केला. परंतु सगळेच ब्राह्मणेतर महापुरुष हे करू शकले नाहीत. देशात दलित, मुसलमान, जैन, ख्रिश्चन असे वेगवेगळ्या जातीधर्माचे लोक एकत्र राहतात. त्यामुळे भारत एकसंध ठेवणे. हे सर्वांचे कर्तव्य आहे. चीन आणि पाकिस्तान आपले शत्रू आहेत. आता दोन्ही ठिकाणी लढा देणे हे भाजप सरकारलाही शक्य होणार नाही. भविष्यातील भारत घडवताना देशांतर्गत सर्व आडवे-उभे संघर्ष बंद झाले पाहिजेत.

“एकोप्याचे धर्मकारण, राजकारण, समाजकारण निर्माण होणे गरजेचे आहे. महाराष्ट्र आणि देशाचा नकाशा शेतकऱ्यांच्या आंदोलनाने भयभीत झाला आहे. त्यांना अतिरेकी ठरवणारी प्रवृत्ती ही नालायक आहे. नेत्यांचा स्वार्थ खुर्चीशी आहे. ते कधीही एकोप्याची भूमिका घेत नाहीत. सध्याच्या काळात चळवळीतील सर्व महापुरुषांना एकत्र मानायला हवे,” अशी अपेक्षा डॉ. सबनीस यांनी व्यक्त केली.