शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

वनसंपदा चोरल्यास तीन वर्षे कैद; जैवविविधता कायद्यात तरतूद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 06:54 IST

जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी केंद्र सरकारने जैवविविधता कायदा २००२ मध्ये मंजूर केला; परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. म्हणून जैविक विविधता मंडळाची स्थापना करण्यात आली आहे.

- श्रीकिशन काळेपुणे : जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी केंद्र सरकारने जैवविविधता कायदा २००२ मध्ये मंजूर केला; परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. म्हणून जैविक विविधता मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. त्याद्वारे या कायद्याच्या कडक अंमलबजावणीसाठी पुढाकार घेतला आहे. स्थानिक ग्रामस्थांनी वनसंपदेची चोरी होत असेल, तर त्वरित मंडळाकडे तक्रार द्यावी. त्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करून त्याला कारागृहाची शिक्षा होऊ शकणार आहे.पुणे जिल्ह्यामध्ये जैवविविधता मंडळाकडून १४०२ समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. त्याद्वारे वनसंपदा जोपण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. सध्या पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी वनसंपदा आहे. ती मोठ्या प्रमाणावर लुटली जात आहे. त्यामुळे आता जैवविविधता मंडळाकडून स्थानिक जैवविविधता समित्या अशा चोरीवर लक्ष ठेवणार आहेत. वनसंपदेवर स्थानिक ग्रामस्थांचा हक्क असतो.भारत सरकारने जर्मन सरकारच्या (जीआयझेड) या संस्थेसोबत जैविक संसाधनाच्या वापरातून मिळणाऱ्या फायद्याचे समन्यायी वाटपाची रचना तयार व्हावी, यासाठी पथदर्शी प्रकल्प हाती घेतला आहे. त्याला एबीएस म्हणजे ‘अ‍ॅक्सेस अ‍ॅण्ड बेनीफिट शेअरिंग मेकॅनिझम,’ असे संबोधले जाते. या रचनेत कोणत्याही व्यक्तीने जैविक संसाधनांचा व्यावसायिक वापर केला तर त्यातून मिळणाºया फायद्यातून ३ ते ५ टक्के रक्कमही ज्या गावातून संसाधने गोळा केली, त्या गावास मंडळाच्या माध्यमातून निधीसंकलित केला जातो. हा प्रकल्प केवळ महाराष्ट्र आणि उत्तराखंड येथे राबविला जात आहे.स्थानिक वनसंपदा असेल ती अशीच कोणाला घेऊन जाता येणार नाही. आज पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी औषधी वनसंपदाआहे. त्याच्या माध्यमातून स्थानिक गावाला निधी मिळणार आहे, अशी माहिती मंडळाचे माहिती तंत्रज्ञान अधिकारी विवेक डवरी यांनी ‘लोकमत’ला दिली.जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वनसंपदापुणे जिल्ह्यात जुन्नर, आंबेगाव, भीमाशंकर परिसरात अनेक ठिकाणी वनसंपदा आहे. तेथून अनेकजण वनसंपदेची चोरी करतात किंवा स्वस्तात औषधी वनस्पती विकत घेतात.व्यापारी या वनस्पती कमी पैैशात विकत घेऊन दुसरीकडे चढ्या किमतीने विकतात. असा प्रकार होऊ नये, यासाठी औषधी वनस्पतींना योग्य तीच किंमत मिळण्यासाठी जैैवविविधता मंडळ प्रयत्न करीत आहे.त्यातून मिळणारा निधी हा स्थानिक वनसंपदेवरच खर्च होणार आहे, अशी माहिती जैवविविधता मंडळाचे तंत्रज्ञान अधिकारी विवेक डवरे यांनी दिली.मोठा नफा व्यापाºयांनाचशतावरी ही वनस्पती व्यापारी कमी पैशात विकत घेतात. त्याचे नेमके करायचे काय हे गावकºयांना माहीत नसते. त्यामुळे ते कमी पैशात विकतात; परंतु शतावरी वनस्पतीवर प्रक्रिया करून तीच ४०० रुपये किलो विकली जाते. त्यामुळे मोठा नफा व्यापारी घेतात. तो नफा जिथे वनसंपदा आहे त्यांना मिळावा, अशासाठी मंडळ काम करीत आहे. रस्त्याच्या कडेला चरोट्याचे झाड असतात. त्याचे बीसुद्धा खूप उपयोगी असते, अशी माहिती विवेक डवरे यांनी दिली. बेहडादेखील अत्यंत उपयुक्त असतो.

टॅग्स :Puneपुणे