शहरं
Join us  
Trending Stories
1
चालकाला डुलकी लागली, कार थेट दुभाजक ओलांडून ट्रॅकला जाऊन धडकली; एकाचा मृत्यू, धुळे-सोलापूर महामार्गावरील घटना
2
"पाकिस्तानने आधीच सिंधु पाणी कराराचे उल्लंघन केलेय", पाकच्या कांगाव्याला भारताकडून सडेतोड उत्तर!
3
कॉलेजचं प्रेम आयुष्यात परतलं, आधीच विवाहित असलेल्या जवानानं पत्नीला संपवलं
4
आनंदाची बातमी...! LPG सिलिंडरची किंमत पुन्हा कमी झाली; 1 जूनपासून ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवा दर
5
फक्त SIP च नाही, आता 'STP' नेही वाढवा म्युच्युअल फंडातला परतावा! जाणून घ्या ही खास योजना!
6
IPL 2025 : पुन्हा 'रोजंदारी'वर मिळालं काम! पण यावेळी MI नं दिला CSK पेक्षा दुप्पट पगार
7
शरीर संबंधास नकार मिळताच पती संतापला, पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला! मुंबईतील धक्कादायक घटना 
8
प्रेमाच्या मैदानात रिंकू सिंहचा महिला खासदाराने उडवला त्रिफळा, ८ जूनला होणार साखरपुडा
9
मोठा अपघात टळला! रुळांवर होते सिमेंट, लोखंडाचे पाईप, ड्रायव्हरच्या प्रसंगावधानाने वाचले हजारो प्रवाशांचे प्राण 
10
विशेष लेख: दादा, शिंदे, फडणवीसांचे 'कम्युनिकेशन' अन् एका विधानामुळे पडलेले असंख्य प्रश्न
11
नातेवाईकांना भेटायला गेला अन् तो पाकिस्तानचाच झाला, दिल्ली पोलिसांनी आणखी एका गद्दाराला केली अटक!
12
लेख: मनोरंजन उद्योगाला पायरसीचे ग्रहण; एक जण घेतो सबस्क्रिप्शन, पण पाहणारे मात्र अनेक!
13
आतंकवादी तुरुंगात अन् बायको झाली बाळंत, ओवेसींनी केली पाकिस्तानची पोलखोल! म्हणाले... 
14
लेख: २०३५ पर्यंतच राजकारण, मग परदेश पर्यटन! 'फ्युचर प्लॅनिंग'मध्ये आणखीही बरंच काही...
15
फक्त २५० रुपयांनी सुरुवात, ७० लाखांपर्यंतचा जमेल निधी! मुलीचे शिक्षण आणि लग्नाची चिंता कायमची मिटेल
16
विशेष लेख: पिस्तूल कोणालाही मिळते कसे? शस्त्र परवाना कसा मिळतो? त्याची प्रक्रिया कशी असते?
17
Miss World 2025: कोण आहे मिस वर्ल्ड ओपल सुचाता? १६व्या वर्षी ब्रेस्टमध्ये गाठ सापडली अन्...
18
भाजपच्या मुंबई अध्यक्षांचा तिढा कायम! मुंबईतील तीन भागांसह वसई-विरारला मिळाले जिल्हाध्यक्ष
19
मंत्र्यांच्या पीएस, ओएसडीवर मुख्यमंत्री कार्यालयाचा 'वॉच'; कामाचे होणार मूल्यमापन
20
'हिरामंडी' फेम शर्मिन सहगलच्या घरी आला नवा पाहुणा, लग्नाच्या २ वर्षांनी संजय लीला भन्साळींची भाची झाली आई

रेशनवरील तीन महिन्यांचे धान्य जूनमध्येच मिळणार; राज्य सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 09:51 IST

राज्यात शिधापत्रिकेवरील तीन महिन्यांचे अर्थात ऑगस्टपर्यंतचे धान्य जूनमध्येच देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

पुणे : पावसाळा तसेच महापुरासारख्या आपत्तीजन्य परिस्थितीत आता राज्यात शिधापत्रिकेवरील तीन महिन्यांचे अर्थात ऑगस्टपर्यंतचे धान्य जूनमध्येच देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या धान्याची उचल ३१ मेपर्यंत करण्याचे आदेश देण्यात आले असून, जिल्ह्यात आतापर्यंत २१ टक्के धान्य गोदामांमधून उचलण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर यांनी दिली. त्यामुळे ग्राहकांनी जूनमध्ये आपल्या हक्काचे तीन महिन्यांचे धान्य एकत्रित घेऊन जावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

आगामी पावसाळा आणि परिणामी पूर इत्यादी प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे धान्याची कार्यक्षम वाहतूक आणि साठवणुकीसाठी राज्ये, तसेच केंद्रशासित प्रदेशांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता केंद्र सरकारने स्वतंत्र निर्देश दिले आहेत. त्यात लाभार्थ्यांना वेळेत अन्नधान्याचे वितरण करण्यासाठी राष्ट्रीय अन्नधान्य सुरक्षा योजनेतील धान्यवाटपासाठी ऑगस्टपर्यंतच्या अन्नधान्याची आगाऊ उचल ३१ मेपर्यंत करून त्याचे वाटप ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.त्यानुसार जूनच्या नियतनाची उचल जलद गतीने पूर्ण करावी व जुलै व ऑगस्टच्या नियतनाची उचल सुरू करावी, अशा सूचना पुरवठा विभागाला देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यांकडून पूर्ण क्षमतेने अन्नधान्याची उचल करण्यासाठी वाहनांची संख्या वाढविण्यात यावी. धान्याची उचल ही जलद गतीने होण्याकरिता, धान्याची उचल ही थेट वॅगनमधून करण्यात यावी. त्यासाठी सुटीच्या अर्थात शनिवारी व रविवारी भारतीय अन्नधान्य महामंडळाच्या गोदामांमधून उचल देण्यात येणार आहे, असेही राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या दिवशी देखील अन्नधान्याची उचल करण्यात यावी. सुटीच्या दिवसाच्या एक दिवस अगोदर सुटीच्या दिवशी उचल करण्यात येणाऱ्या अन्नधान्याची माहिती महामंडळाच्या विभागीय व्यवस्थापकांना उपलब्ध करून देण्यात यावी, जेणे करून महामंडळाला त्यानुसार व्यवस्था करणे शक्य होईल, असेही सुचविण्यात आले आहे.

सुधळकर म्हणाले, पावसाळ्यामुळे जून ते ऑगस्ट अशा तीन महिन्यांचे एकत्रित धान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार महामंडळाच्या गोदामांमधून धान्याची उचल सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात २७ मेपर्यंत एकूण धान्याच्या २१ टक्के उचल पूर्ण झाली आहे. हे धान्य एकूण १८५९ दुकानांपैकी ५३१ दुकानांमध्ये पोच करण्यात आले आहे. ही उचल करण्यासाठी ३१ मेपर्यंतची मुदत आहे. काही तांत्रिक कारणास्तव उचल थोडी पुढे जाऊ शकते. मात्र, सरकारच्या सूचनेनुसार ३० जूनपर्यंत तिन्ही महिन्यांचे धान्य वाटप करण्यात येईल. दरम्यान, मे महिन्याचे पोच केलेल्या धान्यापैकी ७२ टक्क्यांहून अधिक ग्राहकांना वितरित करण्यात आल्याचेही सुधळकर यांनी स्पष्ट केले.

महिनानिहाय धान्य वाटप-- उचल (टनांमध्ये)

जून १२८९६--८१७०.८३जुलै १२७८३--००ऑगस्ट १४०४१--०० रेशन जोडपुणे शहरातील धान्य वाटप-- उचल

जून ६९४०.५० --४०००जुलै ६९४१.१५--००

ऑगस्ट ६९४१.१५--००एकूण उचल २५ टक्के

शहरात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे धान्य उचल करण्यात अडचणी आल्या. त्यामुळे ३१ मेपर्यंत संपूर्ण धान्य उचलता येणे शक्य नाही. मात्र, लवकर उचल पूर्ण करण्यात येईल.  - प्रशांत खताळ, अन्नधान्य वितरण अधिकारी, पुणे शहर

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडfoodअन्न