शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

रेशनवरील तीन महिन्यांचे धान्य जूनमध्येच मिळणार; राज्य सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 09:51 IST

राज्यात शिधापत्रिकेवरील तीन महिन्यांचे अर्थात ऑगस्टपर्यंतचे धान्य जूनमध्येच देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

पुणे : पावसाळा तसेच महापुरासारख्या आपत्तीजन्य परिस्थितीत आता राज्यात शिधापत्रिकेवरील तीन महिन्यांचे अर्थात ऑगस्टपर्यंतचे धान्य जूनमध्येच देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या धान्याची उचल ३१ मेपर्यंत करण्याचे आदेश देण्यात आले असून, जिल्ह्यात आतापर्यंत २१ टक्के धान्य गोदामांमधून उचलण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर यांनी दिली. त्यामुळे ग्राहकांनी जूनमध्ये आपल्या हक्काचे तीन महिन्यांचे धान्य एकत्रित घेऊन जावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

आगामी पावसाळा आणि परिणामी पूर इत्यादी प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे धान्याची कार्यक्षम वाहतूक आणि साठवणुकीसाठी राज्ये, तसेच केंद्रशासित प्रदेशांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता केंद्र सरकारने स्वतंत्र निर्देश दिले आहेत. त्यात लाभार्थ्यांना वेळेत अन्नधान्याचे वितरण करण्यासाठी राष्ट्रीय अन्नधान्य सुरक्षा योजनेतील धान्यवाटपासाठी ऑगस्टपर्यंतच्या अन्नधान्याची आगाऊ उचल ३१ मेपर्यंत करून त्याचे वाटप ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.त्यानुसार जूनच्या नियतनाची उचल जलद गतीने पूर्ण करावी व जुलै व ऑगस्टच्या नियतनाची उचल सुरू करावी, अशा सूचना पुरवठा विभागाला देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यांकडून पूर्ण क्षमतेने अन्नधान्याची उचल करण्यासाठी वाहनांची संख्या वाढविण्यात यावी. धान्याची उचल ही जलद गतीने होण्याकरिता, धान्याची उचल ही थेट वॅगनमधून करण्यात यावी. त्यासाठी सुटीच्या अर्थात शनिवारी व रविवारी भारतीय अन्नधान्य महामंडळाच्या गोदामांमधून उचल देण्यात येणार आहे, असेही राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या दिवशी देखील अन्नधान्याची उचल करण्यात यावी. सुटीच्या दिवसाच्या एक दिवस अगोदर सुटीच्या दिवशी उचल करण्यात येणाऱ्या अन्नधान्याची माहिती महामंडळाच्या विभागीय व्यवस्थापकांना उपलब्ध करून देण्यात यावी, जेणे करून महामंडळाला त्यानुसार व्यवस्था करणे शक्य होईल, असेही सुचविण्यात आले आहे.

सुधळकर म्हणाले, पावसाळ्यामुळे जून ते ऑगस्ट अशा तीन महिन्यांचे एकत्रित धान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार महामंडळाच्या गोदामांमधून धान्याची उचल सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात २७ मेपर्यंत एकूण धान्याच्या २१ टक्के उचल पूर्ण झाली आहे. हे धान्य एकूण १८५९ दुकानांपैकी ५३१ दुकानांमध्ये पोच करण्यात आले आहे. ही उचल करण्यासाठी ३१ मेपर्यंतची मुदत आहे. काही तांत्रिक कारणास्तव उचल थोडी पुढे जाऊ शकते. मात्र, सरकारच्या सूचनेनुसार ३० जूनपर्यंत तिन्ही महिन्यांचे धान्य वाटप करण्यात येईल. दरम्यान, मे महिन्याचे पोच केलेल्या धान्यापैकी ७२ टक्क्यांहून अधिक ग्राहकांना वितरित करण्यात आल्याचेही सुधळकर यांनी स्पष्ट केले.

महिनानिहाय धान्य वाटप-- उचल (टनांमध्ये)

जून १२८९६--८१७०.८३जुलै १२७८३--००ऑगस्ट १४०४१--०० रेशन जोडपुणे शहरातील धान्य वाटप-- उचल

जून ६९४०.५० --४०००जुलै ६९४१.१५--००

ऑगस्ट ६९४१.१५--००एकूण उचल २५ टक्के

शहरात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे धान्य उचल करण्यात अडचणी आल्या. त्यामुळे ३१ मेपर्यंत संपूर्ण धान्य उचलता येणे शक्य नाही. मात्र, लवकर उचल पूर्ण करण्यात येईल.  - प्रशांत खताळ, अन्नधान्य वितरण अधिकारी, पुणे शहर

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडfoodअन्न