शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

Pune: ‘नीरा देवघर’प्रकल्पाला साडेतीन हजार कोटी, केंद्र सरकारची अंतिम मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2023 12:53 IST

या प्रकल्पात गुंतवणूक करण्यास केंद्र सरकारने अंतिम मान्यता दिल्याने या योजनेचा लाभ पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यांतील शेतीला मिळणार आहे....

पुणे : पंतप्रधान किसान सिंचन योजनेत समावेश झाल्याने बहुचर्चित नीरा देवघर धरणाच्या प्रस्तावित १०० किलोमीटर कालव्याच्या कामासाठी सुमारे साडेतीन हजार रुपयांचा निधी मिळणार आहे. या प्रकल्पात गुंतवणूक करण्यास केंद्र सरकारने अंतिम मान्यता दिल्याने या योजनेचा लाभ पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यांतील शेतीला मिळणार आहे.

केंद्र सरकारकडून दहा हजार हेक्टर कृषी सिंचन क्षमता असलेल्या धरण प्रकल्पांना पंतप्रधान किसान सिंचन योजनेत समाविष्ट केल्यानंतर ठराविक निधी देण्यात येतो. यापूर्वी पुणे विभागातील सांगोला शाखा कालवा प्रकल्पाला केंद्रीय जल आयोगाची मान्यता मिळाली होती. त्या धर्तीवर नीरा देवघरच्या १५८ किलोमीटर लांबीच्या कालव्यापैकी ९३ किलोमीटरच्या बंदिस्त कालव्याला मान्यता मिळावी, यासाठी पुणे पाटबंधारे विभागाने प्रस्ताव पाठविला होता. या प्रकल्पासाठी सुमारे साडेतीन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास केंद्र सरकारने अखेर मान्यता दिली आहे.

धरणाच्या उजव्या कालव्याचे सुमारे ६५ किलोमीटर लांबीच्या खुल्या भागाचे काम पूर्ण झाल्याने सुमारे ४७ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. केंद्रीय जलसंपदामंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी नीरा देवघर धरणाला भेट देऊन या धरणापासून पंढरपूरपर्यंत प्रकल्पाची पाहणी केली. याबाबत त्यांनी आश्वासन दिले होते. त्यानुसार, केंद्र सरकारने साडेतीन हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीस मान्यता दिली. त्यामुळे आता या प्रकल्पाला गती मिळणार आहे.

यासाठी माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी गेल्या तीन वर्षांपासून पाठपुरावा केला होता. यामुळे माळशिरस, फलटण, सांगोला, पंढरपूर, खंडाळा या दुष्काळग्रस्त भागांना २०२५ मध्ये या योजनेतून पाणी मिळेल. यासाठी केंद्र सरकार ६० टक्के, तर राज्य सरकार ४० टक्के निधी देणार आहे. परिणामी सुमारे ६० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. तसेच दहा लाख कुटुंबांना पाणी मिळणार आहे. १४ टीएमसी पाण्याची क्षमता असलेला आणि १२.९८ टीएमसी साठवण क्षमता असलेला हा प्रकल्प येत्या दोन वर्षात खुला होणार आहे, असे निंबाळकर यांनी सांगितले.

प्रस्तावानुसार केंद्र सरकारने ६० टक्के वाटा उचलण्याचे मान्य केले आहे. त्याची अंतिम मंजुरी सरकारने दिली. त्यामुळे हा प्रकल्प येत्या तीन वर्षांत पूर्ण होईल.

- रणजितसिंह निंबाळकर, खासदार 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड