शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
4
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
5
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
6
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
7
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
8
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
9
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
10
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
11
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
12
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
13
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
14
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
15
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
16
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
17
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
18
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
19
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
20
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय

विचार दाबले तरी नष्ट होत नाहीत- नागनाथ कोत्तापल्ले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 02:02 IST

नयनतारा सहगल यांच्या भाषणाचे अभिवाचन

पिंपरी : नयनतारा सहगल यांचे साहित्य संमेलनातील भाषण रद्द करणे हे सुसंस्कृत समाजाला शोभणारे नाही. एखादा विचार जेव्हा दाबण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा तो सहजासहजी नष्ट होत नाही. तो केव्हातरी बाहेर येतोच, असे प्रतिपादन डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी केले. चिंचवड येथील प्रतिभा महाविद्यालयात स्वंयसिद्द प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या ‘चला व्यक्त होऊ या’ या कार्यक्रमात ते बोलत होते.लेखिका नयनतारा सहगल यांनी संमेलनासाठी लिहिलेल्या उद्घाटनपर भाषणाचे अभिवाचन या वेळी करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुरेश बेरी, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तुकाराम पाटील, शब्दधन काव्यमंचचे अध्यक्ष सुरेश कंक आदी उपस्थित होते.डॉ. कोत्तापल्ले म्हणाले, सहगल यांचे भाषण रद्द केले़ खरे मात्र यामुळेच त्यांनी लिहिलेल्या भाषणाची सर्वात जास्त प्रसिद्धी झाली. समाजामध्ये काय खदखद सुरू आहे हे संमेलनामधून समजते. कारण संमेलन हा दर्शक बिंदू आहे. अनेक वेळा असे दिसून येते की साहित्य मंडळ हे एकाधिकारशाहीकडे झुकले आहे.प्रा. तुकाराम पाटील म्हणाले, कुठल्याही दबावाखाली येऊन साहित्य मंडळ निर्णय घेत असेल तर लेखकाला उभे राहिलेच पाहिजे. याचाच अर्थ लेखकाने लिहिते झाले पाहिजे. डॉ. सुरेश बेरी म्हणाले, लेखकांना बोलण्याचे, लिहिण्याचे स्वातंत्र्य राहिले नाही. सद्य:स्थितीत वर्तमान हे असह्य होत आहे. कुठल्याही घटकाला आपण सुरक्षित आहोत असे वाटत नाही. सुरेश कंक म्हणाले, सृष्टीमध्ये अनेक बदल घडत आहेत. ज्या समाजामध्ये परिवर्तन होऊ शकत नाही तो समाज कधी मोठा होऊ शकत नाही. म्हणून परिवर्तन होत राहिले पाहिजे. दिनेश भोसले, मृण्मयी नारद यांनी संमेलनाच्या उद्घाटनपर भाषणाचे अभिवाचन केले. सविता इंगळे यांनी प्रास्ताविक केले.

टॅग्स :Puneपुणे