शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

विचार दाबले तरी नष्ट होत नाहीत- नागनाथ कोत्तापल्ले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 02:02 IST

नयनतारा सहगल यांच्या भाषणाचे अभिवाचन

पिंपरी : नयनतारा सहगल यांचे साहित्य संमेलनातील भाषण रद्द करणे हे सुसंस्कृत समाजाला शोभणारे नाही. एखादा विचार जेव्हा दाबण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा तो सहजासहजी नष्ट होत नाही. तो केव्हातरी बाहेर येतोच, असे प्रतिपादन डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी केले. चिंचवड येथील प्रतिभा महाविद्यालयात स्वंयसिद्द प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या ‘चला व्यक्त होऊ या’ या कार्यक्रमात ते बोलत होते.लेखिका नयनतारा सहगल यांनी संमेलनासाठी लिहिलेल्या उद्घाटनपर भाषणाचे अभिवाचन या वेळी करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुरेश बेरी, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तुकाराम पाटील, शब्दधन काव्यमंचचे अध्यक्ष सुरेश कंक आदी उपस्थित होते.डॉ. कोत्तापल्ले म्हणाले, सहगल यांचे भाषण रद्द केले़ खरे मात्र यामुळेच त्यांनी लिहिलेल्या भाषणाची सर्वात जास्त प्रसिद्धी झाली. समाजामध्ये काय खदखद सुरू आहे हे संमेलनामधून समजते. कारण संमेलन हा दर्शक बिंदू आहे. अनेक वेळा असे दिसून येते की साहित्य मंडळ हे एकाधिकारशाहीकडे झुकले आहे.प्रा. तुकाराम पाटील म्हणाले, कुठल्याही दबावाखाली येऊन साहित्य मंडळ निर्णय घेत असेल तर लेखकाला उभे राहिलेच पाहिजे. याचाच अर्थ लेखकाने लिहिते झाले पाहिजे. डॉ. सुरेश बेरी म्हणाले, लेखकांना बोलण्याचे, लिहिण्याचे स्वातंत्र्य राहिले नाही. सद्य:स्थितीत वर्तमान हे असह्य होत आहे. कुठल्याही घटकाला आपण सुरक्षित आहोत असे वाटत नाही. सुरेश कंक म्हणाले, सृष्टीमध्ये अनेक बदल घडत आहेत. ज्या समाजामध्ये परिवर्तन होऊ शकत नाही तो समाज कधी मोठा होऊ शकत नाही. म्हणून परिवर्तन होत राहिले पाहिजे. दिनेश भोसले, मृण्मयी नारद यांनी संमेलनाच्या उद्घाटनपर भाषणाचे अभिवाचन केले. सविता इंगळे यांनी प्रास्ताविक केले.

टॅग्स :Puneपुणे