शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

विचार दाबले तरी नष्ट होत नाहीत- नागनाथ कोत्तापल्ले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 02:02 IST

नयनतारा सहगल यांच्या भाषणाचे अभिवाचन

पिंपरी : नयनतारा सहगल यांचे साहित्य संमेलनातील भाषण रद्द करणे हे सुसंस्कृत समाजाला शोभणारे नाही. एखादा विचार जेव्हा दाबण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा तो सहजासहजी नष्ट होत नाही. तो केव्हातरी बाहेर येतोच, असे प्रतिपादन डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी केले. चिंचवड येथील प्रतिभा महाविद्यालयात स्वंयसिद्द प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या ‘चला व्यक्त होऊ या’ या कार्यक्रमात ते बोलत होते.लेखिका नयनतारा सहगल यांनी संमेलनासाठी लिहिलेल्या उद्घाटनपर भाषणाचे अभिवाचन या वेळी करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुरेश बेरी, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तुकाराम पाटील, शब्दधन काव्यमंचचे अध्यक्ष सुरेश कंक आदी उपस्थित होते.डॉ. कोत्तापल्ले म्हणाले, सहगल यांचे भाषण रद्द केले़ खरे मात्र यामुळेच त्यांनी लिहिलेल्या भाषणाची सर्वात जास्त प्रसिद्धी झाली. समाजामध्ये काय खदखद सुरू आहे हे संमेलनामधून समजते. कारण संमेलन हा दर्शक बिंदू आहे. अनेक वेळा असे दिसून येते की साहित्य मंडळ हे एकाधिकारशाहीकडे झुकले आहे.प्रा. तुकाराम पाटील म्हणाले, कुठल्याही दबावाखाली येऊन साहित्य मंडळ निर्णय घेत असेल तर लेखकाला उभे राहिलेच पाहिजे. याचाच अर्थ लेखकाने लिहिते झाले पाहिजे. डॉ. सुरेश बेरी म्हणाले, लेखकांना बोलण्याचे, लिहिण्याचे स्वातंत्र्य राहिले नाही. सद्य:स्थितीत वर्तमान हे असह्य होत आहे. कुठल्याही घटकाला आपण सुरक्षित आहोत असे वाटत नाही. सुरेश कंक म्हणाले, सृष्टीमध्ये अनेक बदल घडत आहेत. ज्या समाजामध्ये परिवर्तन होऊ शकत नाही तो समाज कधी मोठा होऊ शकत नाही. म्हणून परिवर्तन होत राहिले पाहिजे. दिनेश भोसले, मृण्मयी नारद यांनी संमेलनाच्या उद्घाटनपर भाषणाचे अभिवाचन केले. सविता इंगळे यांनी प्रास्ताविक केले.

टॅग्स :Puneपुणे