शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
2
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
3
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
4
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
5
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
6
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
7
अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं?
8
"संजय राऊत सर्वात मोठा XXX, ते त्याच लायकीचे..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचं विधान
9
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
10
Video : दक्षिण कोरियात पोहोचले डोनाल्ड ट्रम्प; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले तोंडभरून कौतुक! म्हणाले...
11
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
12
राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!
13
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
14
गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
15
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
16
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
17
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
18
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
19
जेवण बनवता येत नाही, काही शिकवले नाही का? वरळीतील विवाहितेला छळ असह्य, सासरच्यांविरोधात दिली तक्रार
20
कमी भाड्याचं आमिष दाखवून महिलांना टॅक्सीत बसवायचे अन् रस्त्यातच...; कुठे घडत होत्या धक्कादायक घटना?

जवानांना संरक्षण न देणाऱ्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही; शरद पवार यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 09:01 IST

पुलवामामध्ये जवानांना विमाने न मिळाल्याने त्याचा जीव गेला, त्यामुळे अशा सरकारला सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही

सासवड (पुणे) : ज्या सरकारला देशाच्या जवानांचे संरक्षण करता येत नाही, त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केंद्र सरकारवर ताशेरे ओढले. सासवड (ता. पुरंदर) येथे सोमवारी आयोजित शेतकरी व युवक मेळाव्यात ते बोलत होते.

जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केंद्र सरकारच्या निष्काळजीपणामुळेच पुलवामा हल्ला झाल्याचा आरोप केला होता. यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘पुलवामामध्ये जवानांना विमाने न मिळाल्याने त्याचा जीव गेला, त्यामुळे अशा सरकारला सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही,’ असे पवार म्हणाले.

आज शेतकरी अडचणीत आहे. अवकाळी पावसाने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. संकटातील शेतकऱ्यांना बाहेर काढणे सरकारची जबाबदारी आहे. शेतकरी आत्महत्या करतात, हे दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र सरकारने मदत केली पाहिजे, असेही पवार म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारForceफोर्सPoliticsराजकारणpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला