शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

'दोनशे' च्यावर सूर्यग्रहणांना नजरकैद करणाऱ्या ' त्या ' आजीबाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 17:02 IST

१९६१ सालापासून म्हणजेच अकरा वर्षांची असताना सूर्यग्रहणाबद्दल कळू लागले...

ठळक मुद्दे बऱ्याच प्रतीक्षेनंतर सूर्यग्रहण दिसले तरी नागरिकांनी ते पाहण्याचा मनमुराद लुटला आनंद बालगंधर्व पुलावर नागरिकांची गर्दी

अतुल चिंचली -  

पुणे: माझ्या लहानपणापासून खग्रास आणि खंडग्रास ग्रहणे पाहण्याची आवड होती. तसेच वडीलधारी मंडळी व शालेय शिक्षकांकडून ग्रहणाबद्दल मिळणाऱ्या माहितीने त्या विषयीची उत्सुकता आणखीनच ताणली गेली. त्याकाळचं अजून एक वैशिष्टये म्हणजे लहान असताना ग्रहणाच्यावेळी दान मागणारी लोकं येत होती. मात्र हल्ली ती नजरेला पडत नाही.. वर्षातून अनेकवेळा सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण दिसतात. माझ्या वडिलांनी लावलेल्या सवयीमुळेच लहानपणापासूनच सूर्यग्रहण पाहत आले आहे. त्यामुळे आतापर्यंत जवळपास दोनशेपेक्षा जास्त सूर्यग्रहण माझ्या पाहण्यात आली आहेत, असा अनुभव ज्येष्ठ महिला सुमन सुकाळे यांनी ‘लोकमत’ ला सांगितला.       गुरुवारी सकाळी पुण्यात खंडग्रास सूर्यग्रहण पाहायला मिळाले. यासाठी बालगंधर्व पुलावर नागरिकांनी गर्दी केली होती. त्यामध्ये लहान मुलांपासून ते ज्येष्ठांचा सहभाग दिसून आला. बऱ्याच प्रतीक्षेनंतर सूर्यग्रहण दिसले तरी नागरिकांनी ते पाहण्याचा मनमुराद आनंद लुटला. सुमन सुकाळे यांचा जन्म १९५२ साली झाला. आता त्यांचे वय ६७ आहे. लहानपणापासूनच त्या वडिलांसोबत सूर्यग्रहण पाहायला जात असे. सुकाळे म्हणाल्या, आम्ही लहान असताना वडील आवडीने सूर्यग्रहण बघायला घेऊन जात असे. पण १९६१ सालापासून म्हणजेच अकरा वर्षांची असताना सूर्यग्रहणबद्दल कळू लागले. तेव्हा चष्मा घालून सूर्यग्रहण पाहा. अशी जनजागृती केली जात नव्हती. म्हणून बहुतेक लोकांना त्रासही होत असे. आता मात्र वृत्तपत्रे, अनेक  संस्था याबाबत माहिती देतात. ही अभिमानास्पद गोष्ट आहे. त्याकाळात खग्रास आणि खंडग्रास सूर्यग्रहण पाहायला मिळत असे. शालेय अभ्यासक्रमापेक्षा वडीलधाऱ्या माणसांककडून सूर्यग्रहण म्हणजे काय. हे सांगितले जात होते. आम्ही लहान असताना सूर्यग्रहणाच्या वेळी दान मागणारी लोक येत होती. त्यांना ग्रहणाच्या एका दिवसात भरभरून दान मिळत होते. प्रत्येक नागरिक त्यांना पैसे किंवा इतर गोष्टी देत होते. आता मात्र ती लोक अजिबात दिसत नाहीत. ग्रहणाच्या वेळी दान मागणाऱ्या लोकांचे वेगळेपण होते. एवढ्या वर्षात १९८० साली सर्वात मोठे खग्रास सूर्यग्रहण दिसले होते. ते अजूनही लोकांच्या लक्षात आहे. आतापर्यंत तसे सूर्यग्रहण दिसले नाही. पूर्वी सूर्यग्रहणाच्या वेळी शक्यतो ढगाळ वातावरण आढळत नसे. परंतु वातावरणातील बदलामुळे या सूर्यग्रहण पाहणे अवघड होतं चालले आहे. ज्येष्ठांपेक्षा लहान मुलांनी आणि तरुणांनी अशा भौगोलिक गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे.........

टॅग्स :Puneपुणेsurya grahanसूर्यग्रहण