शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

यंदाचे साहित्य संमेलन गैरसोयीचे असणार नाही! उषा तांबे यांनी दिली ग्वाही

By श्रीकिशन काळे | Updated: June 25, 2023 17:13 IST

महाराष्ट्राबाहेरील साहित्यिकांसाठी संमेलनात आंतरभारती नावाने कार्यक्रम घेण्यात येणार

पुणे : गतवर्षी संमेलनात प्रकाशकांची गैरसोय झाली होती. पण यंदा आम्ही खास सोय करत आहोत. एका प्रकाशकाचा सत्कारही करत आहोत. गेल्या वर्षीच्या गैरसोयी यंदा आम्ही सुधारत आहोत. यंदा गाळे कमी केले आहेत. त्यामुळे व्यवस्थापन करताना सोपे जाईल, असे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी सांगितले.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. रवींद्र शोभणे यांची निवड रविवारी पुण्यात करण्यात आली. त्या वेळी तांबे या पत्रकारांशी बोलत होत्या. यंदा सोयींसाठी खास व्यवस्था असणार आहे. स्वच्छतागृहे, जेवण, पाणी अशी सर्व सोयी असतील. सर्व खबरदारी असणार आहे. गतवर्षी प्रकाशकांची गैरसोय झाली हे आम्ही मान्य करतो. ग्रंथ प्रदर्शनात गाळे गोलाकार न करता समोरासमोर ठेवण्यात येतील. सर्वांना ते सोपे जाईल. महाराष्ट्राबाहेरील साहित्यिकांसाठी संमेलनात आंतरभारती नावाने कार्यक्रम घेण्यात येणार आहे. त्यांनाही सामावून घेण्यात येईल, असेही त्या बोलल्या.

अभिजात दर्जासाठी सर्वांनी एकत्र यावे 

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी महामंडळ सातत्याने प्रयत्न करत आहोत. नागरिक व सर्वांनी मिळून अभिजात दर्जासाठी प्रयत्न करायला हवेत. तसेच यंदा संमेलन उद‌्घाटनाला इतर भाषेतील उद‌्घाटक बोलवणार नाही. आपल्याच भाषेतील उद‌्घाटन आणावेत, असा विचार आहे. पण सर्व बाजूने विचार करण्यात येईल.

खर्च कोण करते ?

शासनाने आम्हाला प्रश्न विचारला आहे की, तुम्हाला २ कोटी द्यायचे झाले तर तुम्ही किती गोळा करणार ? आम्ही पैसे गोळा करत नाहीत. खर्च हा निमंत्रक संस्था करते. सरकार अनुदान देते. त्यातून खर्च होतो. एकूण संमेलनाचा खर्च किती होणार, याविषयी आम्ही सरकारला अंदाज दिला आहे. संमेलनाचा खर्च हा आयोजक प्रतिनिधी शुल्क त्यात जेवणखाणं, जाहिरात खर्च यातून सर्व संमेलनाचा खर्च होतो. स्मरणिकेसाठी खर्च होतो.

राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेप  

राजकीय व्यक्तींना संमेलनाला बोलावले जाते. यंदा त्याविषयी काय नियोजन केले आहे, यावर तांबे म्हणाल्या, राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेप होतोच. राजकीय व्यक्तींनाही संमेलन महत्त्वाचे वाटते. त्यामुळे त्याला आम्ही काही करता येत नाही. एकच व्यक्ती १७ संमेलनाच्या उद‌्घाटनाप्रसंगी उपस्थित झालेला आहे. याला काही करता येत नाही, अशी खंत तांबे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Puneपुणेakhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळcultureसांस्कृतिकartकलाGovernmentसरकारmusicसंगीत