शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

वयाच्या ९९ व्या वर्षी हा गौरव काश्मिरी जनतेचा..!

By श्रीकिशन काळे | Updated: December 28, 2024 16:20 IST

लेखक प्राण किशोर कौल : साहित्य अकादमीतर्फे सर्वोच्च फेलोशिपने पुण्यात गौरव

पुणे : वयाच्या 99 व्या वर्षी साहित्य अकादमीने सर्वोच्च फेलोशिप प्रदान करून केलेला हा गौरव फक्त माझा एकट्याचा नसून काश्मिरी जनता, काश्मिरमधील साहित्यिक आणि काश्मिरी भाषा बोलणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा आहे, अशा भावना काश्मिरी लेखक, दिग्दर्शक, नाटककार आणि चित्रकार प्राण किशोर कौल यांनी व्यक्त केल्या.

दिल्लीस्थित साहित्य अकादमीतर्फे प्राण किशोर कौल यांचा नुकताच पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी देशातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च फेलोशिप देऊन गौरव करण्यात आला. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यासह देशातील निवडक साहित्यिकांना या पूर्वी ही फेलोशिप देऊन गौरविण्यात आले आहे. हा सन्मान मिळविणारे कौल हे दुसरे काश्मिरी साहित्यिक आहेत. पहिला पुरस्कार प्रो. रहमान राही यांना मिळाला होता.कुटुबियांच्या उपस्थितीत प्राण किशोर कौल यांचा शाल आणि ताम्रपट देऊन साहित्य अकादमीचे अध्यक्ष डॉ. माधव कौशिक आणि सचिस डॉ. के. श्रीनिवास राव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सरहदचे अध्यक्ष संजय नहार उपस्थित होते.

प्राण किशोर कौल म्हणाले, आयुष्यात साहित्य अकादमी फेलोशिप मिळण्याचा क्षण येईल अशी मी कल्पनाही केली नव्हती. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रादेशिक भाषांचा विस्तार साहित्य अकादमीच्या प्रयत्नांमुळे होऊ शकला. 1998 साली माझ्या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. त्यानंतरही मी विपुल लेखन करीत असताना साहित्य अकादमीशी जोडलेलो होतो. माझ्या कारकिर्दीवर चित्रपट बनविला गेला हा माझ्यासाठी गौरवाचा क्षण होता. ’’

प्राण किशोर कौल यांच्या कार्याचा गौरव करून साहित्यिक डॉ. माधव कौशिक म्हणाले, प्राण किशोर कौल यांनी विविध माध्यमांमधून आपली अभिव्यक्ती प्रदर्शित केली. साहित्यकृती साकारताना चित्रपट निर्मिती, चित्रकृतींच्या माध्यमातूनही ते व्यक्त झाले आहेत. प्राण किशोर कौल हे काश्मिरी संस्कृतीचे प्राणतत्त्वच सिद्ध झाले आहेत. प्राण किशोर कौल यांच्या साहित्यकृती हिमालयासारख्या उंच तर आहेतच त्याच वेळेला त्या नदीच्या खळखळाटासारख्याही भासतात. पद्यरूपी गद्याची लेखनशैली हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड