शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

साडेतीन हजार गावांचा घसा कोरडा, एप्रिलपासून जाणवणार टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 06:08 IST

राज्यातील तब्बल साडेतीन हजारांहून अधिक गावांना एप्रिल महिन्यापासून पाणीटंचाई जाणवू शकते

विशाल शिर्के  पुणे : राज्यातील तब्बल साडेतीन हजारांहून अधिक गावांना एप्रिल महिन्यापासून पाणीटंचाई जाणवू शकते, असा अंदाज भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने वर्तविला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातच त्याची सर्वाधिक झळ बसणार असल्याचे संभाव्य पाणीटंचाई अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या भागाकडे प्रशासनाला अधिक लक्ष द्यावे लागणार आहे.

भूजल सर्वेक्षण विभागाच्या वतीने राज्यातील ३ हजार ९२० निरीक्षण विहिरींद्वारे निरीक्षण केले जाते. झालेले पर्जन्यमान आणि पावसाळा संपल्यानंतरची तेथील भूजल पातळी याद्वारे हा अंदाज वर्तविण्यात येतो. याशिवाय पर्जन्यमानाची तीव्रता व त्याचा कालावधी, ऊस, केळी, संत्रा, द्राक्ष अशा पिकांसाठी होणारा भूजल उपसा हीदेखील भूजल पातळी घटण्याची कारणे आहेत. हा सर्व विचार करूनच संभाव्य टंचाईग्रस्त गावे निश्चित केली जातात. सरासरीच्या वीस टक्क्यांपर्यंतची पर्जन्यतूट ही सामान्य मानली जाते. तर, एक ते २ मीटर आणि त्यापुढे पाणीपातळीत घट असल्यास या भागात पाणीटंचाई जाणवते, असे अहवालात म्हटले आहे.

राज्यात यवतमाळमधील १४ तालुक्यांतील तब्बल ८२३ गावांत संभाव्य टंचाई जाणवेल, असा अंदाज आहे. त्यात यवतमाळ तालुक्यातील १२८, वणी ११८ आणि कळंबमधील १०९ गावांचा समावेश आहे. वर्ध्यातील देवळी, समुद्रपूर आणि वर्धा तालुक्यात मिळून २३२ गावांना टंचाईची झळ बसेल. सोलापुरातील २४ गावांतील भूजल पातळी खालावली आहे. त्यात अक्कलकोटमधील १५, मोहोळ २ आणि दक्षिण सोलापूर मधील ७ गावांचा समावेश आहे. पाण्याची संभाव्य टंचाई असणाऱ्या या सर्व ठिकाणी मॉन्सूनमध्ये सरासरीपेक्षा २० ते ५८ टक्क्यांपर्यंत पर्जन्यमानात घट झाली होती. त्यामुळे भूजलसाठ्यातही घट झाली.जिल्हानिहाय संभाव्य टंचाईग्रस्त गावांची आकडेवारी(कंसात बाधित तालुक्यांची संख्या)जिल्हा गावांची संख्यायवतमाळ (१४) ८२३अमरावती (१३) ४६९अकोला (४) १६३चंद्रपूर (१४) ४१९गडचिरोली (८) १६५गोंदिया (८) १९३जळगाव (११) २२१नागपूर (५) ९४नांदेड (१३) ३११परभणी (७) ९१वर्धा (३) २३२