शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

साडेतीन हजार गावांचा घसा कोरडा, एप्रिलपासून जाणवणार टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 06:08 IST

राज्यातील तब्बल साडेतीन हजारांहून अधिक गावांना एप्रिल महिन्यापासून पाणीटंचाई जाणवू शकते

विशाल शिर्के  पुणे : राज्यातील तब्बल साडेतीन हजारांहून अधिक गावांना एप्रिल महिन्यापासून पाणीटंचाई जाणवू शकते, असा अंदाज भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने वर्तविला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातच त्याची सर्वाधिक झळ बसणार असल्याचे संभाव्य पाणीटंचाई अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या भागाकडे प्रशासनाला अधिक लक्ष द्यावे लागणार आहे.

भूजल सर्वेक्षण विभागाच्या वतीने राज्यातील ३ हजार ९२० निरीक्षण विहिरींद्वारे निरीक्षण केले जाते. झालेले पर्जन्यमान आणि पावसाळा संपल्यानंतरची तेथील भूजल पातळी याद्वारे हा अंदाज वर्तविण्यात येतो. याशिवाय पर्जन्यमानाची तीव्रता व त्याचा कालावधी, ऊस, केळी, संत्रा, द्राक्ष अशा पिकांसाठी होणारा भूजल उपसा हीदेखील भूजल पातळी घटण्याची कारणे आहेत. हा सर्व विचार करूनच संभाव्य टंचाईग्रस्त गावे निश्चित केली जातात. सरासरीच्या वीस टक्क्यांपर्यंतची पर्जन्यतूट ही सामान्य मानली जाते. तर, एक ते २ मीटर आणि त्यापुढे पाणीपातळीत घट असल्यास या भागात पाणीटंचाई जाणवते, असे अहवालात म्हटले आहे.

राज्यात यवतमाळमधील १४ तालुक्यांतील तब्बल ८२३ गावांत संभाव्य टंचाई जाणवेल, असा अंदाज आहे. त्यात यवतमाळ तालुक्यातील १२८, वणी ११८ आणि कळंबमधील १०९ गावांचा समावेश आहे. वर्ध्यातील देवळी, समुद्रपूर आणि वर्धा तालुक्यात मिळून २३२ गावांना टंचाईची झळ बसेल. सोलापुरातील २४ गावांतील भूजल पातळी खालावली आहे. त्यात अक्कलकोटमधील १५, मोहोळ २ आणि दक्षिण सोलापूर मधील ७ गावांचा समावेश आहे. पाण्याची संभाव्य टंचाई असणाऱ्या या सर्व ठिकाणी मॉन्सूनमध्ये सरासरीपेक्षा २० ते ५८ टक्क्यांपर्यंत पर्जन्यमानात घट झाली होती. त्यामुळे भूजलसाठ्यातही घट झाली.जिल्हानिहाय संभाव्य टंचाईग्रस्त गावांची आकडेवारी(कंसात बाधित तालुक्यांची संख्या)जिल्हा गावांची संख्यायवतमाळ (१४) ८२३अमरावती (१३) ४६९अकोला (४) १६३चंद्रपूर (१४) ४१९गडचिरोली (८) १६५गोंदिया (८) १९३जळगाव (११) २२१नागपूर (५) ९४नांदेड (१३) ३११परभणी (७) ९१वर्धा (३) २३२