शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

साडेतीन हजार गावांचा घसा कोरडा, एप्रिलपासून जाणवणार टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 06:08 IST

राज्यातील तब्बल साडेतीन हजारांहून अधिक गावांना एप्रिल महिन्यापासून पाणीटंचाई जाणवू शकते

विशाल शिर्के  पुणे : राज्यातील तब्बल साडेतीन हजारांहून अधिक गावांना एप्रिल महिन्यापासून पाणीटंचाई जाणवू शकते, असा अंदाज भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने वर्तविला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातच त्याची सर्वाधिक झळ बसणार असल्याचे संभाव्य पाणीटंचाई अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या भागाकडे प्रशासनाला अधिक लक्ष द्यावे लागणार आहे.

भूजल सर्वेक्षण विभागाच्या वतीने राज्यातील ३ हजार ९२० निरीक्षण विहिरींद्वारे निरीक्षण केले जाते. झालेले पर्जन्यमान आणि पावसाळा संपल्यानंतरची तेथील भूजल पातळी याद्वारे हा अंदाज वर्तविण्यात येतो. याशिवाय पर्जन्यमानाची तीव्रता व त्याचा कालावधी, ऊस, केळी, संत्रा, द्राक्ष अशा पिकांसाठी होणारा भूजल उपसा हीदेखील भूजल पातळी घटण्याची कारणे आहेत. हा सर्व विचार करूनच संभाव्य टंचाईग्रस्त गावे निश्चित केली जातात. सरासरीच्या वीस टक्क्यांपर्यंतची पर्जन्यतूट ही सामान्य मानली जाते. तर, एक ते २ मीटर आणि त्यापुढे पाणीपातळीत घट असल्यास या भागात पाणीटंचाई जाणवते, असे अहवालात म्हटले आहे.

राज्यात यवतमाळमधील १४ तालुक्यांतील तब्बल ८२३ गावांत संभाव्य टंचाई जाणवेल, असा अंदाज आहे. त्यात यवतमाळ तालुक्यातील १२८, वणी ११८ आणि कळंबमधील १०९ गावांचा समावेश आहे. वर्ध्यातील देवळी, समुद्रपूर आणि वर्धा तालुक्यात मिळून २३२ गावांना टंचाईची झळ बसेल. सोलापुरातील २४ गावांतील भूजल पातळी खालावली आहे. त्यात अक्कलकोटमधील १५, मोहोळ २ आणि दक्षिण सोलापूर मधील ७ गावांचा समावेश आहे. पाण्याची संभाव्य टंचाई असणाऱ्या या सर्व ठिकाणी मॉन्सूनमध्ये सरासरीपेक्षा २० ते ५८ टक्क्यांपर्यंत पर्जन्यमानात घट झाली होती. त्यामुळे भूजलसाठ्यातही घट झाली.जिल्हानिहाय संभाव्य टंचाईग्रस्त गावांची आकडेवारी(कंसात बाधित तालुक्यांची संख्या)जिल्हा गावांची संख्यायवतमाळ (१४) ८२३अमरावती (१३) ४६९अकोला (४) १६३चंद्रपूर (१४) ४१९गडचिरोली (८) १६५गोंदिया (८) १९३जळगाव (११) २२१नागपूर (५) ९४नांदेड (१३) ३११परभणी (७) ९१वर्धा (३) २३२