शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

पाण्याअभावी तहानले वन्यजीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 02:38 IST

वन विभागाची निष्क्रियता : मानवी वस्तीकडे प्राण्यांची धाव

- योगेश कणसे बिजवडी : इंदापूर तालुक्यातील वनक्षेत्रात वन विभागाच्या वतीने कोट्यवधी रुपयांचा निधी वन्यप्राणी संवर्धन तसेच विविध विकासकामांसाठी मिळत आहे. मात्र, केवळ वन अधिकारी आणि कर्मचारी यांच्या निष्क्रियतेमुळे वन्यप्राण्यांसाठी पाणीपुरवठा करण्यास अपयशी ठरल्याने प्राण्यांचे हाल होत आहेत.इतर तालुक्यांच्या तुलनेत इंदापूर तालुक्यातील वनक्षेत्र आकाराने मोठे आहे. परिणामी वन्यप्राणी तसेच चिंकारा जातीच्या हरणांसह विविध पक्ष्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. काही दिवसांपासून वनक्षेत्रातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटल्याने पाणवठे कोरडेठाक पडले आहेत. परिणामी वन्यप्राण्यांचे पाण्याअभावी हाल होत आहेत. पाण्याच्या शोधार्थ वन्यप्राणी मानवी वस्तीकडे वळत आहेत. हेच पाण्यासाठी भटकणारे प्राणी एखाद्या विहिरीत किंवा शेततळ्यात पडल्याने जखमी होतात. काही वेळा तर पाण्याच्या शोधत निघालेल्या प्राण्यांना भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात आपला जीव गमवावा लागत आहे. तर, काही प्राणी महामार्गावरील वाहनाच्या धडकेत जखमी होत आहेत. वनक्षेत्रातील पाणवठे कोरडे ठाक पडून वन्य जिवांच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून लाखो रुपये खर्च करून बसविण्यात आलेल्या सौर पंपांचा पुरता बोजवारा उडालेला आहे. वन खात्याच्या जंगलात तेही प्रामुख्याने महाराष्ट्रातील वनात आढळणारे सांबर, चितळ, चिंकारा या जातीची हरणे आहेत. हरणांच्या या जाती वन विभागाच्या गलाथन कारभारामुळे आणि शिकारीमुळे नष्ट होण्याच्यामार्गावर आहेत.सापमार गरूड, मोर, अदी पक्षी, विविध प्रकारच्या औषधी वनस्पती,फळाफुलांची झाडे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.एकीकडे वनसंपदेचा होणारा ºहास बघता वन्यजीवांचा सुरक्षित अधिवास धोक्यात आला आहे. आता त्यांचे हक्काचे घरंच सुरक्षित राहीलेले नाही. तृणभक्षक प्राण्यांची व जंगलातील पाणवठ्यांची संख्या गोठवली आहे. लाखो रुपये खर्चून वन्यजीवांच्या पाण्यासाठी असलेल्या सौर पंपांचा पुरता फज्जा उडाला आहे. इंदापूर तालुक्यांत वन्य जीव संरक्षणासाठी असलेल्या योजनांचा बोजवारा उडाला आहे.टँकरचे काढले जाते बोगस बिल...वनक्षेत्रातील पाणवठे कोरडे पडले आहेत. पाण्याच्या शोधार्थ वन्यजीव मानवी वस्तीतकडे येताना दिसतात. त्यातच त्यांना अपघाताला, भटक्या कुत्र्यांना सामोरे जावे लागते. यातूनच त्यांच्या जीवितास धोका पोहोचतो. पाणवठे भरण्यासाठी नेमलेले टँकर ठेकेदार बोगस बिले काढतात, असा आरोप पर्यावणरप्रेमींनी केला आहे.तसेच, काही वन्यजीव प्राणी संघटना आपले खिसे भरण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत साटेलोटे करून देखावा करत आहेत.जर हे असेच सुरू राहिले तर वन्यजीवसृष्टी नामशेष झाल्याशिवाय राहणार नाही, अशी खंत वन्यजीव अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. तरी, वन्यजीव संरक्षक विभागाने तातडीने योग्य कारवाई केली पाहिजे.वन विभागातील सर्व पाणवठ्यांमध्ये नियमित पाणी सोडण्याचे काम सुरू आहे. ज्या पाणवठ्यांमध्ये पाणी नाही त्या ठिकाणी त्वरित पाणी सोडण्यात येईल.- राहुल काळे,वनपरिक्षेत्रअधिकारी, इंदापूर

टॅग्स :droughtदुष्काळwildlifeवन्यजीवwater scarcityपाणी टंचाई