शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

पाण्याअभावी तहानले वन्यजीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 02:38 IST

वन विभागाची निष्क्रियता : मानवी वस्तीकडे प्राण्यांची धाव

- योगेश कणसे बिजवडी : इंदापूर तालुक्यातील वनक्षेत्रात वन विभागाच्या वतीने कोट्यवधी रुपयांचा निधी वन्यप्राणी संवर्धन तसेच विविध विकासकामांसाठी मिळत आहे. मात्र, केवळ वन अधिकारी आणि कर्मचारी यांच्या निष्क्रियतेमुळे वन्यप्राण्यांसाठी पाणीपुरवठा करण्यास अपयशी ठरल्याने प्राण्यांचे हाल होत आहेत.इतर तालुक्यांच्या तुलनेत इंदापूर तालुक्यातील वनक्षेत्र आकाराने मोठे आहे. परिणामी वन्यप्राणी तसेच चिंकारा जातीच्या हरणांसह विविध पक्ष्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. काही दिवसांपासून वनक्षेत्रातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटल्याने पाणवठे कोरडेठाक पडले आहेत. परिणामी वन्यप्राण्यांचे पाण्याअभावी हाल होत आहेत. पाण्याच्या शोधार्थ वन्यप्राणी मानवी वस्तीकडे वळत आहेत. हेच पाण्यासाठी भटकणारे प्राणी एखाद्या विहिरीत किंवा शेततळ्यात पडल्याने जखमी होतात. काही वेळा तर पाण्याच्या शोधत निघालेल्या प्राण्यांना भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात आपला जीव गमवावा लागत आहे. तर, काही प्राणी महामार्गावरील वाहनाच्या धडकेत जखमी होत आहेत. वनक्षेत्रातील पाणवठे कोरडे ठाक पडून वन्य जिवांच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून लाखो रुपये खर्च करून बसविण्यात आलेल्या सौर पंपांचा पुरता बोजवारा उडालेला आहे. वन खात्याच्या जंगलात तेही प्रामुख्याने महाराष्ट्रातील वनात आढळणारे सांबर, चितळ, चिंकारा या जातीची हरणे आहेत. हरणांच्या या जाती वन विभागाच्या गलाथन कारभारामुळे आणि शिकारीमुळे नष्ट होण्याच्यामार्गावर आहेत.सापमार गरूड, मोर, अदी पक्षी, विविध प्रकारच्या औषधी वनस्पती,फळाफुलांची झाडे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.एकीकडे वनसंपदेचा होणारा ºहास बघता वन्यजीवांचा सुरक्षित अधिवास धोक्यात आला आहे. आता त्यांचे हक्काचे घरंच सुरक्षित राहीलेले नाही. तृणभक्षक प्राण्यांची व जंगलातील पाणवठ्यांची संख्या गोठवली आहे. लाखो रुपये खर्चून वन्यजीवांच्या पाण्यासाठी असलेल्या सौर पंपांचा पुरता फज्जा उडाला आहे. इंदापूर तालुक्यांत वन्य जीव संरक्षणासाठी असलेल्या योजनांचा बोजवारा उडाला आहे.टँकरचे काढले जाते बोगस बिल...वनक्षेत्रातील पाणवठे कोरडे पडले आहेत. पाण्याच्या शोधार्थ वन्यजीव मानवी वस्तीतकडे येताना दिसतात. त्यातच त्यांना अपघाताला, भटक्या कुत्र्यांना सामोरे जावे लागते. यातूनच त्यांच्या जीवितास धोका पोहोचतो. पाणवठे भरण्यासाठी नेमलेले टँकर ठेकेदार बोगस बिले काढतात, असा आरोप पर्यावणरप्रेमींनी केला आहे.तसेच, काही वन्यजीव प्राणी संघटना आपले खिसे भरण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत साटेलोटे करून देखावा करत आहेत.जर हे असेच सुरू राहिले तर वन्यजीवसृष्टी नामशेष झाल्याशिवाय राहणार नाही, अशी खंत वन्यजीव अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. तरी, वन्यजीव संरक्षक विभागाने तातडीने योग्य कारवाई केली पाहिजे.वन विभागातील सर्व पाणवठ्यांमध्ये नियमित पाणी सोडण्याचे काम सुरू आहे. ज्या पाणवठ्यांमध्ये पाणी नाही त्या ठिकाणी त्वरित पाणी सोडण्यात येईल.- राहुल काळे,वनपरिक्षेत्रअधिकारी, इंदापूर

टॅग्स :droughtदुष्काळwildlifeवन्यजीवwater scarcityपाणी टंचाई