शहरं
Join us  
Trending Stories
1
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
2
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
3
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
4
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
5
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
6
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
7
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
8
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
9
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
10
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
11
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
12
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?
13
Budh Gochar 2025: दसऱ्याला बाराही राशी सौभाग्याचे सोने लुटणार, बुध गोचर भाग्य पालटणार
14
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
15
Nashik Crime: मैत्रिणीने कॅफेमध्ये बोलावून घेतलं अन् हल्लेखोरांना केला 'मेसेज'; नाशिकमध्ये तरुणाची कॅफेमध्ये कोयत्याने हत्या
16
आता Aadhaar अपडेट करणं होणार सोपं! घरबसल्या बदलू शकता लिंक मोबाईल नंबर, केव्हापासून मिळणार सुविधा
17
नाशिक हादरलं! कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे अन् सुरक्षेचे १२ वाजवून १२ तासांत दोन खून
18
Israel attack Yemen: इस्रायलचा येमेनवर मोठा हवाई हल्ला, राजधानी सना हादरली, हुथी बंडखोरांच्या हल्ल्यानंतर पलटवार
19
Post Office च्या 'या' स्कीममध्ये ₹१०,००० च्या गुंतवणूकीवर मिळेल ₹१,१३,६५८ चं गॅरंटीड रिटर्न, पटापट चेक करा डिटेल्स
20
रोज रात्री बॉयफ्रेंडला व्हिडीओ कॉल करायची अन् नवऱ्याच्या चुगल्या सांगायची, पण झाली अशी चूक की...

भारतीयांवर ‘थर्ड क्लास’ राजकारण्यांची सत्ता - कुमार विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 02:12 IST

लायन्स क्लब पुणे आयोजित कवी संमेलन

कात्रज : ‘‘आपल्या देशातील नागरिकांची गुणवत्ता सर्वोत्कृष्ट आहे. परंतु ‘फर्स्ट क्लास’ भारतीयांवर ‘थर्ड क्लास’ राजकीय लोकांचे वर्चस्व आहे आणि त्यांनी हुकूमत गाजवणे ही देशाची खरी शोकांतिका आहे. त्यामुळे लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर बिनधास्तपणे प्रश्न विचारायला शिका,’’ असे परखड मत प्रख्यात कवी आणि राजकीय नेते डॉ. कुमार विश्वास यांनी व्यक्त केले.

लायन्स क्लब आॅफ पुणे गणेशखिंड ट्रस्टच्या वतीने ‘एक श्याम कुमार विश्वास के नाम’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन गणेश कला क्रीडा मंदिर येथे केले होते. सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून पुणे शहरात महिलांसाठी १० ई टॉयलेट आणि पुणे महापालिकेच्या शाळा व विनाअनुदानित अशा ३०० शाळांमध्ये स्मार्ट बोर्ड बसवण्याचा संकल्प हाती घेण्यात आला आहे. त्यापार्श्वभूमीवर या हास्य कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. संमेलनात हास्य कवी संपत सरल, भुवन मोहिनी, रमेश मुस्कान, दिलीप शर्मा आणि रोहित शर्मा यांच्या बहारदार कवितांनी धमाल उडवून दिली. आजच्या सामाजिक परिस्थितीवर, राजकीय स्थित्यंतरांवर मार्मिक भाष्य करत आणि हवे तिथे चिमटे काढत त्यांनी हास्याची मैफल रंगवली. तब्बल चार तास चाललेल्या हास्यमैफलीत सारे मनापासून रंगून गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून राहुल गांधींपर्यंत आणि जीएसटीपासून ते पेट्रोल भाववाढीपर्यंतच्या ताज्या संदर्भांना कवितेत गुंफत या हास्य कवींनी हसत हसत मार्मिक सामाजिक भाष्य केले.

क्लब अध्यक्ष विजय भंडारी यांनी या उपक्रमामागील सामाजिक दृष्टिकोन स्पष्ट केला. सामाजिक बांधिलकीची विचारधारा यामागे असल्याचे त्यांनी सांगितले. या निमित्ताने शाळांसाठी ‘स्मार्टबोर्ड’ देणाऱ्या देणगीदारांचा विशेष सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. देशाविषयी आत्मभान जागृत करणाºया डॉ. विश्वास यांच्या अखेरच्या कवितांनी कार्यक्रमात कळसाध्याय गाठला आणि ‘होठोंपे गंगा है.. दिल मे तिरंगा है..’ असा उद्घोष करीत कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय भंडारी, राजीव अग्रवाल, द्वारका जालन, शाम खंडेलावल यांनी प्रयत्न केले.भाषा टिकली तरच संस्कृती टिकेलसंपत्ती, प्रगती या सर्वांपेक्षा सर्वांत महत्त्वाची आहे ती भाषा! त्यामुळे भाषा संवर्धनासाठी आणि जपणुकीसाठी असे कार्यक्रम होत राहिले पाहिजेत. आपण एकमेकांशी मातृभाषेतच बोलायचा आग्रह धरला पाहिजे. भाषेचे बीज जिवंत राहिले तरच संस्कृतीचा वटवृक्ष जिवंत राहील हे तथ्य लक्षात घ्यायला हवे, असेही मत कुमार विश्वास यांनी व्यक्त केले.डॉ. विश्वास कवितेतून व्यक्त होत म्हणाले, ‘‘दूध महँगा, खून सस्ता है इस देश मे... अब वजीरो, अफसरो, पागलोंको छोड के कौन हसता है इस देश मे.. आपण विकासाच्या गप्पा मारतो मात्र गेल्या ७० वर्षांत आपण चांगला देश साकारू शकलो नाही, ही वस्तुस्थिती आहे.देश अग्रक्रमावर हवा, त्याखाली विचार, त्याखाली पक्ष व सर्वात शेवटी व्यक्ती. मात्र आपल्याकडे नेमके उलटे चित्र आहे. लायन्स क्लब आॅफ गणेशखिंड ट्रस्टच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करून ते म्हणाले, खरे तर हे शासनाचे काम आहे.४सुरक्षा, वीज, पाणी, शिक्षण आणि आरोग्य चांगले मिळावे म्हणून आपण कर देतो. मात्र, त्यात शासन अपयशी ठरते म्हणून ही धुरा आपल्याला खांद्यावर घ्यावी लागते.

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारण