शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
3
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
4
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांचा महायुतीला मोठा धक्का; एका क्लिकवर वाचा निकाल
5
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
6
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
7
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
8
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
10
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
11
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
12
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
13
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
14
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
15
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
16
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
17
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
18
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
19
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
20
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
Daily Top 2Weekly Top 5

या नेत्यांना आवरा हो.....: दशक्रिया विधीत ‘श्रद्धांजली’च्या नावाखाली ‘भाषणांचा थाट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2019 01:05 IST

दशक्रियेच्या विधीसाठी आलेल्या पुढारी, नेते यांच्या भाषणांमुळे उपस्थित असलेल्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. वेळेचे भान आणि वेळेची मर्यादा ओळखण्याची गरज

खोडद : आपल्या संस्कृतीमध्ये दशक्रिया विधी हा तसा संस्काररूपी पुण्यकर्माचा विधी मानला जातो. मात्र, अलीकडच्या काळात अनेक ठिकाणी दशक्रिया विधीत प्रवचन आणि काकस्पर्श झाल्यानंतर पाहायला मिळते ती श्रद्धांजलीच्या नावाखाली भाषणाची मांदियाळी..! खरं तरं मयत व्यक्तीच्या मागे त्याने केलेल्या कार्याचा उल्लेख होणे, समाजात त्यांच्या कार्याचा आदर्श निर्माण व्हावा, त्याच्या कुटुंबाबद्दल माहिती समाजाला मिळावी, म्हणून त्या व्यक्तीविषयी आणि त्याच्या कुटुंबाविषयी थोडक्यात माहिती देणे अपेक्षित असते. परंतु, काही मंडळींना यावेळीही परिस्थितीचे भान राहत नाही आणि त्यांची ही भाषणरूपी श्रद्धांजली या दु:खद प्रसंगात हास्यास्पद विषय ठरत आहे. सध्या हे चित्र ग्रामीण भागात सर्रासपणे पाहायला मिळत आहे.

दशक्रियेच्या विधीसाठी आलेल्या पुढारी, नेते यांच्या भाषणांमुळे उपस्थित असलेल्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. पिंडाला काकस्पर्श झाल्यानंतर प्रवचनकार महाराज देखील आपलं प्रवचन आटोपतं घेतात. पण श्रद्धांजलीच्या नावाखाली भाषण लांबलचक करणाऱ्यांची रीघ कमी होत नाही. एकंदरीत ग्रामीण भागात श्रद्धांजलीऐवजी भाषणांची मांदियाळी पाहावयास मिळत आहे. कारण, श्रद्धांजली म्हणजे नेमकी किती शब्दांत मांडायची, हेच अनेकांच्या लक्षात येताना दिसत नाही. एकंदरीत दशक्रियेत श्रद्धांजली व्यक्त करणे म्हणजे हा प्रतिष्ठेचा भाग मानला जाऊ लागला आहे. मात्र, दशक्रियेसाठी लांबवरून आलेले नागरिक व शोकाकुल पाहुण्यांना मात्र ही भाषणं संपायची वाट पाहात ताटकळत बसावे लागत आहे. प्रवचन संपल्यानंतर स्थानिक कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, राजकीय पुढारी व नेते अशा प्रकारे भली मोठी यादीच तयार केली जाते. याचवेळी अन्य काही पुढाºयांचे व विविध संस्थांचे शोकसंदेश यावेळी वाचून दाखवले जातात. खरं तर मृत व्यक्तीविषयी अवघ्या २ मिनिटांत बोलून श्रद्धांजली अर्पण करावी, अशी अपेक्षा असते.या सगळ्या गोंधळात काकस्पर्श झाला आहे, याचा विसर भाषणं करणाºयांना पडतो आणि कार्यक्रम आटोपता घेतला पाहिजे याचे भानदेखील ते हरपून जातात. एवढं सगळं होऊनही जर का एखाद्याला बोलण्याची संधी नाही मिळाली तर पुन्हा त्याची नाराजी, एवढ्यांची भाषणं झालीच होती मग एका भाषणाने काय फरक पडला असता? असा सूर त्या संबंधित पुढाºयांच्या कार्यकर्त्यांकडून निघतो.वेळेचं भान किंवा वेळेची मर्यादा ओळखून गावच्यावतीने स्थानिक कोणा एकाला श्रद्धांजली वाहण्याची संधी द्यावी. बाहेरून आलेल्या पाहुण्यांच्या वतीने एकाला, सामाजिक क्षेत्रातील एकाला आणि राजकीय क्षेत्रातील एकाला श्रद्धांजली वाहण्याची संधी द्यावी म्हणजे हा कार्यक्रम वेळेत होईल, असे अयशस्वी सल्ले खाली बसलेले नागरिक आपापसांत एकमेकांना देताना पाहायलामिळत आहे.श्रद्धांजली म्हणजे भाषण करण्यासाठी मिळालेली संधीच आहे की काय असाच काहींचा गैरसमज झालेला पाहावयास मिळतो आणि लांबलचक व रटाळ भाषणं केली जातात. दशक्रियेच्या निमित्ताने आलेल्या सर्व उपस्थित नागरिकांमध्ये आरोग्यविषयक तसेच विविध आजारांविषयी प्रबोधन व्हावे, म्हणून एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन असावे, पर्यावरण, निसर्ग, प्लॅस्टिकबंदी, व्यसनमुक्ती, आदी विषयांवर प्रबोधन होऊन जनजागृती करता येईल, अशा व्याख्यानांचे आयोजन या दशक्रियेच्या विधीत करता येईल. समाजप्रबोधन होईल आणि त्यातून समाजाचं काही तरी हित साधले जाईल, असे उपक्रम राबवावेत अशी चर्चा सध्या सूर धरूलागली आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारण