शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
2
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
3
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
4
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
5
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
6
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
7
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
8
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
9
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
10
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
11
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
12
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
13
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
14
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
15
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
16
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
17
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
18
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
19
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
20
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार

...म्हणून शेतकरी महिलेनं कृषिमंत्र्यांना पाठवली 4 रुपयांची मनीऑर्डर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2018 17:28 IST

शिरूर तालुक्यातील टाकळीहाजी येथील महिला शेतकरी मनीषा संजय बारहाते यांना 32 गोण्या कांदा पाठवल्यानंतर अवघे चार रूपये पट्टी आली. त्यामुळे संतप्त झालेल्या मनीषा यांनी संबधीत चार रूपयांची मनीऑर्डर व कांद्याची माळ केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांना केली आहे.

पुणे : शिरूर तालुक्यातील टाकळीहाजी येथील महिला शेतकरी मनीषा संजय बारहाते यांना 32 गोण्या कांदा पाठवल्यानंतर अवघे चार रूपये पट्टी आली. त्यामुळे संतप्त झालेल्या मनीषा यांनी संबधीत चार रूपयांची मनीऑर्डर व कांद्याची माळ केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांना केली आहे. तसेच त्यांनी कुषी मंत्र्यांच्या बायकोला बांगड्यांचा आहेर कुरीयरने पाठवला असून या माध्यमातून त्यांनी केंद सरकारने घेतलेल्या कृषी धोरणाचा निषेध केला आहे. मनिषा यांच्या या कृतीचे नगर व पुणे जिल्ह्यातील शेतकरी कौतुक करीत असून यापुढे केंद्र सरकारने कृषी धोरणाची शेतकऱ्यांच्या हितासाठी अंमलबजावणी न केल्यास अशाप्रकारे केंद्र सरकारचा निषेध करण्याची मोहिम हाती घेण्याचा निर्णय पारनेर व शिरूर तालुक्यातील महिला शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

    मनिषा बारहाते यांची शेती टाकळी हाजी ता शिरूर येथील जगप्रसिद्ध रांजणखळगे परिसराजवळ आहे. शेतीबरोबरच दूधउत्पादन करीत ते संसार करतात. शेती थोडीच असल्याने जनावरांसाठी हिरवा चारा, कांद्याचे पिक, गहू, बाजरी तसेच त्यांची डाळींबाची बाग आहे. मनिषा यांनी चार दिवसांपुर्वी 32 गोण्या कांदा पारनेर येथील एका व्यापाऱ्याला दिला. साधारण एक ते दोन रूपये किलोला भाव त्यांना मिळाला.  2362 रूपये पट्टी होती मात्र आडत, मोटार भाडे, उचल, हमाली, लेव्ही, तोलाई, वराई, भराई, बारदाणा व इतर खर्च वजा जाता 32 गोण्यांचे अवघे चार रूपये हातात त्यांना मिळाले आहेत. याच 32 गोण्यांच्या उत्पादनासाठी मनिषा यांनी चार हजार रूपये खर्च केला हाेता. मात्र अवघे चार रूपये हातात मिळाल्याने त्यांच्या संतापात भर पडली. केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी त्यांनी लगेच शिरुर येथे जाउन केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांना चार रूपयांची मनीऑर्डर केली असून बांगड्यांचा बाॅक्स कुरीयरच्या माध्यमातून केंद्रीय कृषिमंत्री यांच्या पत्नीला पाठवून बांगड्या आहेर करीत निषेध व्यक्त केला आहे.

      मनिषा बारहाते म्हणाल्या की गेली चार वर्षात या सरकारने शेतीमालाच्या भावाचे नियोजन न करता शेतकरी कशाप्रकारे अडचणीत येईल यासाठी धोरणे राबविली आहेत. आज मितीला प्रत्येक कमी शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांवर बॅंका, पतसंस्था व सोसायट्या तसेच हातऊसणे पैसे असे चार ते पाच लाखाचे कर्ज झाले आहे. कर्जाचे व्याजसुद्धा शेतकरी भरू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. शेतीमालाला गेली चार वर्षात भाव नसल्याने प्रत्तेक वर्षी कर्जाचा बोजा वाढत चालला आहे. कर्ज माफीच्या नावाखाली सरकारने लोकांना फसवले आहे. एकमेव कांदा पिक असे आहे की त्यातूनच शेतकरी कर्जाचे व्याज भरेल अशी अपेक्षा होती, मात्र त्यालाही भाव न मिळाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. शेतकऱ्यांना घरच्यांची माेठी साथ असते. म्हणून या शेतीत महिलांचे श्रम फायदेशीर ठरतात. शेतीला पुरक व्यवसाय म्हणून दूधउत्पादन आहे मात्र दूधालाही भाव नाही मग जगायचे तरी कसे यासाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे सर्व कर्ज माफ करावे ही आमची प्रामुख्याने मागणी आहे. 

टॅग्स :agricultureशेतीonionकांदाFarmerशेतकरीWomenमहिला