शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

...म्हणून शेतकरी महिलेनं कृषिमंत्र्यांना पाठवली 4 रुपयांची मनीऑर्डर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2018 17:28 IST

शिरूर तालुक्यातील टाकळीहाजी येथील महिला शेतकरी मनीषा संजय बारहाते यांना 32 गोण्या कांदा पाठवल्यानंतर अवघे चार रूपये पट्टी आली. त्यामुळे संतप्त झालेल्या मनीषा यांनी संबधीत चार रूपयांची मनीऑर्डर व कांद्याची माळ केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांना केली आहे.

पुणे : शिरूर तालुक्यातील टाकळीहाजी येथील महिला शेतकरी मनीषा संजय बारहाते यांना 32 गोण्या कांदा पाठवल्यानंतर अवघे चार रूपये पट्टी आली. त्यामुळे संतप्त झालेल्या मनीषा यांनी संबधीत चार रूपयांची मनीऑर्डर व कांद्याची माळ केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांना केली आहे. तसेच त्यांनी कुषी मंत्र्यांच्या बायकोला बांगड्यांचा आहेर कुरीयरने पाठवला असून या माध्यमातून त्यांनी केंद सरकारने घेतलेल्या कृषी धोरणाचा निषेध केला आहे. मनिषा यांच्या या कृतीचे नगर व पुणे जिल्ह्यातील शेतकरी कौतुक करीत असून यापुढे केंद्र सरकारने कृषी धोरणाची शेतकऱ्यांच्या हितासाठी अंमलबजावणी न केल्यास अशाप्रकारे केंद्र सरकारचा निषेध करण्याची मोहिम हाती घेण्याचा निर्णय पारनेर व शिरूर तालुक्यातील महिला शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

    मनिषा बारहाते यांची शेती टाकळी हाजी ता शिरूर येथील जगप्रसिद्ध रांजणखळगे परिसराजवळ आहे. शेतीबरोबरच दूधउत्पादन करीत ते संसार करतात. शेती थोडीच असल्याने जनावरांसाठी हिरवा चारा, कांद्याचे पिक, गहू, बाजरी तसेच त्यांची डाळींबाची बाग आहे. मनिषा यांनी चार दिवसांपुर्वी 32 गोण्या कांदा पारनेर येथील एका व्यापाऱ्याला दिला. साधारण एक ते दोन रूपये किलोला भाव त्यांना मिळाला.  2362 रूपये पट्टी होती मात्र आडत, मोटार भाडे, उचल, हमाली, लेव्ही, तोलाई, वराई, भराई, बारदाणा व इतर खर्च वजा जाता 32 गोण्यांचे अवघे चार रूपये हातात त्यांना मिळाले आहेत. याच 32 गोण्यांच्या उत्पादनासाठी मनिषा यांनी चार हजार रूपये खर्च केला हाेता. मात्र अवघे चार रूपये हातात मिळाल्याने त्यांच्या संतापात भर पडली. केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी त्यांनी लगेच शिरुर येथे जाउन केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांना चार रूपयांची मनीऑर्डर केली असून बांगड्यांचा बाॅक्स कुरीयरच्या माध्यमातून केंद्रीय कृषिमंत्री यांच्या पत्नीला पाठवून बांगड्या आहेर करीत निषेध व्यक्त केला आहे.

      मनिषा बारहाते म्हणाल्या की गेली चार वर्षात या सरकारने शेतीमालाच्या भावाचे नियोजन न करता शेतकरी कशाप्रकारे अडचणीत येईल यासाठी धोरणे राबविली आहेत. आज मितीला प्रत्येक कमी शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांवर बॅंका, पतसंस्था व सोसायट्या तसेच हातऊसणे पैसे असे चार ते पाच लाखाचे कर्ज झाले आहे. कर्जाचे व्याजसुद्धा शेतकरी भरू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. शेतीमालाला गेली चार वर्षात भाव नसल्याने प्रत्तेक वर्षी कर्जाचा बोजा वाढत चालला आहे. कर्ज माफीच्या नावाखाली सरकारने लोकांना फसवले आहे. एकमेव कांदा पिक असे आहे की त्यातूनच शेतकरी कर्जाचे व्याज भरेल अशी अपेक्षा होती, मात्र त्यालाही भाव न मिळाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. शेतकऱ्यांना घरच्यांची माेठी साथ असते. म्हणून या शेतीत महिलांचे श्रम फायदेशीर ठरतात. शेतीला पुरक व्यवसाय म्हणून दूधउत्पादन आहे मात्र दूधालाही भाव नाही मग जगायचे तरी कसे यासाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे सर्व कर्ज माफ करावे ही आमची प्रामुख्याने मागणी आहे. 

टॅग्स :agricultureशेतीonionकांदाFarmerशेतकरीWomenमहिला