शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
6
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
7
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
8
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
9
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
10
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
11
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
12
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
13
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
14
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
15
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
16
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
17
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

...त्यामुळे संरक्षण खात्याच्या गुप्ततेविषी पोरकट भाष्य : शिवाजीराव आढळराव-पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 17:32 IST

घाणेरडे, खालच्या पातळीवरचे आरोप तुम्ही करू लागलात असा सणसणीत टोला आढळरावांनी लगावला....

मंचर (पुणे) : पराभव दिसू लागल्याने खासदार सैरभैर झाले आहेत. त्यामुळे माझ्यावर खोटे आरोप करण्यापायी देशाच्या संरक्षण खात्याच्या गुप्ततेविषयी ते पोरकट भाष्य करीत असल्याचा पलटवार महायुतीचे शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी केला आहे.

आंबेगाव तालुक्यातील गावभेटीदरम्यान ते बोलत होते. आढळराव-पाटील म्हणाले, संसदेत मी ३७ प्रश्न विचारले; पण त्यात माझ्या कंपनीच्या व्यवसायासंबंधीचा विचारलेला एकही प्रश्न होता असे त्यांनी सिद्ध करून दाखवावे. त्या आरोपाचा पुरावा त्यांनी दिला तर मी निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर जातो, नाहीतर कोल्हेंनी निवडणूक रिंगणातून बाहेर व्हावे, या शब्दांत त्यांनी कोल्हेंना सुनावले.

साडेचार वर्षांत यांना कांदा प्रश्न कधीच दिसला नाही, निवडणूक आली की तीन महिन्यांपासून कांद्याविषयी ओरड त्यांनी सुरू केली; पण नरेंद्र मोदींनी एक लाख वीस हजार टन कांद्यावरची निर्यातबंदी उठवली. आपल्या कामातून सरकारने कोल्हेंच्या पोपटपंचीला आरसा दाखवल्याने त्यांचा कांद्याचा मुद्दा देखील सरकारने हिरावून घेतला आहे. कांद्याविषयी त्यांनी प्रश्न उपस्थित केले; पण त्यावर उत्तर काढता आले नाही. त्यामुळे घाणेरडे, खालच्या पातळीवरचे आरोप तुम्ही करू लागलात असा सणसणीत टोला आढळरावांनी लगावला.

शेतकऱ्यांचे प्रश्न संसदेत मांडण्याचाच विषय असेल तर त्यांनी पाच वर्षांत ४१ प्रश्न विचारले, तर मी ८२ प्रश्न विचारले होते. मी तुमच्यापेक्षा दुप्पट संख्येने प्रश्न उपस्थित केले. त्याचा तुम्हाला त्रास होतोय, यातूनच पराभव दिसू लागल्याने माझ्या कंपनीबद्दलच बोलणार असाल तर माझा प्रामाणिकपणा जनतेला माहिती आहे. माझी कंपनी सॉफ्टवेअरची नाही, ती हार्डवेआरची आहे. मग मी सॉफ्टेवरचे प्रश्न कशाला विचारेल? याचे भान कोल्हेंना राहिलेले नाही.

कांदा प्रश्नाची दखल माझ्या पाठपुराव्यामुळे झाली आहे. तुम्ही फक्त तीन महिन्यांपासून कांदा, कांदा ओरडत होतात. निर्यातबंदी उठविण्याचा आग्रह मी डिसेंबरपासून धरला होता. त्यासाठी पीयूष गोयल यांच्यासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला. माझ्या या मागणीला प्रतिसाद देऊन सरकारने बंदी उठवली. सुरुवातीला १०हजार, नंतर १० हजार आणि त्यानंतर एक लाख असे एक लाख वीस हजार टन कांद्यावरची निर्यातबंदी उठवली. ओरड करणाऱ्यांनी आणि या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी काय केले, हे सांगू न शकणाऱ्यांनी खोटं बोलणं बंद करावं.

टॅग्स :Shivajirao Adhalraoशिवाजीराव आढळरावPuneपुणेDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेshirur-pcशिरूर