शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

...त्यामुळे संरक्षण खात्याच्या गुप्ततेविषी पोरकट भाष्य : शिवाजीराव आढळराव-पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 17:32 IST

घाणेरडे, खालच्या पातळीवरचे आरोप तुम्ही करू लागलात असा सणसणीत टोला आढळरावांनी लगावला....

मंचर (पुणे) : पराभव दिसू लागल्याने खासदार सैरभैर झाले आहेत. त्यामुळे माझ्यावर खोटे आरोप करण्यापायी देशाच्या संरक्षण खात्याच्या गुप्ततेविषयी ते पोरकट भाष्य करीत असल्याचा पलटवार महायुतीचे शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी केला आहे.

आंबेगाव तालुक्यातील गावभेटीदरम्यान ते बोलत होते. आढळराव-पाटील म्हणाले, संसदेत मी ३७ प्रश्न विचारले; पण त्यात माझ्या कंपनीच्या व्यवसायासंबंधीचा विचारलेला एकही प्रश्न होता असे त्यांनी सिद्ध करून दाखवावे. त्या आरोपाचा पुरावा त्यांनी दिला तर मी निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर जातो, नाहीतर कोल्हेंनी निवडणूक रिंगणातून बाहेर व्हावे, या शब्दांत त्यांनी कोल्हेंना सुनावले.

साडेचार वर्षांत यांना कांदा प्रश्न कधीच दिसला नाही, निवडणूक आली की तीन महिन्यांपासून कांद्याविषयी ओरड त्यांनी सुरू केली; पण नरेंद्र मोदींनी एक लाख वीस हजार टन कांद्यावरची निर्यातबंदी उठवली. आपल्या कामातून सरकारने कोल्हेंच्या पोपटपंचीला आरसा दाखवल्याने त्यांचा कांद्याचा मुद्दा देखील सरकारने हिरावून घेतला आहे. कांद्याविषयी त्यांनी प्रश्न उपस्थित केले; पण त्यावर उत्तर काढता आले नाही. त्यामुळे घाणेरडे, खालच्या पातळीवरचे आरोप तुम्ही करू लागलात असा सणसणीत टोला आढळरावांनी लगावला.

शेतकऱ्यांचे प्रश्न संसदेत मांडण्याचाच विषय असेल तर त्यांनी पाच वर्षांत ४१ प्रश्न विचारले, तर मी ८२ प्रश्न विचारले होते. मी तुमच्यापेक्षा दुप्पट संख्येने प्रश्न उपस्थित केले. त्याचा तुम्हाला त्रास होतोय, यातूनच पराभव दिसू लागल्याने माझ्या कंपनीबद्दलच बोलणार असाल तर माझा प्रामाणिकपणा जनतेला माहिती आहे. माझी कंपनी सॉफ्टवेअरची नाही, ती हार्डवेआरची आहे. मग मी सॉफ्टेवरचे प्रश्न कशाला विचारेल? याचे भान कोल्हेंना राहिलेले नाही.

कांदा प्रश्नाची दखल माझ्या पाठपुराव्यामुळे झाली आहे. तुम्ही फक्त तीन महिन्यांपासून कांदा, कांदा ओरडत होतात. निर्यातबंदी उठविण्याचा आग्रह मी डिसेंबरपासून धरला होता. त्यासाठी पीयूष गोयल यांच्यासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला. माझ्या या मागणीला प्रतिसाद देऊन सरकारने बंदी उठवली. सुरुवातीला १०हजार, नंतर १० हजार आणि त्यानंतर एक लाख असे एक लाख वीस हजार टन कांद्यावरची निर्यातबंदी उठवली. ओरड करणाऱ्यांनी आणि या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी काय केले, हे सांगू न शकणाऱ्यांनी खोटं बोलणं बंद करावं.

टॅग्स :Shivajirao Adhalraoशिवाजीराव आढळरावPuneपुणेDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेshirur-pcशिरूर