शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
4
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
5
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
6
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
7
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
8
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
9
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
10
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
11
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
12
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
13
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
14
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
15
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
16
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
17
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
18
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
19
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
20
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त

...त्यामुळे संरक्षण खात्याच्या गुप्ततेविषी पोरकट भाष्य : शिवाजीराव आढळराव-पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 17:32 IST

घाणेरडे, खालच्या पातळीवरचे आरोप तुम्ही करू लागलात असा सणसणीत टोला आढळरावांनी लगावला....

मंचर (पुणे) : पराभव दिसू लागल्याने खासदार सैरभैर झाले आहेत. त्यामुळे माझ्यावर खोटे आरोप करण्यापायी देशाच्या संरक्षण खात्याच्या गुप्ततेविषयी ते पोरकट भाष्य करीत असल्याचा पलटवार महायुतीचे शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी केला आहे.

आंबेगाव तालुक्यातील गावभेटीदरम्यान ते बोलत होते. आढळराव-पाटील म्हणाले, संसदेत मी ३७ प्रश्न विचारले; पण त्यात माझ्या कंपनीच्या व्यवसायासंबंधीचा विचारलेला एकही प्रश्न होता असे त्यांनी सिद्ध करून दाखवावे. त्या आरोपाचा पुरावा त्यांनी दिला तर मी निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर जातो, नाहीतर कोल्हेंनी निवडणूक रिंगणातून बाहेर व्हावे, या शब्दांत त्यांनी कोल्हेंना सुनावले.

साडेचार वर्षांत यांना कांदा प्रश्न कधीच दिसला नाही, निवडणूक आली की तीन महिन्यांपासून कांद्याविषयी ओरड त्यांनी सुरू केली; पण नरेंद्र मोदींनी एक लाख वीस हजार टन कांद्यावरची निर्यातबंदी उठवली. आपल्या कामातून सरकारने कोल्हेंच्या पोपटपंचीला आरसा दाखवल्याने त्यांचा कांद्याचा मुद्दा देखील सरकारने हिरावून घेतला आहे. कांद्याविषयी त्यांनी प्रश्न उपस्थित केले; पण त्यावर उत्तर काढता आले नाही. त्यामुळे घाणेरडे, खालच्या पातळीवरचे आरोप तुम्ही करू लागलात असा सणसणीत टोला आढळरावांनी लगावला.

शेतकऱ्यांचे प्रश्न संसदेत मांडण्याचाच विषय असेल तर त्यांनी पाच वर्षांत ४१ प्रश्न विचारले, तर मी ८२ प्रश्न विचारले होते. मी तुमच्यापेक्षा दुप्पट संख्येने प्रश्न उपस्थित केले. त्याचा तुम्हाला त्रास होतोय, यातूनच पराभव दिसू लागल्याने माझ्या कंपनीबद्दलच बोलणार असाल तर माझा प्रामाणिकपणा जनतेला माहिती आहे. माझी कंपनी सॉफ्टवेअरची नाही, ती हार्डवेआरची आहे. मग मी सॉफ्टेवरचे प्रश्न कशाला विचारेल? याचे भान कोल्हेंना राहिलेले नाही.

कांदा प्रश्नाची दखल माझ्या पाठपुराव्यामुळे झाली आहे. तुम्ही फक्त तीन महिन्यांपासून कांदा, कांदा ओरडत होतात. निर्यातबंदी उठविण्याचा आग्रह मी डिसेंबरपासून धरला होता. त्यासाठी पीयूष गोयल यांच्यासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला. माझ्या या मागणीला प्रतिसाद देऊन सरकारने बंदी उठवली. सुरुवातीला १०हजार, नंतर १० हजार आणि त्यानंतर एक लाख असे एक लाख वीस हजार टन कांद्यावरची निर्यातबंदी उठवली. ओरड करणाऱ्यांनी आणि या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी काय केले, हे सांगू न शकणाऱ्यांनी खोटं बोलणं बंद करावं.

टॅग्स :Shivajirao Adhalraoशिवाजीराव आढळरावPuneपुणेDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेshirur-pcशिरूर