शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

गैरप्रकार थांबून पारदर्शकता वाढणार ; पुणे बार असोसिएशन निवडणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2019 16:16 IST

मतदार वकिलांची नोंदणी करण्यापासून निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत पुणे बार असोसिएशनच्या (पीबीए) वार्षिक निवडणुकीत चालणा-या गैरप्रकारांना आता काहीसा लगाम लागणार असल्याची शक्यता वन बार वन वोटच्या अंलमबजावणीमुळे निर्माण झाली आहे.

सनील गाडेकर पुणे : मतदार वकिलांची नोंदणी करण्यापासून निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत  पुणे बार असोसिएशनच्या (पीबीए) वार्षिक निवडणुकीत चालणा-या गैरप्रकारांना आता काहीसा लगाम लागणार असल्याची शक्यता वन बार वन वोटच्या अंलमबजावणीमुळे निर्माण झाली आहे. त्याचे सकारात्मक परिमाणही दिसू लागले असून दुबार आणि बोगस नोंदणीला आळ बसल्याचे नुकत्याच झालेल्या नोंदणी प्रक्रियेतून स्पष्ट झाले आहे. 

एका बारचा सदस्य असताना दुस-या बारच्या निवडणुकीत मतदान करता येणार नाही, असे निर्देष सर्वोच्च न्यायालयाने बार कॉन्सील ऑफ  इंडियाला दिले आहेत. त्यामुळे पीबीएच्या निवणुकीसाठी शहरातील ८ संघटनांचे आणि १३ तालुक्यांतील बारचे होणारे मतदान आता थांबणार असून केवळ पीबीएच्या सदस्यांना मतदान करण्याचा हक्क राहणार आहे. तसेच वकिलांना देखील जाहीर करावे लागणार आहे की, ते कोणत्या संघटनेचे सदस्य आहेत. त्यामुळे इतर कोणत्याही बारचा सदस्य असताना देखील पीबीएसाठी मतदान करण्याल्या  आणि त्या सर्वात होणा-या गैरप्रकारांना आता आळा बसणार आहे.   

पीबीएच्या निवडणुकीसाठी यापुर्वी इंदापूर, भोर, बारामती, जुन्नर, शिरुर, घोडेगाव, राजगुरुनगर, आंबेगाव, सासवड, भोर, वडगाव, मावळ, मुळशी अशा १३ तालुक्यांमधील बार, पिंपरी आणि शहरातील दी पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन, दी फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन, पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, कंज्युमर अ‍ॅडव्होकेट्स असोसिएशन, दी को-ऑपरेटिव्ह लॉ प्रॅक्टिशनर असोसिएशन, लेबर लॉ प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, इंडस्ट्रीअल लेबर लॉ प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, एनजीटी बार असोसिएशन अशा ८ बारचे वकील मतदान करतात. गेल्या वर्षी जिल्ह्यातील सुमारे १० हजार वकिलांनी नोंदणी केली होती व त्यातील ५ हजार ४०० सभासदांनी मतदान केले होते. मात्र यावर्षी केवळ ४ हजार ४०० वकिलांची नोंदणी झाली आहे. मतदार संख्या कमी झाल्याने बोगस आणि दुबार मतदार त्वरीत लक्षात येण्यास मदत होईल. 

संघटनेच्या कामकाजाचा हिशोब न ठेवणे, खर्चाच्या पावत्या न ठेवणे, सभेचा वृत्तात न ठेवणे, टेंडरशिवाय व्यवसाय चालविण्यास देणे, कँटीन व इतर व्यवसायातून मिळणा-या उत्पन्नाची नोंदी नसणे असा ठिसाळ कारभार असल्याने पीबीएला  महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त कायद्याच्या कलम ४१ डी नुसार कारवाई करण्याचे आदेश सह आयुक्त दिलीप देशमुख यांनी नुकतेच दिले आहेत. पीबीएने गेल्या ३० वर्षांपासून आॅडीटच केले नसल्याची माहिती समोर आली आहे. संघटनेच्या या कामकाजाबाबत अ‍ॅड. सुमीता दौंडकर यांनी ८ डिसेंबर २०१७ मध्ये तक्रार केली होती.  

त्या वकिलांवर होणार कारवाई : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आता प्रत्येक वकिलांने केवळ एकाच बारचा सदस्य असणे अपेक्षीत आहे. मात्र एखाद्या वकिलाने २ बारचे सदस्यत्व घेतल्याचे लक्षात आले तर बार कॉन्सील आॅफ इंडियाला संबंधितावर कारवाई करण्याचे अधिकार आहेत. 

योग्यतेनुसार निवडणुका होण्यासाठी या नियमाची गरज होती. त्यामुळे सध्या अध्यक्षांचे मी अभिनंदन करतो. देशात अनेक बारच्या निवडणुकांमध्ये गोंधळ होत असल्याचे पुढे आले आहे. कायद्याला धरून आणि व्यवहारीक असलेला हा निमय निवडणुकांमधील गोंधळ कमी करेल. अ‍ॅड. एस. के. जैन, ज्येष्ठ विधिज्ञ

वकिलांची नोंदणी, मतदार यादी आणि प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी उमेदवार किंवा त्यांच्या समर्थकांमध्ये किरळोळ वाद झाल्याचे प्रकार यापुर्वी घडले आहेत. आता वकिलांची संख्या कमी झाल्याने पारदर्शकता देखील वाढेल. निवडणुकीत सर्व नियमांची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. अ‍ॅड. बिपीन पाटोळे, मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी

या निर्देशामुळे पीबीएच्या निवडणुकीला शिस्त लागणार आहे. आदर्श निवडणूक होण्यासाठी हे चांगले पाऊल आहे. तसेही सर्व बारचे कामकाज स्वतंत्रपणे चालते. त्यामुळे आता त्या-त्या संघटनेतील वकिलांचे प्रश्न मिटविण्यासाठी वाव मिळणार आहे. अ‍ॅड. मिलिंद पवार, माजी अध्यक्ष, पीबीए 

टॅग्स :Courtन्यायालयadvocateवकिलElectionनिवडणूक