शहरं
Join us  
Trending Stories
1
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
2
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
3
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
4
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
5
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...
6
AUS vs IND 3rd T20I : संजू संघातून ‘आउट’; टॉसवेळी सूर्याचं मिचेल मार्शसमोर भन्नाट सेलिब्रेशन!
7
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
8
'ट्रॅजेडी क्वीन' मीना कुमारीवर बायोपिक येणार, क्रिती सेननचा पत्ता कट; 'ही' अभिनेत्री फायनल?
9
भाग्यवान! ११ वर्षांच्या मुलाचं अचानक 'असं' फळफळलं नशीब, रातोरात झाला करोडपती
10
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
11
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
12
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी
13
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: महादेव पूजनासह ‘या’ ७ गोष्टी आवर्जून करा; काही कमी पडणार नाही!
14
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
15
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
16
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
17
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
18
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
19
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
20
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video

कश्मीर में इतनी आग नहीं लगी, जितनी दिखाई जाती है : प्राण किशोर कौल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 18:11 IST

कश्मीरममधील छोटीशीही घटना खूप मोठी करून ब्रेकींग न्यूज म्हणून वृत्तवाहिन्यांवरून दाखविली जाते. त्यातून कश्मीरविषयी चुकीचे चित्र उभे राहत आहे. टिआरपी वाढविण्यासाठी या बातम्या अतिरंजित केल्या जात आहेत. ‘कश्मीर में इतनी आग नहीं लगी है, जितनी दिखाई जाती है’ असे मत ज्येष्ठ लेखक व रेडिओ कश्मीरचे माजी प्रमुख प्राण किशोर कौल यांनी व्यक्त केले.

पुणे : कश्मीरममधील छोटीशीही घटना खूप मोठी करून ब्रेकींग न्यूज म्हणून वृत्तवाहिन्यांवरून दाखविली जाते. त्यातून कश्मीरविषयी चुकीचे चित्र उभे राहत आहे. टिआरपी वाढविण्यासाठी या बातम्या अतिरंजित केल्या जात आहेत. ‘कश्मीर में इतनी आग नहीं लगी है, जितनी दिखाई जाती है’ असे मत ज्येष्ठ लेखक व रेडिओ कश्मीरचे माजी प्रमुख प्राण किशोर कौल यांनी व्यक्त केले.        प्राण किशोर कौल यांनी लिहलेल्या ‘रेडिओ कश्मीर अ‍ॅन्ड माय डेज इन ब्रॉडकास्टींग’ या पुस्तकाचे सोमवारी प्रकाशन झाले. तत्पूर्वी प्राण किशोर कौल यांनी ‘लोकमत’ कार्यालयास भेट देऊन संवाद साधला. यावेळी जम्मू कश्मीर कला, संस्कृती आणि भाषा अकादमीचे उपाध्यक्ष व आमदार जफर इकबाल मनहास, दुरदर्शनचे माजी अतिरिक्त महासंचालक अशोक जेलखानी, सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार उपस्थित होते. कौल म्हणाले, आम्ही सांस्कृतिक क्षेत्रातील माणसं असल्याने आमचा राजकारणाशी संबंध नाही. राजकारण्यांनी चुकीच्या पध्दतीने केलेल्या राजकारणाने कश्मीरला खाऊन टाकले. हे राजकारण थांबविले तर देशाचे कल्याण होईल. पाकिस्तानमध्ये लष्कराकडून बसविलेले लोकच सत्तेवर येत आहेत. जेव्हा तिथे लोकांनी बनविलेले खरेखुरे शासन सत्तेवर येईल तेव्हाच प्रश्न सुटू शकेल. कश्मीरचे राजकारण हे पोलिटिकल गेम आहे, यामध्ये सर्वसामान्य माणूस मात्र भरडला जात आहे.         ताश्कंद, सिमला करारानंतर आम्ही शांततेची भाषा करीत होतो, आपल्याकडील रेडिओवरून कुठेही पाकिस्तानविरोधात काही बातम्या दिल्या जाणार नाहीत याची काळजी घेत होतो. मात्र पाक व्याप्त कश्मीर आझाद कश्मीरवाले मात्र नेमके त्याच्या उलट करीत होते. कश्मीरी पंडितांच्या प्रश्नाकडे राजकीय नेत्यांनी कधी गांभीर्याने पाहिले नाही. मुली-सुनांना वाचविण्यासाठी कश्मीरी पंडित तेथून पळून गेले. त्यावेळी त्यांच्या मदतीला कोणीही आले नाही अशी खंतही कौल यांनी व्यक्त केली.

    जफर इक्बाल मनहास म्हणाले, सत्ताधाऱ्यांना आम्ही सगळे शिव्या देतो मात्र सत्तेचा परिणाम सर्व घटकांवर होत असतो. धर्म, कार्पोरेट अशा सर्व क्षेत्रातही सत्ता, शासन असते. शासन असणे ही आवश्यकच बाब आहे, मात्र शासन चालविणाºया, राजकारणातील व्यक्ती योग्य असणे तितकेच गरजेचे आहे. मात्र शासन चालविणारे लोकच सध्या प्राब्लेम बनले आहेत.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरPuneपुणेartकला