शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

कश्मीर में इतनी आग नहीं लगी, जितनी दिखाई जाती है : प्राण किशोर कौल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 18:11 IST

कश्मीरममधील छोटीशीही घटना खूप मोठी करून ब्रेकींग न्यूज म्हणून वृत्तवाहिन्यांवरून दाखविली जाते. त्यातून कश्मीरविषयी चुकीचे चित्र उभे राहत आहे. टिआरपी वाढविण्यासाठी या बातम्या अतिरंजित केल्या जात आहेत. ‘कश्मीर में इतनी आग नहीं लगी है, जितनी दिखाई जाती है’ असे मत ज्येष्ठ लेखक व रेडिओ कश्मीरचे माजी प्रमुख प्राण किशोर कौल यांनी व्यक्त केले.

पुणे : कश्मीरममधील छोटीशीही घटना खूप मोठी करून ब्रेकींग न्यूज म्हणून वृत्तवाहिन्यांवरून दाखविली जाते. त्यातून कश्मीरविषयी चुकीचे चित्र उभे राहत आहे. टिआरपी वाढविण्यासाठी या बातम्या अतिरंजित केल्या जात आहेत. ‘कश्मीर में इतनी आग नहीं लगी है, जितनी दिखाई जाती है’ असे मत ज्येष्ठ लेखक व रेडिओ कश्मीरचे माजी प्रमुख प्राण किशोर कौल यांनी व्यक्त केले.        प्राण किशोर कौल यांनी लिहलेल्या ‘रेडिओ कश्मीर अ‍ॅन्ड माय डेज इन ब्रॉडकास्टींग’ या पुस्तकाचे सोमवारी प्रकाशन झाले. तत्पूर्वी प्राण किशोर कौल यांनी ‘लोकमत’ कार्यालयास भेट देऊन संवाद साधला. यावेळी जम्मू कश्मीर कला, संस्कृती आणि भाषा अकादमीचे उपाध्यक्ष व आमदार जफर इकबाल मनहास, दुरदर्शनचे माजी अतिरिक्त महासंचालक अशोक जेलखानी, सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार उपस्थित होते. कौल म्हणाले, आम्ही सांस्कृतिक क्षेत्रातील माणसं असल्याने आमचा राजकारणाशी संबंध नाही. राजकारण्यांनी चुकीच्या पध्दतीने केलेल्या राजकारणाने कश्मीरला खाऊन टाकले. हे राजकारण थांबविले तर देशाचे कल्याण होईल. पाकिस्तानमध्ये लष्कराकडून बसविलेले लोकच सत्तेवर येत आहेत. जेव्हा तिथे लोकांनी बनविलेले खरेखुरे शासन सत्तेवर येईल तेव्हाच प्रश्न सुटू शकेल. कश्मीरचे राजकारण हे पोलिटिकल गेम आहे, यामध्ये सर्वसामान्य माणूस मात्र भरडला जात आहे.         ताश्कंद, सिमला करारानंतर आम्ही शांततेची भाषा करीत होतो, आपल्याकडील रेडिओवरून कुठेही पाकिस्तानविरोधात काही बातम्या दिल्या जाणार नाहीत याची काळजी घेत होतो. मात्र पाक व्याप्त कश्मीर आझाद कश्मीरवाले मात्र नेमके त्याच्या उलट करीत होते. कश्मीरी पंडितांच्या प्रश्नाकडे राजकीय नेत्यांनी कधी गांभीर्याने पाहिले नाही. मुली-सुनांना वाचविण्यासाठी कश्मीरी पंडित तेथून पळून गेले. त्यावेळी त्यांच्या मदतीला कोणीही आले नाही अशी खंतही कौल यांनी व्यक्त केली.

    जफर इक्बाल मनहास म्हणाले, सत्ताधाऱ्यांना आम्ही सगळे शिव्या देतो मात्र सत्तेचा परिणाम सर्व घटकांवर होत असतो. धर्म, कार्पोरेट अशा सर्व क्षेत्रातही सत्ता, शासन असते. शासन असणे ही आवश्यकच बाब आहे, मात्र शासन चालविणाºया, राजकारणातील व्यक्ती योग्य असणे तितकेच गरजेचे आहे. मात्र शासन चालविणारे लोकच सध्या प्राब्लेम बनले आहेत.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरPuneपुणेartकला