शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

पाकला धडा शिकविण्याची गरज होती- लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 04:22 IST

सरहदच्या वतीने निंभोरकर यांचा सन्मान

पुणे : दरवेळी भारताच्या सहनशक्तीचा गैरफायदा घेऊन शस्त्रसंधीचे उल्लंघन करणा-या पाकिस्तानने सर्जिकल स्ट्राईक नंतर भारताचा धसकाच घेतला. सर्जिकल स्ट्राइकपूर्वी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी उरी येथील लष्करी तळावर केलेल्या हल्ल्यात १७ जवान हुतात्मा झाले होते. एकदा तरी पाकिस्तानला धडा शिकवणे आवश्यक होते, असे स्पष्ट मत लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर (निवृत्त) यांनी व्यक्त केले.सरहदच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात कारगिल विजय दिनानिमित्त सर्जिकल स्ट्राईकचे नेतृत्त्व करणारे निंभोरकर, कारगिल युध्दातील नायक कर्नल (निवृत्त) ललित राय यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी, महापौर मुक्ता टिळक, सरहद चे संस्थापक संजय नहार, शैलेश वाडेकर, अरविंद बिजवे आदी यावेळी उपस्थित होते.आतापर्यंत आपणच भारतात घुसखोरी करू शकतो. भारत तसे करणार नाही, असा पाकिस्तानचा समज होता. पण केवळ जागतिक ख्यातीच्या गुप्तचर संस्थाच नव्हे तर भारतीय लष्करही सर्जिकल स्ट्राइक करू शकते, हे सर्जिकल स्ट्राइकमुळे सिद्ध झाले. पाकिस्तानला धडा शिकवण्याची संधी लष्कराला सोडायची नव्हती. आमच्याकडून नियोजन सादर केले आणि त्यानंतर परवानगी मिळाली. त्याची कल्पना केवळ आठ ते दहा व्यक्तींनाच होती. प्रत्येकी ३५ पॅरा कमांडोच्या तीन तुकड्या रात्रीच्या अंधारात आत पाठवल्या. पहाटेच्या वेळी गाढ झोपेच्या वेळी शत्रू अधिक बेसावध असेल हा विचार करुन हल्ला केला गेला, असे निंभोरकर यांनी सांगितले.चार दिवस अन्नपाण्याविना लढलोकर्नल राय म्हणाले, तीन रात्र चार दिवस आम्ही अन्न-पाण्याशिवाय लढत होतो. ६०० जवानांच्या तुकडीतील प्रत्येकजण शेवटच्या श्वासापर्यंत लढला. कारगिलच्या युद्धात उणे ३५ अंश तापमानात मोठ्या धाडसाने आणि जिद्दीने चढाई केली. त्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीमुळे सगळे शक्य झाले.

टॅग्स :Kargil Vijay Diwasकारगिल विजय दिनPakistanपाकिस्तानwarयुद्धIndian Armyभारतीय जवान