शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
2
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
3
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
4
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
5
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
6
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
7
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
8
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
9
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
10
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
11
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
12
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
13
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
14
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
15
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
16
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
17
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
18
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
19
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
20
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल

पाकला धडा शिकविण्याची गरज होती- लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 04:22 IST

सरहदच्या वतीने निंभोरकर यांचा सन्मान

पुणे : दरवेळी भारताच्या सहनशक्तीचा गैरफायदा घेऊन शस्त्रसंधीचे उल्लंघन करणा-या पाकिस्तानने सर्जिकल स्ट्राईक नंतर भारताचा धसकाच घेतला. सर्जिकल स्ट्राइकपूर्वी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी उरी येथील लष्करी तळावर केलेल्या हल्ल्यात १७ जवान हुतात्मा झाले होते. एकदा तरी पाकिस्तानला धडा शिकवणे आवश्यक होते, असे स्पष्ट मत लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर (निवृत्त) यांनी व्यक्त केले.सरहदच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात कारगिल विजय दिनानिमित्त सर्जिकल स्ट्राईकचे नेतृत्त्व करणारे निंभोरकर, कारगिल युध्दातील नायक कर्नल (निवृत्त) ललित राय यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी, महापौर मुक्ता टिळक, सरहद चे संस्थापक संजय नहार, शैलेश वाडेकर, अरविंद बिजवे आदी यावेळी उपस्थित होते.आतापर्यंत आपणच भारतात घुसखोरी करू शकतो. भारत तसे करणार नाही, असा पाकिस्तानचा समज होता. पण केवळ जागतिक ख्यातीच्या गुप्तचर संस्थाच नव्हे तर भारतीय लष्करही सर्जिकल स्ट्राइक करू शकते, हे सर्जिकल स्ट्राइकमुळे सिद्ध झाले. पाकिस्तानला धडा शिकवण्याची संधी लष्कराला सोडायची नव्हती. आमच्याकडून नियोजन सादर केले आणि त्यानंतर परवानगी मिळाली. त्याची कल्पना केवळ आठ ते दहा व्यक्तींनाच होती. प्रत्येकी ३५ पॅरा कमांडोच्या तीन तुकड्या रात्रीच्या अंधारात आत पाठवल्या. पहाटेच्या वेळी गाढ झोपेच्या वेळी शत्रू अधिक बेसावध असेल हा विचार करुन हल्ला केला गेला, असे निंभोरकर यांनी सांगितले.चार दिवस अन्नपाण्याविना लढलोकर्नल राय म्हणाले, तीन रात्र चार दिवस आम्ही अन्न-पाण्याशिवाय लढत होतो. ६०० जवानांच्या तुकडीतील प्रत्येकजण शेवटच्या श्वासापर्यंत लढला. कारगिलच्या युद्धात उणे ३५ अंश तापमानात मोठ्या धाडसाने आणि जिद्दीने चढाई केली. त्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीमुळे सगळे शक्य झाले.

टॅग्स :Kargil Vijay Diwasकारगिल विजय दिनPakistanपाकिस्तानwarयुद्धIndian Armyभारतीय जवान