शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

पाकला धडा शिकविण्याची गरज होती- लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 04:22 IST

सरहदच्या वतीने निंभोरकर यांचा सन्मान

पुणे : दरवेळी भारताच्या सहनशक्तीचा गैरफायदा घेऊन शस्त्रसंधीचे उल्लंघन करणा-या पाकिस्तानने सर्जिकल स्ट्राईक नंतर भारताचा धसकाच घेतला. सर्जिकल स्ट्राइकपूर्वी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी उरी येथील लष्करी तळावर केलेल्या हल्ल्यात १७ जवान हुतात्मा झाले होते. एकदा तरी पाकिस्तानला धडा शिकवणे आवश्यक होते, असे स्पष्ट मत लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर (निवृत्त) यांनी व्यक्त केले.सरहदच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात कारगिल विजय दिनानिमित्त सर्जिकल स्ट्राईकचे नेतृत्त्व करणारे निंभोरकर, कारगिल युध्दातील नायक कर्नल (निवृत्त) ललित राय यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी, महापौर मुक्ता टिळक, सरहद चे संस्थापक संजय नहार, शैलेश वाडेकर, अरविंद बिजवे आदी यावेळी उपस्थित होते.आतापर्यंत आपणच भारतात घुसखोरी करू शकतो. भारत तसे करणार नाही, असा पाकिस्तानचा समज होता. पण केवळ जागतिक ख्यातीच्या गुप्तचर संस्थाच नव्हे तर भारतीय लष्करही सर्जिकल स्ट्राइक करू शकते, हे सर्जिकल स्ट्राइकमुळे सिद्ध झाले. पाकिस्तानला धडा शिकवण्याची संधी लष्कराला सोडायची नव्हती. आमच्याकडून नियोजन सादर केले आणि त्यानंतर परवानगी मिळाली. त्याची कल्पना केवळ आठ ते दहा व्यक्तींनाच होती. प्रत्येकी ३५ पॅरा कमांडोच्या तीन तुकड्या रात्रीच्या अंधारात आत पाठवल्या. पहाटेच्या वेळी गाढ झोपेच्या वेळी शत्रू अधिक बेसावध असेल हा विचार करुन हल्ला केला गेला, असे निंभोरकर यांनी सांगितले.चार दिवस अन्नपाण्याविना लढलोकर्नल राय म्हणाले, तीन रात्र चार दिवस आम्ही अन्न-पाण्याशिवाय लढत होतो. ६०० जवानांच्या तुकडीतील प्रत्येकजण शेवटच्या श्वासापर्यंत लढला. कारगिलच्या युद्धात उणे ३५ अंश तापमानात मोठ्या धाडसाने आणि जिद्दीने चढाई केली. त्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीमुळे सगळे शक्य झाले.

टॅग्स :Kargil Vijay Diwasकारगिल विजय दिनPakistanपाकिस्तानwarयुद्धIndian Armyभारतीय जवान