शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

गावाकडं पाणीच न्हाई... तिथं जाऊन करायचं काय?

By admin | Updated: March 17, 2017 02:05 IST

ज्वाऱ्या गुडघ्याएवढ्या आल्या अन् जळून गेल्या... गावाकडं जितराबांना प्यायला पाण्याचा एक ठिपूस पण नाय... माणसांनाच आठ दिसातनं एकदा पाणी मिळतं.

सोमेश्वरनगर : ज्वाऱ्या गुडघ्याएवढ्या आल्या अन् जळून गेल्या... गावाकडं जितराबांना प्यायला पाण्याचा एक ठिपूस पण नाय... माणसांनाच आठ दिसातनं एकदा पाणी मिळतं... तिथं जितराब कशी जगवणार... हंगामात साठवलेलं वाड हाय तवर चारायचं... हिरवा चारा घेयला आमच्याकडं कुठलं पैसं... गावाकडं पाणीच नसल्यानं हिथंच राहणार... निदान हाताला काम आणि जितराबांना चारा तरी मिळतोय, ही भावना आहे, निवडुंग (ता. पाटोदा, बीड) येथील चंद्रकला अशोक सुळे यांची... सोमेश्वर कारखान्यावर यावर्षी ऊसतोडणी करण्यासाठी आलेल्या हजार ते बाराशे कुटंबांपैकी जवळपास १५० ते २०० कुटुंबे अद्याप गावाकडे गेलीच नाहीत. पाणी नसल्याने सोमेश्वर कारखान्यावरच त्यांनी तळ ठोकला आहे. गावाकडे का गेला नाही, असे त्यांना विचारले असता, गावाकडे जाऊन काय माती गिळायची का? असेच उत्तर या कामगारांकडून मिळत आहे. सोमेश्वर कारखान्याचा हंगाम संपून आठ दिवस झाले. त्यामुळे ज्या ऊसतोड कामागारांना गावाकडे थोडीफार पाण्याची सोय आहे, अशी कुटुंबेच गावाकडे गेली आहेत. मात्र बरीचशी कुटुंबे गावाकडे जाण्याचे नावच घेत नाहीत. दर वर्षी मात्र कारखाना कधी बंद होतोय, गावाकडे कधी जातोय, या विचारात असणारा ऊसतोडणी कामगार यावर्षी मात्र गावाकडे जाण्यासाठी उत्सुक दिसला नाही. येथे राहून कमीत कमी माणसाला व जितराबाच्या पोटाला व पाणी तरी मिळेल. तर शेतावर कामाला जाऊन चार पैसे तरी मिळतील या आशेवर अनेक कुटुंब पाऊस पडेपर्यंत येथेच थांबली आहेत. तांबाराजोरी (ता. पाटोदा) येथील सोमनाथ तांबे सांगतात, गावातील इतर विहिरीचे पाणी सरकारी विहिरीत टाकले आहे. त्यातून रोज दीड ते दोन तास गावाला पाणीपुरवठा होतो. त्यावर समाधान मानायचे. जितराबं कशी बशी जगवायची, विकून काय होणार. पुढील वर्षाला पुन्हा खरेदीला कुठून पैसे आणायचे. तर दत्तू तोडकर म्हणाले, गावाला पाणीच नाही म्हणून पाऊस पडेपर्यंत इथेच थांबण्याचा निर्णय घेतला आहे.