शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
3
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
4
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
5
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
6
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
7
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
8
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
9
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
10
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
11
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
12
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
13
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
14
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
15
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
16
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
19
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
20
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश

गावाकडं पाणीच न्हाई... तिथं जाऊन करायचं काय?

By admin | Updated: March 17, 2017 02:05 IST

ज्वाऱ्या गुडघ्याएवढ्या आल्या अन् जळून गेल्या... गावाकडं जितराबांना प्यायला पाण्याचा एक ठिपूस पण नाय... माणसांनाच आठ दिसातनं एकदा पाणी मिळतं.

सोमेश्वरनगर : ज्वाऱ्या गुडघ्याएवढ्या आल्या अन् जळून गेल्या... गावाकडं जितराबांना प्यायला पाण्याचा एक ठिपूस पण नाय... माणसांनाच आठ दिसातनं एकदा पाणी मिळतं... तिथं जितराब कशी जगवणार... हंगामात साठवलेलं वाड हाय तवर चारायचं... हिरवा चारा घेयला आमच्याकडं कुठलं पैसं... गावाकडं पाणीच नसल्यानं हिथंच राहणार... निदान हाताला काम आणि जितराबांना चारा तरी मिळतोय, ही भावना आहे, निवडुंग (ता. पाटोदा, बीड) येथील चंद्रकला अशोक सुळे यांची... सोमेश्वर कारखान्यावर यावर्षी ऊसतोडणी करण्यासाठी आलेल्या हजार ते बाराशे कुटंबांपैकी जवळपास १५० ते २०० कुटुंबे अद्याप गावाकडे गेलीच नाहीत. पाणी नसल्याने सोमेश्वर कारखान्यावरच त्यांनी तळ ठोकला आहे. गावाकडे का गेला नाही, असे त्यांना विचारले असता, गावाकडे जाऊन काय माती गिळायची का? असेच उत्तर या कामगारांकडून मिळत आहे. सोमेश्वर कारखान्याचा हंगाम संपून आठ दिवस झाले. त्यामुळे ज्या ऊसतोड कामागारांना गावाकडे थोडीफार पाण्याची सोय आहे, अशी कुटुंबेच गावाकडे गेली आहेत. मात्र बरीचशी कुटुंबे गावाकडे जाण्याचे नावच घेत नाहीत. दर वर्षी मात्र कारखाना कधी बंद होतोय, गावाकडे कधी जातोय, या विचारात असणारा ऊसतोडणी कामगार यावर्षी मात्र गावाकडे जाण्यासाठी उत्सुक दिसला नाही. येथे राहून कमीत कमी माणसाला व जितराबाच्या पोटाला व पाणी तरी मिळेल. तर शेतावर कामाला जाऊन चार पैसे तरी मिळतील या आशेवर अनेक कुटुंब पाऊस पडेपर्यंत येथेच थांबली आहेत. तांबाराजोरी (ता. पाटोदा) येथील सोमनाथ तांबे सांगतात, गावातील इतर विहिरीचे पाणी सरकारी विहिरीत टाकले आहे. त्यातून रोज दीड ते दोन तास गावाला पाणीपुरवठा होतो. त्यावर समाधान मानायचे. जितराबं कशी बशी जगवायची, विकून काय होणार. पुढील वर्षाला पुन्हा खरेदीला कुठून पैसे आणायचे. तर दत्तू तोडकर म्हणाले, गावाला पाणीच नाही म्हणून पाऊस पडेपर्यंत इथेच थांबण्याचा निर्णय घेतला आहे.