शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
2
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
3
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
4
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
5
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार
6
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
7
Viral News: कानपूरहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात उंदीर; उड्डाणाला साडेतीन तास विलंब!
8
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
9
अमूलनं बटर, तूप, चीज, आईस्क्रीम आणि चॉकलेटच्या किमती केल्या कमी; प्रत्येक वस्तूवर किती बचत होणार? जाणून घ्या
10
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
11
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
13
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
14
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
15
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
16
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
17
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
18
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
19
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
20
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!

गावाकडं पाणीच न्हाई... तिथं जाऊन करायचं काय?

By admin | Updated: March 17, 2017 02:05 IST

ज्वाऱ्या गुडघ्याएवढ्या आल्या अन् जळून गेल्या... गावाकडं जितराबांना प्यायला पाण्याचा एक ठिपूस पण नाय... माणसांनाच आठ दिसातनं एकदा पाणी मिळतं.

सोमेश्वरनगर : ज्वाऱ्या गुडघ्याएवढ्या आल्या अन् जळून गेल्या... गावाकडं जितराबांना प्यायला पाण्याचा एक ठिपूस पण नाय... माणसांनाच आठ दिसातनं एकदा पाणी मिळतं... तिथं जितराब कशी जगवणार... हंगामात साठवलेलं वाड हाय तवर चारायचं... हिरवा चारा घेयला आमच्याकडं कुठलं पैसं... गावाकडं पाणीच नसल्यानं हिथंच राहणार... निदान हाताला काम आणि जितराबांना चारा तरी मिळतोय, ही भावना आहे, निवडुंग (ता. पाटोदा, बीड) येथील चंद्रकला अशोक सुळे यांची... सोमेश्वर कारखान्यावर यावर्षी ऊसतोडणी करण्यासाठी आलेल्या हजार ते बाराशे कुटंबांपैकी जवळपास १५० ते २०० कुटुंबे अद्याप गावाकडे गेलीच नाहीत. पाणी नसल्याने सोमेश्वर कारखान्यावरच त्यांनी तळ ठोकला आहे. गावाकडे का गेला नाही, असे त्यांना विचारले असता, गावाकडे जाऊन काय माती गिळायची का? असेच उत्तर या कामगारांकडून मिळत आहे. सोमेश्वर कारखान्याचा हंगाम संपून आठ दिवस झाले. त्यामुळे ज्या ऊसतोड कामागारांना गावाकडे थोडीफार पाण्याची सोय आहे, अशी कुटुंबेच गावाकडे गेली आहेत. मात्र बरीचशी कुटुंबे गावाकडे जाण्याचे नावच घेत नाहीत. दर वर्षी मात्र कारखाना कधी बंद होतोय, गावाकडे कधी जातोय, या विचारात असणारा ऊसतोडणी कामगार यावर्षी मात्र गावाकडे जाण्यासाठी उत्सुक दिसला नाही. येथे राहून कमीत कमी माणसाला व जितराबाच्या पोटाला व पाणी तरी मिळेल. तर शेतावर कामाला जाऊन चार पैसे तरी मिळतील या आशेवर अनेक कुटुंब पाऊस पडेपर्यंत येथेच थांबली आहेत. तांबाराजोरी (ता. पाटोदा) येथील सोमनाथ तांबे सांगतात, गावातील इतर विहिरीचे पाणी सरकारी विहिरीत टाकले आहे. त्यातून रोज दीड ते दोन तास गावाला पाणीपुरवठा होतो. त्यावर समाधान मानायचे. जितराबं कशी बशी जगवायची, विकून काय होणार. पुढील वर्षाला पुन्हा खरेदीला कुठून पैसे आणायचे. तर दत्तू तोडकर म्हणाले, गावाला पाणीच नाही म्हणून पाऊस पडेपर्यंत इथेच थांबण्याचा निर्णय घेतला आहे.