शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

संविधान जाळणाऱ्यांची पोलिसांकडून साधी चौकशीसुद्धा नाही : छगन भुजबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2018 18:21 IST

एकीकडे मनुस्मृती जाळणा-यांवर गुन्हे दाखल केले जातात. मात्र, दुस-या बाजुला...

ठळक मुद्देअखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद फुले,शाहु,आंबेडकरांच्या विचारांनीच देशात शांतता नांदेल

पुणे : एकीकडे मनुस्मृती जाळणा-यांवर गुन्हे दाखल केले जातात. मात्र दुस-या बाजुला संविधान जाळणा-यांची साधी चौकशी देखील केली जात नाही. यामाध्यमातून मनुवाद पुढे येतो आहे. शेतातील आंबे खावून मुले होतील. अशाप्रकारच्या अंधश्रद्धांना खतपाणी घालणा-या विचारांना स्थान दिले जात असून देशाच्या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे, असे मत समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.        अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेत भुजबळ यांनी आपल्या रोखठोक शैलीत समाजातील बदलत्या परिस्थितीचा वेध घेतला.ते म्हणाले, नायगाव किंवा महात्मा फुलेंचा हा वाडा आमच्यासाठी उर्जा केंद्र आहेत. आमच्या हातून घडलेल्या भल्या-बु-या कामांचा आढावा आम्ही या उर्जा केंद्रावर घेत असतो. आगामी कार्यासाठी सज्ज होत असतो. ही उजार्केंद्र, स्मारक भव्य स्वरुपात येथे आकारास यावी यासाठी भविष्यात काम करु. दगडूशेठ गणपती येथे हजारोंच्या संख्येने अर्थवशीर्ष पठण होते. परंतु, स्त्रीयांच्या प्रगतीसाठी ज्या स्त्रीने भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा काढली त्याकडे कोणत्याच भगिनीचे लक्ष जात नाही, ही खेदाची बाब आहे. छत्रपती शाहु महाराजांनी पहिल्यांदा देशात आरक्षणाची चळवळ उभी केली. आणि आरक्षण दिले. मात्र, प्रत्यक्षात आरक्षणाची अंमलबजावणी करणारा देशातील दुसरा नेता म्हणून शरद पवार यांचे नाव घ्यावे लागेल. याबरोबरच महिलांना आरक्षण देण्यासंबंधी आणि मराठवाडा विद्यापीठाचे नामकरण करण्यासंबंधी त्यांनी घेतलेले निर्णय महत्वाचे ठरले. ‘‘एक दिन वक्त आपका गुलाम होगा’’ असे सांगत मनुवादावर चालणा-यांचा प्रवास थांबवावा लागेल. कारण केवळ फुले,शाहु,आंबेडकरांच्या विचारांनीच देशात शांतता नांदेल. असे भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेChagan Bhujbalछगन भुजबळSharad Pawarशरद पवारGovernmentसरकार