दर्शनबारीत पालखीचे नियोजनच नाही!

By Admin | Updated: June 26, 2015 04:11 IST2015-06-26T04:11:15+5:302015-06-26T04:11:15+5:30

अलंकापुरीतील पालखी सोहळ्यानिमित्त बांधण्यात येणाऱ्या दर्शनबारीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अतिशय देखणी वास्तू निर्मिती होत असली,

There is no planning for a visit! | दर्शनबारीत पालखीचे नियोजनच नाही!

दर्शनबारीत पालखीचे नियोजनच नाही!

दिघी : अलंकापुरीतील पालखी सोहळ्यानिमित्त बांधण्यात येणाऱ्या दर्शनबारीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अतिशय देखणी वास्तू निर्मिती होत असली, तरी तेथे पालखीचे नियोजनच केले नसल्याने यंदा पालखी उतरावयाची कुठे हा प्रश्न निर्माण झाला आहे. लाखोंच्या संख्येने जमा होणाऱ्या भाविकांसाठी बांधण्यात आलेल्या तळमजल्यावरील जिना अडचणीचा ठरण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
पालखी ठेवण्यासाठ्या ज्या दुरूस्त्या सूचविल्या आहेत. त्या आता हाणे अशक्य आहे. माऊलींच्या रथासाठीच्या जागेवर पालखी उतरावयाचा मुद्दा पुढे आला आहे. मात्र, तेथे नियोजन केल्यास गर्दी होवून गडबड गोंधळ उडू शकतो.
आळंदी देवस्थानच्या वतीने सुमारे पाच कोटी रुपये खर्चून वारकऱ्यांच्या सोयीसाठी दर्शनबारीचे काम हाती घेण्यात आल्यामुळे आषाढी आणि कार्तिक वारी व इतर वेळीही भाविकांना माऊलींचे दर्शन व्हावे, यासाठी हे बांधकाम करण्यात येत आहे. सद्य:स्थितीत जवळपास १०० मजुरांचा ताफा यासाठी दिवस-रात्र काम करीत आहे. दर्शनबारी विकसित होत असलेली जागा पवित्र मानली जाते. श्रीपाद बुवा गांधीवाडा (जुना) व आताचे आजोळ घर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जागेत म्हणजेच आजोळघरी पालखी आल्यानंतर पूजेची प्रथा आहे. सद्य:स्थितीत पावसाळा सुरू आहे. शिवाय पालखीचे प्रस्थान रात्रीच्या वेळी ९ वाजता होणार आहे.
आजोळघरी पालखीची पूजा, त्यानंतर महानैवेद्य, समाज आरती, रात्रीचा जागर असे प्रमुख कार्यक्रम याच ठिकाणी होतात, अशा वेळी वारकरी, दिंडीकरी, इतर भाविक मोठ्यासंख्येने उपस्थित राहतात. या वेळी जर पाऊस सुरू झाला, तर आश्रय घेण्यासाठी इमारतीत घुसण्याचा प्रयत्न भाविक नक्कीच करणार. या वेळी होणाऱ्या गर्दीला थांबवायचे कसे, हा प्रश्न सुरक्षेची काळजी घेणाऱ्या पोलीस प्रशासनासमोर आहे.
पालखी ठेवण्याच्या जागेच्या मागील बाजूस तळमजल्यावर बांधण्यात आलेल्या जिन्यामुळे या भागतील मोकळे वातावरण नष्ट झाले आहे. तळमजल्यावरील जागेत पुरेशी मोकळी जागा उपलब्ध व्हावी, असे अपेक्षित असताना जिन्यामुळे आतील बाजूस प्रचंड गर्दी व चेंगराचेंंगरी ही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संभाव्य गर्दीचा विचार केल्यास हा जिना तात्पुरता काढून टाकणे हा पर्याय असून, त्याऐवजी हलता जिना उभारण्याची किंवा अन्य पर्याय शोधण्याची मागणी समोर येत असून, खेड विभागाचे उपविभागीय अधिकारी हिम्मत खराडे यांनीही तशा सूचना दिल्या आहेत. (वार्ताहर)

Web Title: There is no planning for a visit!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.