शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

राज्याच्या अर्थसंकल्पात तीर्थक्षेत्र आळंदीच्या विकासासाठी तरतूद नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 10:48 IST

आळंदीसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद करणे आवश्यक

आळंदी : शिंदे - फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर गुरुवारी (दि.८) उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प जाहीर केला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात प्रमुख मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. विशेषतः तुकाराम बीजेचा मुहूर्त असल्याने अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करण्यास प्रारंभ केला. मात्र राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या आळंदी व तीर्थक्षेत्र देहूच्या विकासासाठी अर्थसंकल्पात कुठलीही तरतूद केली नाही हे विशेष.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदीत विकासाची अनेक कामे प्रलंबित आहेत. पवित्र इंद्रायणी प्रदूषण मुक्त करणे,  इंद्रायणीचा घाट सुसज्ज करणे, भाविकांसाठी सुसज्ज दर्शनबारी उभारणे, मंदिर व शहर परिसराचा विकास करणे आदी कामे प्रामुख्याने करणे आवश्यक आहे. मात्र सादर केलेल्या अर्थसंकल्पात आळंदीसाठी निधीची तरतूद नसल्याने स्थानिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.           सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांना विचारले असता ते म्हणाले, आळंदीत ज्ञानेश्वर महाराज संस्थांनने सुमारे साडेचारशे एकर क्षेत्रात ज्ञानभूमी साकारणार आहे. यामध्ये वारकऱ्यांसाठी सुसज्ज निवास व्यवस्था, हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज, वारकरी शिक्षण संस्था उभारण्यात येणार आहे. वारकरी शिक्षण संस्थेत नव्याने कीर्तनकार प्रवचनकार घडतील. प्रामुख्याने वारी म्हणजे काय? याची प्रतिकृती अर्थातच 'ज्ञानवारी' साकारणार आहे. ज्याचा लाखों भाविक व वारकऱ्यांना फायदा होणार आहे. वारकऱ्यांसाठी आरोग्य विमा तरतूद असणे गरजेचे आहे. विशेषतः सरकारने वारकऱ्यांसाठीही 'एक खिडकी' योजना राबविणे आवश्यक आहे. यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद करणे आवश्यक होते.

आळंदीसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद करणे आवश्यक 

 शिंदे - फडणवीस सरकारने राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. मात्र या अर्थसंकल्पात भाजप तसेच शिंदे गटाच्या आमदारांना झुकते माप देत त्यांच्या मागणीनुसार निधीची तरतूद केली आहे. तीर्थक्षेत्र आळंदीसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद करणे आवश्यक होते. मात्र सरकारने याकडे दुर्लक्ष केले. - दिलीप मोहिते पाटील, आमदार खेड तालुका.

टॅग्स :PuneपुणेMaharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट 2023Alandiआळंदीsant dnyaneshwarसंत ज्ञानेश्वरEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस