शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
2
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
3
Mumbai Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार
4
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
5
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
6
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
7
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
8
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
9
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
10
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
11
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
12
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
13
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
14
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
15
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
16
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
17
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
18
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
19
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
20
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
Daily Top 2Weekly Top 5

PDCC Bank: जिल्हा बँकेकडून ३ ते ५ लाखांपर्यंतच्या कर्जाला सवलत नाहीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2022 12:41 IST

शून्य टक्के व्याजदराची सवलत बंद करण्यात येत असल्याची घोषणा बँकेचे संचालक व विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली...

पुणे : जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून ३ ते ५ लाखांपर्यंत कर्जासाठी देण्यात येत असलेली शून्य टक्के व्याजदराची सवलत बंद करण्यात येत असल्याची घोषणा बँकेचे संचालक व विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. बँकेच्या संचालक मंडळाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मात्र, तीन लाखांपर्यंतच्या कर्जासाठीची सवलत कायम राहील, अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी सन्मान योजनेसाठी नाबार्ड कडून बँकेला मिळणारा अर्धा टक्का व्याज परतावा कमी झाला असून हा भार राज्याने उचलावा किंवा केंद्राने तो पूर्ववत करावा या मागणीचा पाठपुरावा येत्या अधिवेशनात करू असेही त्यांनी सांगितले.

पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या शुक्रवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण ते बोलत होते. यावेळी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार अशोक पवार, संजय जगताप, दिलीप मोहिते, बॅंकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे आदी उपस्थित होेते. पवार म्हणाले, ‘ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यापूर्वी ५ लाखांपर्यंतच्या कर्जाला शून्य टक्के व्याजदराची सवलत सुरू होती. मात्र, यात आता बदल करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.

त्यानुसार ३ लाखांपर्यंतच्या कर्जासाठी ही सवलत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या मर्यादेत सुमारे २ लाख ४३ हजार ३३९ शेतकरी सुमारे २१६५ कोटींचे कर्ज घेतात. या शेतकऱ्यांसाठी बॅंकेला ७ ते ८ कोटींचा भार सहन करावा लागतो. मात्र, ३ ते ५ लाखांपर्यंतच्या कर्ज हे केवळ २६३१ शेतकरीच घेतात. त्यांना १०० कोटींचे कर्जवाटप केले जाते. तर या गटासाठी बॅंकेला सुमारे १० ते १२ कोटींचा भार सहन करावा लागतो. त्यामुळे एवढ्या कमी शेतकऱ्यांसाठी एवढा भार उचलणे यापुढे शक्य नाही. रिझर्व्ह बॅंकेचे धोरण बदलते आहे. त्यामुळे बँकेलाही त्यानुसार चालावे लागणार आहे. मात्र, ३ लाख कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही सवलत सुरूच राहील.”

अधिवेशनात मुद्दा मांडू

केंद्र सरकारने नाबार्डच्या माध्यमातून व्याज परतावा दोन टक्क्यांवरून दीड टक्का केला आहे. त्यामुळे राज्याची डॉ. पंजाबराव देशमुख कृषी सन्मान योजना अडचणीत आली आली आहे. हा अर्ध्या टक्क्यांचा भर जिल्हा बँकांना पेलणे शक्य नाही. त्यामुळे एकतर हा भार राज्याने पेलावा किंवा केंद्राने पुन्हा दोन टक्के करावा अशी मागणी येत्या अधिवेशनात करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. रिझर्व्ह बॅंकेचे धोरण आता नेहमीच बदलत आहे. त्यामुळे जिल्हा बॅंकेला यापुढे गृहकर्जाकडे वळावे लागले असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारMaharashtraमहाराष्ट्रbankबँक