शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

"प्रशांत किशोर यांच्याशिवायही काँग्रेसमध्ये बरेच काही घडतेय; पराभवानंतरही आम्ही हरलेलो नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 12:58 IST

अर्थशास्त्राचे अभ्यासक असलेले, केंब्रिजमधून डॉक्टरेट केलेले अविजित हे लोकसभेच्या माजी सभापती मीराकुमार यांचे पुत्र. खासगी कार्यक्रमासाठी पुण्यात आले होते

राजू इनामदारपुणे : देशाला जगाबरोबर ठेवण्यात काँग्रेसचे मोठे योगदान आहे. त्यामुळेच धार्मिक, जातीय विद्वेषाने सध्याच्या काळात देश पोखरला जात असताना काँग्रेस स्वस्थ बसूच शकत नाही. प्रशांत किशोर चर्चेत आहेतच, पण त्याशिवायही काँग्रेसमध्ये बरेच काही घडत आहे, काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अंशुल अविजित ‘लोकमत’शी बोलताना आपली भूमिका मांडत होते. धार्मिक विद्वेषाचा आम्ही एकमताने सामना करणारच. अखेर विजय आमचाच होईल, असा विश्वास अविजित यांनी व्यक्त केला.

अर्थशास्त्राचे अभ्यासक असलेले, केंब्रिजमधून डॉक्टरेट केलेले अविजित हे लोकसभेच्या माजी सभापती मीराकुमार यांचे पुत्र. खासगी कार्यक्रमासाठी पुण्यात आले होते. शनिवारी  दुपारी त्यांनी ‘लोकमत’ कार्यालयास भेट दिली. 

प्रश्न : काँग्रेसची राजकीय पीछेहाट का झाली?अविजित :  काँग्रेसचे म्हणणे लोकांपर्यंत पोहोचत नाही, असे आमच्या लक्षात आले आहे, त्याची कारणेही समजली आहेत, तसेच काँग्रेसनेच या काळात पुढाकार घेऊन देशाला भविष्यात हानी पोहोचविणाऱ्या शक्तीपासून वाचवायला हवे, हेही आता सर्वांना पटले आहे. त्यामुळे येत्या काळात काँग्रेस समर्थपणे देशात उभी राहिलेली दिसेल. आम्ही काम सुरू केले आहे. वाढते धार्मिक ध्रुवीकरण मात्र चिंताजनक आहे व त्याचा समर्थपणे सामना करण्याची जबाबदारी काँग्रेसचीच आहे.निष्ठावान नेत्यांना बाजूला ठेवून व्यावसायिक रणनीतीकार आणल्याने सुधारणा होईल? तेवढेच सुरू आहे असे नाही. ज्येष्ठांना बाजूला वगैरे ठेवलेले नाही, नवी पिढी कोणत्याही पक्षात येतच असते. तशी ती काँग्रेसमध्येही आली, एवढाच  अर्थ आहे.

काय करणार आहे काँग्रेस?सामान्य माणसांचे हित, जातीपातींना वाव नाही, धर्माच्या आधारावर नाही, माणूस म्हणून विचार करून धोरण आखणी हा काँग्रेसचा मूलभूत विचारच आम्ही विसरलो होतो. आता थेट नागरिकांमध्ये जाऊन या सर्व गोष्टी समजावून सांगणार आहोत.

या देशाचे अर्थकारण हाच सध्या चिंता करण्यासारखा विषय आहे. आर्थिक विषयावर झालेल्या संपूर्ण पराभवामुळेच भाजपा सरकार कधी हिजाब, कधी मांसाहार असे मुद्दे उपस्थित करीत आहेत. महाराष्ट्रातून आता त्याला भोंग्यांची साथ मिळत आहे. - अंशुल अविजित

टॅग्स :congressकाँग्रेस