शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

"प्रशांत किशोर यांच्याशिवायही काँग्रेसमध्ये बरेच काही घडतेय; पराभवानंतरही आम्ही हरलेलो नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 12:58 IST

अर्थशास्त्राचे अभ्यासक असलेले, केंब्रिजमधून डॉक्टरेट केलेले अविजित हे लोकसभेच्या माजी सभापती मीराकुमार यांचे पुत्र. खासगी कार्यक्रमासाठी पुण्यात आले होते

राजू इनामदारपुणे : देशाला जगाबरोबर ठेवण्यात काँग्रेसचे मोठे योगदान आहे. त्यामुळेच धार्मिक, जातीय विद्वेषाने सध्याच्या काळात देश पोखरला जात असताना काँग्रेस स्वस्थ बसूच शकत नाही. प्रशांत किशोर चर्चेत आहेतच, पण त्याशिवायही काँग्रेसमध्ये बरेच काही घडत आहे, काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अंशुल अविजित ‘लोकमत’शी बोलताना आपली भूमिका मांडत होते. धार्मिक विद्वेषाचा आम्ही एकमताने सामना करणारच. अखेर विजय आमचाच होईल, असा विश्वास अविजित यांनी व्यक्त केला.

अर्थशास्त्राचे अभ्यासक असलेले, केंब्रिजमधून डॉक्टरेट केलेले अविजित हे लोकसभेच्या माजी सभापती मीराकुमार यांचे पुत्र. खासगी कार्यक्रमासाठी पुण्यात आले होते. शनिवारी  दुपारी त्यांनी ‘लोकमत’ कार्यालयास भेट दिली. 

प्रश्न : काँग्रेसची राजकीय पीछेहाट का झाली?अविजित :  काँग्रेसचे म्हणणे लोकांपर्यंत पोहोचत नाही, असे आमच्या लक्षात आले आहे, त्याची कारणेही समजली आहेत, तसेच काँग्रेसनेच या काळात पुढाकार घेऊन देशाला भविष्यात हानी पोहोचविणाऱ्या शक्तीपासून वाचवायला हवे, हेही आता सर्वांना पटले आहे. त्यामुळे येत्या काळात काँग्रेस समर्थपणे देशात उभी राहिलेली दिसेल. आम्ही काम सुरू केले आहे. वाढते धार्मिक ध्रुवीकरण मात्र चिंताजनक आहे व त्याचा समर्थपणे सामना करण्याची जबाबदारी काँग्रेसचीच आहे.निष्ठावान नेत्यांना बाजूला ठेवून व्यावसायिक रणनीतीकार आणल्याने सुधारणा होईल? तेवढेच सुरू आहे असे नाही. ज्येष्ठांना बाजूला वगैरे ठेवलेले नाही, नवी पिढी कोणत्याही पक्षात येतच असते. तशी ती काँग्रेसमध्येही आली, एवढाच  अर्थ आहे.

काय करणार आहे काँग्रेस?सामान्य माणसांचे हित, जातीपातींना वाव नाही, धर्माच्या आधारावर नाही, माणूस म्हणून विचार करून धोरण आखणी हा काँग्रेसचा मूलभूत विचारच आम्ही विसरलो होतो. आता थेट नागरिकांमध्ये जाऊन या सर्व गोष्टी समजावून सांगणार आहोत.

या देशाचे अर्थकारण हाच सध्या चिंता करण्यासारखा विषय आहे. आर्थिक विषयावर झालेल्या संपूर्ण पराभवामुळेच भाजपा सरकार कधी हिजाब, कधी मांसाहार असे मुद्दे उपस्थित करीत आहेत. महाराष्ट्रातून आता त्याला भोंग्यांची साथ मिळत आहे. - अंशुल अविजित

टॅग्स :congressकाँग्रेस