शहरं
Join us  
Trending Stories
1
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
2
“या अधिवेशनात...”; विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी
3
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
4
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
5
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
6
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बंगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
7
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
8
चांदी झाली 'सोनेरी'! २ लाख रुपये किलोचा टप्पा पार, पण गुंतवणुकीपूर्वी 'हा' भयानक इतिहास वाचा
9
इम्रान खानचा काटा काढायला असीम मुनीरचा खतरनाक प्लॅन; देशद्रोहाचा खटला चालवला जाणार?
10
मनरेगाचं नाव बदलणार, मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता; जाणून घ्या, काय असणार नवं नाव?
11
John Cena Last Match: अवघ्या WWE चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू तरळणार...! जॉन सीना निवृत्त होतोय, रविवारी शेवटचा सामना....
12
HDFC Bank UPI Downtime: HDFC बँकेची UPI सेवा दोन दिवस ४ तासांसाठी राहणार बंद, पाहा कधी आणि कोणत्या वेळी राहणार बंद
13
T20 Cricket: टी-२० क्रिकेटमध्ये भारताने कोणत्या संघाविरुद्ध गमावले सर्वाधिक सामने? वाचा
14
'मंत्र्यावर बिबटे सोडा', उद्या पाकिस्तानातील लोक मंत्री म्हणून येतील', सुधीर मुनगंटीवारांचा विधानसभेत पारा चढला!
15
"फेमस व्हायचंय..."; एडल्ट स्टार होण्याचं भलतंच वेड, व्हायरल केला पत्नीसोबतचा खासगी व्हिडीओ
16
Travel : मनालीपासून २० किलोमीटरवर आहे स्वर्गासारखे सुंदर दिसणारे 'हे' ठिकाण! हिमवृष्टी बघून प्रेमात पडाल
17
“कुणबी प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, GR काढून ३ महिने झाले, पण…”; मनोज जरांगे सरकारवर नाराज
18
SMAT 2025 : टीम इंडियातून बाहेर काढलं त्यानं हॅटट्रिकसह पुण्याचं मैदान गाजवलं, पण... (VIDEO)
19
व्हिडीओ कॉल केला आणि तिने कपडे काढून फेकले, मुंबईतील ५० वर्षाचा उद्योजक अडकला 
20
तंबाखू आणि सिगारेट महागणार! केंद्र सरकारकडून उत्पादन शुल्कात ५ पट वाढ; नवीन किंमत काय असेल?
Daily Top 2Weekly Top 5

खडकवासल्याच्या पाण्यावरून संघर्ष पेटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 02:22 IST

इंदापूर, बारामती, दौंड, हवेली तालुक्यांतील ६५ हजार हेक्टर शेती संकटात

- सतीश सांगळे कळस : खडकवासला धरणसाखळीतील पाणी केवळ पिण्यासाठीच राखून ठेवण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यातील इंदापूर, बारामती, दौंड व हवेली या तालुक्यांमधील सुमारे ६५ हजार हेक्टर शेती जळून जाण्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळे भविष्यात पुणे शहर व ग्रामीण हा वाद विकोपाला जाणार आहे. या निर्णयामुळे पाण्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. इंदापूर, बारामती, दौंड व हवेली या तालुक्यांमधील सुमारे ६५ हजार हेक्टर शेती सिंचनासाठी या कालव्यावर अवलंबून आहे. शहराच्या वाढत्या पाणीमागणीमुळे या भागातील फळबागा व शेती अडचणीत आल्या असून, दर वर्षी उन्हाळ्यात आवर्तन देण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप या तालुक्यातील नागरिकांनी केला आहे. महत्त्वाच्या या पाणीप्रश्नी कायम सापत्नभावाची वागणूक ग्रामीण भागाला मिळत असल्याने येत्या काळात पाण्याचा प्रश्न चांगलाच पेटणार आहे.वाढत्या आवर्तनामुळे धरणातील पाणी झपाट्याने कमी होत आहे. यामुळे यावर्षी ही उन्हाळ्यात पाणी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. गतवर्षीपेक्षा पाच टीएमसी पाणी कमी असल्याचे कारण पुढे करून उन्हाळ्यात आवर्तन सोडण्यात येणार, असा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा रासप यांच्याकडून या संवेदनशील पाणीप्रश्नावर एकत्रित मार्ग काढण्याची गरज निर्माण झाली आहे. जानाई व शिरसाई उपसा सिंचन प्रकल्प, तसेच दौंड व इंदापूर शहराचा पाणीपुरवठा व शेकडो ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजना धोक्यात येणार आहेत. भीमा पाटस, कर्मयोगी इंदापूर, अनुराज यवत, दौंड शुगर, बारामती अँग्रो, छत्रपती भवानीनगर, या साखर कारखाना पट्ट्यातील ऊसउत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. तसेच कारखान्यांनाही याची झळ सोसावी लागणार आहे.इंदापूर तालुक्यात खडकवासला कालव्यावरील ३६ गावांमधील सुमारे २० हजार हेक्टर वरील शेती व्यवस्था बारमाही सिंचनाअभावी संकटात आहे. या भागातील द्राक्षे, डाळींब, ऊस फूलशेती नेहमीच अडचणीत असते. तसेच, पिण्याच्या पाण्याचीही अवस्था गंभीर आहे. सिंचनासाठी या ठिकाणी कालव्याच्या कामाला १९६७ मध्ये सुरुवात करण्यात आली. १९८९ मध्ये हे काम पूर्ण होऊन शेटफळगढेपासून बेडशिंगेपर्यंत सुमारे ३६ गावांमधील २० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, १९९१ मध्ये प्रत्यक्षात या भागात पाणी आले असले, तरी आजही आठमाही जास्त शेती ही सिंचित होत नाही. कालव्यावर अवलंबून असलेली द्राक्षे, डाळींब, ऊस, फूलशेती ही पिके धोक्यात येतात.धरणसाखळीत कमी पाणी व पुणे शहराचा धरणावर अवलंबून असलेला पाणीपुरवठा यामुळे गेली काही वर्षांपासून येथील शेतीला उन्हाळी आवर्तन दिलेच जात नाही. त्यामुळे शेती संकटात आली आहे. खडकवासला धरण साखळीमधील पानशेत, वरसगाव, टेमघर व खडकवासला या धरणांची पाणीक्षमता सुमारे २९ टीमसी आहे. मात्र, पुणे शहराची पिण्याच्या पाण्याची मागणी ही वाढत असल्यामुळे उन्हाळी आवर्तनच दिले जात नाही. यामुळे या गावांमधील सुमारे ४२ पाझर तलाव हे पाण्याअभावी कोरडेच राहतात. पिण्याच्या पाण्याचे संकटही आहे. त्यामुळे येथील शेती व्यवस्था नेहमीच संकटात आहे.तालुक्यातील २० हजार हेक्टर क्षेत्राला खडकवासला कालव्याच्या पाण्याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या लाभ होतो. कालवा व त्यावरील वितरिकांच्या माध्यमातून शेतकºयांना शेतीसिंचनासाठी पाणी उपलब्ध करून दिले जाते. मात्र, सध्या कालव्याला आवर्तन दिले आहे. पण, तलाव भरून देणे गरजेचे आहे, खडकवासला कालव्याचा पट्टा हा अवर्षण प्रवण क्षेत्र म्हणूनही ओळखला जातो. या पट्ट्यात तालुक्याच्या इतर भागाच्या तुलनेत पर्जन्यमान कमी असते. यामुळे या भागाला खडकवासला कालव्याचा मोठा आधार आहे. मात्र, कालव्याला पाणी कधीच वेळेवर येत नसल्याने या भागातील शेतकरी संतप्त आहेखडकवासला धरण शेतीसाठी बांधण्यात आले आहे. यांच्या माध्यमातून हजारो हेक्टर शेती सिंचित झाली आहे. मात्र, पुणे शहराला नेहमीच वाढीव पाणीपुरवठा करण्यासाठी उन्हाळी आवर्तन कमी केले जात आहे. यापुढे असले प्रकार चालू देणार नाही. खडकवासला धरणामधील पाण्यावर आमचा हक्क आहे. कोणत्याही परिस्थितीत उन्हाळी आवर्तन घेतले जाईल, वेळप्रसंगी जनआंदोलन उभारण्यात येईल.- दत्तात्रय भरणे, आमदार

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई